शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

आनंदवनमधील स्वरानंदनवनच्या बसला अपघात, विकास आमटे यांच्या सहकाऱ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2017 13:25 IST

आनंदवनमधील स्वरानंदनवनच्या बसला रविवारी पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातात डॉ. विकास आमटे यांच्या सहकाऱ्याचा मृत्यू झाला असून, चार ते पाच जण जखमी झाले आहेत.

चंद्रपूर - आनंदवनमधील स्वरानंदनवनच्या बसला रविवारी पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातात डॉ. विकास आमटे यांच्या सहकाऱ्याचा मृत्यू झाला असून, सहा जण जखमी झाले आहेत. आनंदवनमधील दिव्यांग विद्यार्थ्यांचा ऑर्केस्ट्रा असलेल्या स्वरानंदनवनचा काल रात्री मूर्तिजापूर येथे कार्यक्रम होता. हा कार्यक्रम आटोपून ही मंडळी माघारी परतत असताना पहाटे पावणे पाचच्या सुमारास कलाकारांच्या बसची उभ्या असलेल्या ट्रकला धडक बसून हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मूर्तिजापूर येथील कार्यक्रम आटोपून परतताना आनंदवन स्वरानंदवनच्या बसची उभ्या ट्रकला जबर धडक बसली. या अपघातात डॉ. विकास आमटे यांचे सहकारी बाळू माटे यांचा जागीच मृत्यू झाला. सहा जण जखमी झाले. पैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. हा अपघात चंद्रपूर-नागपूर मार्गावरील खांबाडा-टेमुर्डा दरम्यान रविवारी पहाटे घडला. अक्षय राऊत व मेघराज भोयर या दोघांवर सेवाग्राम येथे उपचार सुरू आहे. अन्य चार जण किरकोळ जखमी असल्याने त्यांच्यावर उपचार करून सुटी देण्यात आल्याचे सेवाग्राम रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :AccidentअपघातMaharashtraमहाराष्ट्र