शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

जमिनीचा योग्य मोबदला मागणाऱ्या शेतकºयाचा उपोषणादरम्यान मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 06:43 IST

नेवासे तालुक्यातील पांढरीपूल येथील औद्योगिक वसाहतीसाठी जमिनी दिलेल्या शेतक-यांनी योग्य मोबदल्याच्या मागणीसाठी सुरू केलेल्या उपोषणादरम्यान दादू साळवे (७२) या शेतक-याचा मृत्यू झाल्याची माहिती उघड झाली आहे.

- चेतन ननावरेमुंबई  - नेवासे तालुक्यातील पांढरीपूल येथील औद्योगिक वसाहतीसाठी जमिनी दिलेल्या शेतकºयांनी योग्य मोबदल्याच्या मागणीसाठी सुरू केलेल्या उपोषणादरम्यान दादू साळवे (७२) या शेतकºयाचा मृत्यू झाल्याची माहिती उघड झाली आहे. या घटनेनंतर शेतकºयांना चर्चेसाठी बोलावण्याचे सरकारकडून सांगण्यात आले. मात्र १० दिवसांनंतर मागण्या मान्य होऊ शकत नसल्याचे सांगत सरकारने शेतकºयांची फसवणूक केल्याचा आरोप आंदोलनकर्ते पांडुरंग होंडे यांनी केला आहे.पांढरीपूल येथील शासकीय औद्योगिक वसाहतीसाठी शिंगवेतुकाई, लोहगाव, वाघवाडी व झापवाडी येथील सुमारे १६० शेतकºयांच्या २५४ हेक्टर इतकी पिकाऊ जमीन १९९० ते १९९७ सालादरम्यान संपादित करण्यात आली. मात्र त्याचा योग्य मोबदला मिळाला नसल्याची तक्रार घेऊन या शेतकºयांनी १९ जानेवारीपासून आझाद मैदानात उपोषण सुरू केले. आठवडाभराच्या उपोषण आंदोलनामुळे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दादू साळवे यांच्या छातीत दुखू लागले. त्यामुळे रात्रीच ते सपत्नीक वांजोळी या त्यांच्या गावी परतले. मात्र, प्रजासत्ताक दिनीच त्यांचा मृत्यू झाल्याचे आंदोलनकर्त्या शेतकºयांनी सांगितले.सरकारकडून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू असून न्याय मिळणार नसेल, तर किमान स्वेच्छामरणाची परवानगी तरी द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे.दादू साळवे यांची सहा एकर जमीन संपादित केल्यानंतर त्यांना १९९८ साली मोबदल्याचा पहिला हफ्ता देण्यात आला. मात्र दुसºया हफ्त्यासाठी त्यांना उपोषण करावे लागले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. मात्र या प्रकरणाची वाच्यता करू नका, असे उद्योगमंत्र्यांच्या पीएने सांगितले होते. १० दिवसांनंतर खुद्द उद्योगमंत्र्यांनी मागण्या फेटाळून लावत शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप होंडे यांनी केला आहे....ही तर शेतकºयांची फसवणूकमी दिव्यांग असून माझी दीड एकर शेती सरकारने संपादित करत त्याच्या मोबदल्याचा पहिला टप्पा म्हणून १७ मार्च १९९८ साली ३३ हजार ४३१ रुपये दिले. मोबदल्याचा दुसरा टप्पा २०१६ मध्ये व्याजासह ६५ हजार रुपये इतका देण्यात आला. एकीकडे समृद्धी मार्गासाठी एकरी ५० लाख रुपयांची मदत दिली जात असताना, सुपीक जमिनीला एकरी १५ हजार रुपयांनुसार मोबदला देत सरकार शेतकºयांची फसवणूक करीत आहे.- दामोधर पुंड, आंदोलनकर्ते शेतकरीन्याय देणारशेतकºयांप्रति सहानुभूती आहे. त्यांच्या मागण्यांवर चर्चा केली आहे. ही भूसंपादनाची प्रक्रिया ३० वर्षांपूर्वीची असून गुंतागुंतीची आहे. त्यासंदर्भात घेतलेला निर्णय हा राज्यातील सर्वच भूसंपादन प्रकरणांना लागू होणार आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर चर्चा करून लवकरच निर्णय घेऊन शेतकºयांना न्याय दिला जाईल. - सुभाष देसाई, उद्योगमंत्री

टॅग्स :FarmerशेतकरीDeathमृत्यू