शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

वाढदिवशीच मृत्युदंड !

By admin | Published: July 30, 2015 1:29 AM

त्रेपन्नाव्या वाढदिवशीच याकूब अब्दुल रझाक मेमन याला फाशी देण्यात येणार असल्याने याकूबसह त्याचे कुटुंबीयही सुन्न झाले आहेत. त्याला फाशी दिली जाणार, हे स्पष्ट झाल्यानंतर माध्यमांनी

- नरेश डोंगरे,  नागपूरत्रेपन्नाव्या वाढदिवशीच याकूब अब्दुल रझाक मेमन याला फाशी देण्यात येणार असल्याने याकूबसह त्याचे कुटुंबीयही सुन्न झाले आहेत. त्याला फाशी दिली जाणार, हे स्पष्ट झाल्यानंतर माध्यमांनी याकूबचा भाऊ सुलेमान मेमन याला काही प्रश्न केले. तो कसाबसा भावना आवरत म्हणाला, की माझा न्यायव्यवस्थेवर, अल्लाहवर पूर्ण विश्वास आहे.बुधवारी सकाळी ८.३०च्या सुमारास सुलेमान मुंबईहून नागपूर विमानतळावर पोहोचला. त्याला आधी दुपारी याकूबची भेट होईल, असे सांगण्यात आले होते. नंतर मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर याकूबची भेट होईल, असे कळविण्यात आले. त्यामुळे सुलेमान सीताबर्डीतील एका हॉटेलमध्ये मुक्कामी थांबला. सर्वोच्च न्यायालयाने याकूबच्या याचिकेवर दिलेल्या निकालापाठोपाठ राज्यपालांनीही त्याचा दयेचा अर्ज फेटाळल्याचे वृत्त वाहिन्यांनी प्रसारित केले. तेव्हा दुपारी ४.३० वाजता तो खाली आला. माध्यमांनी त्याला प्रश्न विचारण्यास सुरुवात केल्यावर त्याने सुरुवातीला माझा न्यायव्यवस्थेवर, अल्लाहवर पूर्ण विश्वास आहे, असे सांगितले. पण आता काय करणार, हा आणि अन्य काही प्रश्न केले असता ‘प्लीज, लिव्ह मी अलोन’ असे तो जवळपास ओरडतच म्हणाला.त्याने ते हॉटेल सोडले आणि कारागृहाकडे जायला निघाला. मात्र मधेच चालकाला त्याने कार रेल्वे स्थानकावर वळवायला लावली. एका कोपऱ्यात कार थांबवायला लावून त्याने हमसून हमसून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली अन् नंतर अज्ञात स्थळी निघून गेला. दुसरीकडे याच हॉटेलमध्ये मंगळवारपासून मुक्कामी असलेला चुलत भाऊ उस्मान मेमनने दुपारी ४.३० ला आपल्या रूमचे दार लावून घेतले. मी म्हणेन तोपर्यंत कुणीही काहीही विचारायचे नाही, अशा सूचना त्याने हॉटेल व्यवस्थापनाला दिल्या. गेल्या आठ वर्षांपासून याकूब नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आहे. ३० जुलै त्याची जन्मतारीख असल्यामुळे आतापावेतो प्रत्येक वर्षी त्याचे नातेवाईक वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला येऊन त्याची भेट घ्यायचे. त्याच्याशी गप्पा करणे, गोडधोड खाऊ घालणे, असे प्रकार व्हायचे.याकूब फाशीचा कैदी असल्यामुळे कारागृह प्रशासनही गेल्या वर्षीपर्यंत वाढदिवसाच्या दिवशी याकूब आणि त्याच्या कुटुंबीयांना या गोष्टीसाठी सूट देत होते. मात्र १४ जुलैला याकूबचा डेथ वॉरंट घोषित झाल्यापासून व वाढदिवसालाच अर्थात ३० जुलैला फाशी देण्याचे ठरल्यामुळे कारागृह प्रशासन प्रत्येक गोष्ट जेल मॅन्युअलप्रमाणे करीत आहे. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आम्ही बर्थ डे केक पाठवू. मध्यरात्री तो कापला जावा, अशी सूचनावजा विनंती याकूबच्या नातेवाइकांनी काही दिवसांपूर्वी केली होती. प्रशासनाने तीसुद्धा फेटाळली.