शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
ईशनंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटंबाचा धक्कादायक खुलासा
3
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
4
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
5
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
6
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
7
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
8
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
9
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
10
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
11
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
12
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
13
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
14
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
15
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
16
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
17
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
18
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
19
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
20
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

उजनीत होतोय धोकादायक जलप्रवास

By admin | Updated: July 15, 2017 01:27 IST

३५ ते ३६ किलोमीटर अंतराच्या उजनी पाणलोटक्षेत्राच्या पट्ट्यात सर्रास कायद्याला फाटा देऊन धोकादायक पद्धतीने जलप्रवास केला जात आहे

लोकमत न्यूज नेटवर्कइंदापूर : तालुक्यातील भिगवण ते तरटगाव अशा सुमारे ३५ ते ३६ किलोमीटर अंतराच्या उजनी पाणलोटक्षेत्राच्या पट्ट्यात सर्रास कायद्याला फाटा देऊन धोकादायक पद्धतीने जलप्रवास केला जात आहे. पाणलोटक्षेत्रात अशा अनेक जागा आहेत, तिथे लोकांच्या जिवावर बेतू शकते. मात्र, त्याबाबत कसलीही खबरदारी घेतली जात नाही.लोणी देवकरपासून इंदापूर शहराकडे येणाऱ्या पाणलोटक्षेत्राच्या पट्ट्यात कळाशी, शिरसोडी, गंगावळण, पडस्थळ या भागांतून करमाळा तालुक्यातील चिखलठाण, चिखलठाण नंबर २, दहिगाव, कुगाव, पोपळज, जेऊर, शेटफळ, सोगाव या भागात लाँच व होड्यांद्वारे जलवाहतूक केली जाते. या गावांचे इंदापूरपासूनचे अंतर केवळ तीन ते पाच किलोमीटरएवढे आहे. त्यामुळे दवाखाना, शिक्षण, शेतीसाहित्य याकरिता त्या भागातील लोक, विद्यार्थी इंदापुरात येतात. दररोज किमान पाचशे ते हजार लोक तालुक्यात येत असतात. एकट्या पडस्थळमध्ये ही संख्या चारशे ते पाचशेएवढी आहे. एका लाँचमध्ये वीस ते बावीस माणसांबरोबर अवजड दुचाक्यांची दाटीवाटीने कोंबाकोंबी करून हा प्रवास धोकादायक असतो. या भागातील नदीपात्रातल्या खोलीचा अंदाज कुणालाही लागत नाही. त्यामुळेही जीव मुठीत धरून प्रवास केला जातो. >पडस्थळच्या जलवाहतुकीस कायदेशीर परवानगीची मागणीकोटलिंगनाथाच्या देवालयामुळे प्रसिद्ध असणाऱ्या पडस्थळ गावातून एक लाँच पडस्थळ ते चिखलठाण अशी प्रवासी वाहतूक करीत होती. चारशे ते पाचशे लोक दररोज ये-जा करीत होते. वादामुळे गेल्या दोन महिन्यांपासून हा प्रवास बंद आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाष बोंगाणे व नितीन झेंडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की पडस्थळला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळावा, अशी मागणी आम्ही ग्रामस्थ गेल्या वीस वर्षांपासून करीत आहोत. पण त्याची दखल घेतली जात नाही. येथील जलवाहतूक, दळणवळणास कायदेशीर दर्जा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

>अजोती परिसरात आता एकाच होडीने जलप्रवास

याच वर्षी दि. ३० एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास उजनी पाणलोटक्षेत्रातील अजोती गावाजवळ नदीपात्रात नौकाविहार करताना बोट उलटली होती. या दुर्घटनेत डॉ. सुभाष ज्ञानदेव मांजरेकर (अकलूज, ता. इंदापूर, माळशिरस), डॉ. महेश पोपट लवटे, डॉ. अण्णा शिंदे, चंद्रकांत लक्ष्मण उराडे (सर्व रा. नातेपुते, माळशिरस) हे चौघे जण बुडून मरण पावले होते. ही आठवण अजून ताजीच असणाऱ्या अजोती गावाची पाहणी केली असता, त्या वेळी मिळालेल्या माहितीनुसार या गावात शेतीबरोबरच मासेमारी हा उदरनिर्वाहाचा प्रमुख व्यवसाय आहे. या गावात मासेमारीसाठी वापरात येणाऱ्या जवळपास पन्नास ते साठ होड्या आहेत. नदीपात्रात जाळी सोडून आल्यानंतर या होड्या किनाऱ्याला बांधून ठेवल्या जातात. काही उत्साही लोक कुणाची परवानगी न घेता बांधलेल्या होड्या सोडून नौकाविहार करतात. हाच प्रकार दि. ३० एप्रिल रोजी घडला होता.