शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचताच आयसीसीने धमाका करून टाकला! ऑस्ट्रेलिया संघ बघतच राहिला...
2
संजय राऊत दोन महिने राहणार सार्वजनिक जीवनापासून दूर, समोर आलं चिंताजनक कारण, निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटाची चिंता वाढली
3
IND vs AUS :हेजलवूडचा भेदक मारा! तिलक वर्माच्या पदरी भोपळा; ४९ धावांत भारताचा अर्धा संघ तंबूत
4
पुढच्या महिन्यात येतोय फिजिक्सवालाचा आयपीओ, ₹३८२० कोटी उभारणार, काय आहेत अधिक डिटेल्स?
5
एपीआयला हिरो व्हायचं होतं म्हणून रोहित आर्याच्या छातीत गोळी झाडली; अ‍ॅडव्होकेट नितीन सातपुतेंचा आरोप
6
WhatsApp वर येणार Facebook सारखं नवं फीचर; प्रोफाईलवर लावता येणार सुंदर कव्हर फोटो
7
धक्कादायक! रोहित आर्याने उर्मिला कोठारे, गिरीश ओक यांनाही स्टुडिओत बोलवलेलं, मुलांसोबत फोटोही काढले अन्...
8
राज ठाकरेंच्या मनसेचं उद्धवसेनेत विलिनीकरण होणार?; शिंदेसेनेच्या नेत्याचा दावा, 'तो' फोटो दाखवला
9
"बुलडोजरनं चिरडून 'त्यांना' 'जहन्नुम'मध्ये...", बिहारमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
10
Vastu Tips: खिडकीत, अंगणात पोपटाचे येणे हे तर लक्ष्मी कृपेचे शुभ चिन्ह; पाहा वास्तू संकेत!
11
अपहरणाचा सीन, फिल्म प्रोजेक्ट..., रोहित आर्याने मराठी अभिनेत्रीला केलेला मेसेज; स्क्रीनशॉट दाखवत म्हणाली....
12
महिलांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये लग्न पत्रिका आली, क्लिक करताच फोन हँग झाला अन्...; नव्या सायबर ट्रॅपने उडवली झोप!
13
आता घरबसल्या करा आधार कार्ड अपडेट; 'ई-आधार ॲप' लवकरच लॉन्च, काय-काय बदलता येणार?
14
Deepak Kesarkar : "...तर मी जीवाची पर्वा न करता तिथे गेलो असतो"; रोहित आर्याबद्दल काय म्हणाले दीपक केसरकर?
15
टीम इंडियाचे माजी कर्णधार अझरुद्दीन यांची नवी इनिंग; घेतली तेलंगणाच्या मंत्रिपदाची शपथ
16
रोहित आर्यामुळे मुंबई हादरली! यामीच्या सिनेमातील कथेसारखं सेम टू सेम किडनॅपिंग, तुम्ही पाहिलाय का 'तो' चित्रपट?
17
शुभमंगल सावधान !! स्मृती मंधनाच्या लग्नाची तारीख ठरली; 'या' दिवशी सांगलीत रंगणार लग्नसोहळा
18
युक्रेन युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का! रशियाच्या 'या' अटी व्हाईट हाऊसला मान्य नाहीत
19
शेतकऱ्यांना 3000 रुपये, पाटण्याजवळ नवं शहर अन्...; बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'संकल्प पत्रात' NDA नं दिली मोठी आश्वासनं
20
'टॅरिफ वॉर'दरम्यान अमेरिकेने बदलला आपला सूर, भारतासोबत केला एक मोठा संरक्षण करार...

नुकसानीची पाहणी : नेते पोहोचले बांधावर, मदतीवरून राजकीय ‘गडगडाट’; आता आरोप-प्रत्यारोपांची अतिवृष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2020 06:51 IST

सगळं केंद्रावर ढकलून नामानिराळं कसं होता? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा सवाल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही ठाकरी भाषेत दिलं उत्तर... (Uddhav Thackeray, Devendra Fadnavis)

ठळक मुद्देअतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने काय मदत करणार आहे ते सांगा. उगीच टोलवाटोलवी नको आहे. - फडणवीसकोणत्याही संकटप्रसंगी सगळे केंद्र सरकारवर ढकलून तुम्हाला नामानिराळं होता येणार नाही - फडणवीसमाझ्यावर टीका करणाऱ्यांनी बिहारला जाण्याऐवजी दिल्लीत जावे - उद्धव ठाकरे

बारामती : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने काय मदत करणार आहे ते सांगा. उगीच टोलवाटोलवी नको आहे. कोणत्याही संकटप्रसंगी सगळे केंद्र सरकारवर ढकलून तुम्हाला नामानिराळं होता येणार नाही. तुमची काही जबाबदारी आहे की नाही, असा सवाल विधानसभेतील विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना केला. 

