शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

उजनीत होतोय धोकादायक जलप्रवास

By admin | Updated: July 15, 2017 01:27 IST

३५ ते ३६ किलोमीटर अंतराच्या उजनी पाणलोटक्षेत्राच्या पट्ट्यात सर्रास कायद्याला फाटा देऊन धोकादायक पद्धतीने जलप्रवास केला जात आहे

लोकमत न्यूज नेटवर्कइंदापूर : तालुक्यातील भिगवण ते तरटगाव अशा सुमारे ३५ ते ३६ किलोमीटर अंतराच्या उजनी पाणलोटक्षेत्राच्या पट्ट्यात सर्रास कायद्याला फाटा देऊन धोकादायक पद्धतीने जलप्रवास केला जात आहे. पाणलोटक्षेत्रात अशा अनेक जागा आहेत, तिथे लोकांच्या जिवावर बेतू शकते. मात्र, त्याबाबत कसलीही खबरदारी घेतली जात नाही.लोणी देवकरपासून इंदापूर शहराकडे येणाऱ्या पाणलोटक्षेत्राच्या पट्ट्यात कळाशी, शिरसोडी, गंगावळण, पडस्थळ या भागांतून करमाळा तालुक्यातील चिखलठाण, चिखलठाण नंबर २, दहिगाव, कुगाव, पोपळज, जेऊर, शेटफळ, सोगाव या भागात लाँच व होड्यांद्वारे जलवाहतूक केली जाते. या गावांचे इंदापूरपासूनचे अंतर केवळ तीन ते पाच किलोमीटरएवढे आहे. त्यामुळे दवाखाना, शिक्षण, शेतीसाहित्य याकरिता त्या भागातील लोक, विद्यार्थी इंदापुरात येतात. दररोज किमान पाचशे ते हजार लोक तालुक्यात येत असतात. एकट्या पडस्थळमध्ये ही संख्या चारशे ते पाचशेएवढी आहे. एका लाँचमध्ये वीस ते बावीस माणसांबरोबर अवजड दुचाक्यांची दाटीवाटीने कोंबाकोंबी करून हा प्रवास धोकादायक असतो. या भागातील नदीपात्रातल्या खोलीचा अंदाज कुणालाही लागत नाही. त्यामुळेही जीव मुठीत धरून प्रवास केला जातो. >पडस्थळच्या जलवाहतुकीस कायदेशीर परवानगीची मागणीकोटलिंगनाथाच्या देवालयामुळे प्रसिद्ध असणाऱ्या पडस्थळ गावातून एक लाँच पडस्थळ ते चिखलठाण अशी प्रवासी वाहतूक करीत होती. चारशे ते पाचशे लोक दररोज ये-जा करीत होते. वादामुळे गेल्या दोन महिन्यांपासून हा प्रवास बंद आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाष बोंगाणे व नितीन झेंडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की पडस्थळला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळावा, अशी मागणी आम्ही ग्रामस्थ गेल्या वीस वर्षांपासून करीत आहोत. पण त्याची दखल घेतली जात नाही. येथील जलवाहतूक, दळणवळणास कायदेशीर दर्जा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

>अजोती परिसरात आता एकाच होडीने जलप्रवास

याच वर्षी दि. ३० एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास उजनी पाणलोटक्षेत्रातील अजोती गावाजवळ नदीपात्रात नौकाविहार करताना बोट उलटली होती. या दुर्घटनेत डॉ. सुभाष ज्ञानदेव मांजरेकर (अकलूज, ता. इंदापूर, माळशिरस), डॉ. महेश पोपट लवटे, डॉ. अण्णा शिंदे, चंद्रकांत लक्ष्मण उराडे (सर्व रा. नातेपुते, माळशिरस) हे चौघे जण बुडून मरण पावले होते. ही आठवण अजून ताजीच असणाऱ्या अजोती गावाची पाहणी केली असता, त्या वेळी मिळालेल्या माहितीनुसार या गावात शेतीबरोबरच मासेमारी हा उदरनिर्वाहाचा प्रमुख व्यवसाय आहे. या गावात मासेमारीसाठी वापरात येणाऱ्या जवळपास पन्नास ते साठ होड्या आहेत. नदीपात्रात जाळी सोडून आल्यानंतर या होड्या किनाऱ्याला बांधून ठेवल्या जातात. काही उत्साही लोक कुणाची परवानगी न घेता बांधलेल्या होड्या सोडून नौकाविहार करतात. हाच प्रकार दि. ३० एप्रिल रोजी घडला होता.