शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

सहा हजार हेक्टरवर अवकाळीने नुकसान, कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 05:43 IST

पंचनामे करण्यास सुरुवात करणार, उत्तर महाराष्ट्राला सर्वाधिक फटका

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले असून, सुमारे पाच ते सहा हजार हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यात उत्तर महाराष्ट्रात नुकसानीचे क्षेत्र जास्त आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल यंत्रणेला दिले आहेत. त्यानुसार कृषी विभागही त्यात सहभागी होत आहे. पंचनाम्यांनंतर प्रत्यक्ष आकडा हाती येईल, अशी माहिती कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ते म्हणाले, गेल्या दोन दिवसांपासून पावसामुळे नुकसान झालेल्या भागांतून अहवाल येत आहेत. आतापर्यंत पाच ते सहा हजार हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. 

विभागीय कृषी सहसंचालकांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार राज्यात अवकाळी पावसाने उत्तर महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात शेतीचे नुकसान झाल्याची माहिती हाती येत आहे. पंचनाम्यानंतर नुकसानीचा नेमका अंदाज येईल. 

उत्तर महाराष्ट्र : तीव्रता अधिक नाशिक विभागातील धुळे जिल्ह्यात गारपीट झाल्यामुळे येथे नुकसानीची तीव्रता जास्त आहे. तसेच जळगाव, नंदुरबार नाशिक, नगर जिल्ह्यांतही शेतमालाचे नुकसान झाले आहे. 

विदर्भ, मराठवाड्यालाही फटकाविदर्भ व मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्हा वगळता उर्वरित सर्वच जिल्ह्यांत हजेरी लावली आहे. मराठवाड्यात केवळ संभाजीनगर जिल्ह्यात पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. विदर्भातील कोणत्याही जिल्ह्यांतून असा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.पालघर जिल्ह्यातून अहवाल प्राप्त  कोकण विभागात अद्याप पालघर जिल्ह्यातूनच अवकाळी पाऊस झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात नुकसान पुणे विभागातील सोलापूर जिल्ह्यात नुकसान झाले आहे. पावसामुळे रब्बी हंगामातील कांदा, हरभरा, गहू तसेच फळ पिकांचे नुकसान झाले आहे.

नजर अंदाजानुसार नुकसानग्रस्त जिल्हे : पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर.

तातडीने नजर अंदाज घेऊन तसा अहवाल जिल्हाधिकारी राज्य सरकारकडे देतात. आता नजर अंदाज घेऊन आपत्तीची तीव्रता जाणून घेतली जाईल. आता प्रत्यक्ष पंचनामे सुरू होतील. त्यानंतर किती क्षेत्रावरील शेतीचे नुकसान झाले आहे, याचा योग्य आकडा देता येईल.सुनील चव्हाण, कृषी आयुक्त 

तत्काळ पंचनामे करा, मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी सकाळी राज्याचे मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली. तसेच तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले.
  • शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळाला पाहिजे. संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभे आहे. यादृष्टीने महसूल यंत्रणेने लगेच कामाला लागावे आणि पंचनामे करावेत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे, अशा सूचनाही दिल्या आहेत.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रRainपाऊसFarmerशेतकरी