बारामती तालुक्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची सोमवारी फडणवीस यांनी पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, शरद पवार कृषीमंत्री होते. त्यांना केंद्राकडून मदत कशी मिळते हे माहिती आहे. केंद्राचे पथक येते, राज्याचा अहवाल केंद्राकडे गेल्यानंतर  गृहमंत्री, अर्थमंत्री व कृषीमंत्री एकत्र बसतात. त्यानंतर मदतीची भूमिका निश्चित करतात. केंद्र सरकार निश्चित मदत करेल, परंतु सोयीस्कर राजकीय भूमिका कोणत्याच नेत्यांनी  घेऊ नये. लोकांना काय मदत करणार हे महत्त्वाचे आहे. अशा प्रकारच्या गंभीर दौऱ्यांदरम्यान थिल्लर वक्तव्ये करणे मुख्यमंत्र्यांना शोभत नाही, अशी टीकाही  फडवणीस यांनी केली.

फडणवीस म्हणाले, मी काळजीवाहू मुख्यमंत्री असताना  पावसाने झालेल्या नुकसानीनंतर दहा हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्याच्या वतीने मदत सुरु केली. अतिवृष्टीनंतर पाच दिवसात  पंचनामे पूर्ण केले. जेथे पंचनामे होऊ शकले नाहीत, तेथे मोबाईलवर फोटो काढून टाकला तरी तो पंचनामा म्हणून ग्राह्य धरला होता. आता तर शंभर टक्के नुकसान झालेले असताना पंचनाम्यात वेळ घालविण्यापेक्षा तत्काळ व्यवस्था व्हायला हवी, अशी अपेक्षाही फडणवीस यांनी व्यक्त केली.प्रत्येक जबाबदारी केंद्रावर टाकायची आणि आपण मात्र नामानिराळे व्हायचे -प्रत्येक जबाबदारी केंद्रावर टाकायची आणि आपण मात्र नामानिराळे व्हायचे, आपले जणू काही कामच नाही, ही  प्रवृत्ती  योग्य नाही. पहिली जबाबदारी राज्य सरकारची आहे, ती पार पाडत तातडीची मदत शेतकऱ्यांना द्यायला हवी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना फोन करून मदतीची ग्वाही दिली आहे, असेही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.केंद्राकडे मदत मागितली म्हणून बिघडले कुठे? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे उत्तर -केंद्र सरकार हे देशाचे सरकार आहे, परदेशाचे नाही. राज्याची आणि देशाची काळजी घेणे हे सरकारचे कर्तव्य आहे. केंद्र सरकारने पक्षपात करू नये. महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी बिहारमध्ये प्रचाराला जाण्यापेक्षा राज्यातील संकटासाठी एकत्र येऊन केंद्राकडे जाऊन मदत मागावी. मी विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी बसलो नाही, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

अक्कलकोट तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी सोमवारी पाहणी दौरा केला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ठाकरे म्हणाले, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. पुढील २-३ दिवसांत माहिती गोळा करण्याचे काम होईल. त्यानंतर सरकारकडून जे शक्य आहे ते आम्ही करणार आहोत.  मुख्यमंत्री मुंबईबाहेर पडत नाहीत अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे. याकडे लक्ष वेधले असता, घोषणा देणारे गेले, आम्ही प्रत्यक्षात काम करू, असा टोला ठाकरेंनी विरोधकांना लगावला.  

यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, कृषी मंत्री दादाजी भुसे  यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसदारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मदतीचे धनादेश  वाटप करण्यात आले.भरपाईची काळजी करु नका, जीव सांभाळा -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  अक्कलकोट तालुक्याचा दौरा करुन पाहणी केली. रामपूर या गावी ग्रामस्थांशी संवाद साधला.  नुकसान भरपाईची काळजी करु नका, स्वत:चा जीव सांभाळा, अशी ग्रामस्थांना त्यांनी विनंती केली. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते.केंद्र सरकारकडे मदत मागण्यात गैर काय? शेतकऱ्याच्या डोळ्यांत आज पाणी आहे. त्यांनी काय बोलावे, मागावे यापेक्षा त्यांचे दु:ख ओळखून आम्ही त्यांना मदत करणार आहोत. माझ्यावर टीका करणाऱ्यांनी बिहारला जाण्याऐवजी दिल्लीत जावे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

टॅग्स :FarmerशेतकरीUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्र