शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री-मंत्र्यांमध्ये अधिका-यांवरून वाद

By admin | Updated: February 23, 2015 05:19 IST

मंत्र्यांनी आपल्या आस्थापनेवर मर्जीतील अधिकारी नेमण्यावरून मुख्यमंत्री व काही मंत्र्यांमध्ये सुरू झालेली लढाई आता तीव्र झाली असून

संदीप प्रधान, मुंबईमंत्र्यांनी आपल्या आस्थापनेवर मर्जीतील अधिकारी नेमण्यावरून मुख्यमंत्री व काही मंत्र्यांमध्ये सुरू झालेली लढाई आता तीव्र झाली असून, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या विरोधात विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव दाखल करण्याची तसेच न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याची तयारी मंत्र्यांच्या इशाऱ्यावर त्यांच्या लाडक्या अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे.मागील सरकारमध्ये काम केलेल्या अधिकाऱ्यांना मंत्र्यांचे खासगी सचिव, विशेष कार्य अधिकारी अथवा स्वीय सहायक नियुक्त करण्यास बंदी करणारा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील सामान्य प्रशासन विभागाने १ डिसेंबर २०१४ रोजी काढल्याने वादाची ठिणगी पडली. एकनाथ खडसे, गिरीश बापट, चंद्रकांत पाटील अशा ज्येष्ठ मंत्र्यांकडे आजही मागील सरकारमध्ये काम केलेले काही मर्जीतील अधिकारी कार्यरत आहेत; तर प्रकाश मेहता, गिरीश महाजन, दिवाकर रावते, प्रवीण पोटे अशा मंत्र्यांनी जड अंत:करणाने मर्जीतील अधिकारी माघारी धाडले आहेत. अशा वातावरणात मुख्यमंत्र्यांकडील सामान्य प्रशासन विभागाने ३१ जानेवारी २०१५ रोजी आणखी एक आदेश काढून मंत्र्यांनी उसनवारी तत्त्वावर घेतलेल्या अधिकाऱ्यांची माहिती द्यावी, असा फतवा काढला. मुख्यमंत्र्यांच्या आदेशातून पळवाट काढताना काही मंत्र्यांनी त्यांच्या खात्याशी संबंधित महामंडळात आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांना नियुक्त केल्याचे दाखवले व उसनवारी आपल्या कार्यालयात कामावर ठेवले आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून निघालेल्या या आदेशामुळे आता मंत्र्यांच्या आस्थापनांवरील त्यांचे लाडके अधिकारी एकवटले असून त्यांनी एक पत्र तयार करून सर्व मंत्र्यांना धाडले आहे. मुख्यमंत्री कार्यालयात यापूर्वी मंत्री आस्थापनावर काम केलेले कैलास शिंदे हे कार्यरत असताना केवळ मंत्र्यांवरच नियमाचा बडगा का, असा सवाल पत्रात केला आहे. राज्यातील सरकारला १०० दिवस पूर्ण होऊनही मंत्र्यांच्या कार्यालयात सावळा गोंधळ असण्याचे कारण सावधी पदे प्रतिनियुक्तीने भरण्यात आलेली नाहीत हेच कारण आहे. मुख्यमंत्री त्यांच्या स्वेच्छाधिकारात आपल्या कार्यालयात ५ ते ७ नियुक्त्या करीत असताना अन्य मंत्र्यांना त्यांच्या स्वेच्छाधिकारापासून रोखणे ही मुख्य सचिवांची मनमानी आहे. या विशेषाधिकार भंगाला पायबंद घालण्याकरिता विशेषाधिकार भंगाचे अस्त्र वापरण्यात येईल त्याचबरोबर जनहित याचिका दाखल करण्यात येईल, असे पत्रात नमूद केले आहे.