शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
5
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
6
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
7
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
8
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
9
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
10
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
11
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
12
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
13
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
14
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
15
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
16
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
17
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
18
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
19
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
20
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई

उजनीत होतोय धोकादायक जलप्रवास

By admin | Updated: July 15, 2017 01:27 IST

३५ ते ३६ किलोमीटर अंतराच्या उजनी पाणलोटक्षेत्राच्या पट्ट्यात सर्रास कायद्याला फाटा देऊन धोकादायक पद्धतीने जलप्रवास केला जात आहे

लोकमत न्यूज नेटवर्कइंदापूर : तालुक्यातील भिगवण ते तरटगाव अशा सुमारे ३५ ते ३६ किलोमीटर अंतराच्या उजनी पाणलोटक्षेत्राच्या पट्ट्यात सर्रास कायद्याला फाटा देऊन धोकादायक पद्धतीने जलप्रवास केला जात आहे. पाणलोटक्षेत्रात अशा अनेक जागा आहेत, तिथे लोकांच्या जिवावर बेतू शकते. मात्र, त्याबाबत कसलीही खबरदारी घेतली जात नाही.लोणी देवकरपासून इंदापूर शहराकडे येणाऱ्या पाणलोटक्षेत्राच्या पट्ट्यात कळाशी, शिरसोडी, गंगावळण, पडस्थळ या भागांतून करमाळा तालुक्यातील चिखलठाण, चिखलठाण नंबर २, दहिगाव, कुगाव, पोपळज, जेऊर, शेटफळ, सोगाव या भागात लाँच व होड्यांद्वारे जलवाहतूक केली जाते. या गावांचे इंदापूरपासूनचे अंतर केवळ तीन ते पाच किलोमीटरएवढे आहे. त्यामुळे दवाखाना, शिक्षण, शेतीसाहित्य याकरिता त्या भागातील लोक, विद्यार्थी इंदापुरात येतात. दररोज किमान पाचशे ते हजार लोक तालुक्यात येत असतात. एकट्या पडस्थळमध्ये ही संख्या चारशे ते पाचशेएवढी आहे. एका लाँचमध्ये वीस ते बावीस माणसांबरोबर अवजड दुचाक्यांची दाटीवाटीने कोंबाकोंबी करून हा प्रवास धोकादायक असतो. या भागातील नदीपात्रातल्या खोलीचा अंदाज कुणालाही लागत नाही. त्यामुळेही जीव मुठीत धरून प्रवास केला जातो. >पडस्थळच्या जलवाहतुकीस कायदेशीर परवानगीची मागणीकोटलिंगनाथाच्या देवालयामुळे प्रसिद्ध असणाऱ्या पडस्थळ गावातून एक लाँच पडस्थळ ते चिखलठाण अशी प्रवासी वाहतूक करीत होती. चारशे ते पाचशे लोक दररोज ये-जा करीत होते. वादामुळे गेल्या दोन महिन्यांपासून हा प्रवास बंद आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाष बोंगाणे व नितीन झेंडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की पडस्थळला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळावा, अशी मागणी आम्ही ग्रामस्थ गेल्या वीस वर्षांपासून करीत आहोत. पण त्याची दखल घेतली जात नाही. येथील जलवाहतूक, दळणवळणास कायदेशीर दर्जा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

>अजोती परिसरात आता एकाच होडीने जलप्रवास

याच वर्षी दि. ३० एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास उजनी पाणलोटक्षेत्रातील अजोती गावाजवळ नदीपात्रात नौकाविहार करताना बोट उलटली होती. या दुर्घटनेत डॉ. सुभाष ज्ञानदेव मांजरेकर (अकलूज, ता. इंदापूर, माळशिरस), डॉ. महेश पोपट लवटे, डॉ. अण्णा शिंदे, चंद्रकांत लक्ष्मण उराडे (सर्व रा. नातेपुते, माळशिरस) हे चौघे जण बुडून मरण पावले होते. ही आठवण अजून ताजीच असणाऱ्या अजोती गावाची पाहणी केली असता, त्या वेळी मिळालेल्या माहितीनुसार या गावात शेतीबरोबरच मासेमारी हा उदरनिर्वाहाचा प्रमुख व्यवसाय आहे. या गावात मासेमारीसाठी वापरात येणाऱ्या जवळपास पन्नास ते साठ होड्या आहेत. नदीपात्रात जाळी सोडून आल्यानंतर या होड्या किनाऱ्याला बांधून ठेवल्या जातात. काही उत्साही लोक कुणाची परवानगी न घेता बांधलेल्या होड्या सोडून नौकाविहार करतात. हाच प्रकार दि. ३० एप्रिल रोजी घडला होता.