शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

सहा हजार हेक्टरवर अवकाळीने नुकसान, कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 05:43 IST

पंचनामे करण्यास सुरुवात करणार, उत्तर महाराष्ट्राला सर्वाधिक फटका

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले असून, सुमारे पाच ते सहा हजार हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यात उत्तर महाराष्ट्रात नुकसानीचे क्षेत्र जास्त आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल यंत्रणेला दिले आहेत. त्यानुसार कृषी विभागही त्यात सहभागी होत आहे. पंचनाम्यांनंतर प्रत्यक्ष आकडा हाती येईल, अशी माहिती कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ते म्हणाले, गेल्या दोन दिवसांपासून पावसामुळे नुकसान झालेल्या भागांतून अहवाल येत आहेत. आतापर्यंत पाच ते सहा हजार हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. 

विभागीय कृषी सहसंचालकांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार राज्यात अवकाळी पावसाने उत्तर महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात शेतीचे नुकसान झाल्याची माहिती हाती येत आहे. पंचनाम्यानंतर नुकसानीचा नेमका अंदाज येईल. 

उत्तर महाराष्ट्र : तीव्रता अधिक नाशिक विभागातील धुळे जिल्ह्यात गारपीट झाल्यामुळे येथे नुकसानीची तीव्रता जास्त आहे. तसेच जळगाव, नंदुरबार नाशिक, नगर जिल्ह्यांतही शेतमालाचे नुकसान झाले आहे. 

विदर्भ, मराठवाड्यालाही फटकाविदर्भ व मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्हा वगळता उर्वरित सर्वच जिल्ह्यांत हजेरी लावली आहे. मराठवाड्यात केवळ संभाजीनगर जिल्ह्यात पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. विदर्भातील कोणत्याही जिल्ह्यांतून असा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.पालघर जिल्ह्यातून अहवाल प्राप्त  कोकण विभागात अद्याप पालघर जिल्ह्यातूनच अवकाळी पाऊस झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात नुकसान पुणे विभागातील सोलापूर जिल्ह्यात नुकसान झाले आहे. पावसामुळे रब्बी हंगामातील कांदा, हरभरा, गहू तसेच फळ पिकांचे नुकसान झाले आहे.

नजर अंदाजानुसार नुकसानग्रस्त जिल्हे : पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर.

तातडीने नजर अंदाज घेऊन तसा अहवाल जिल्हाधिकारी राज्य सरकारकडे देतात. आता नजर अंदाज घेऊन आपत्तीची तीव्रता जाणून घेतली जाईल. आता प्रत्यक्ष पंचनामे सुरू होतील. त्यानंतर किती क्षेत्रावरील शेतीचे नुकसान झाले आहे, याचा योग्य आकडा देता येईल.सुनील चव्हाण, कृषी आयुक्त 

तत्काळ पंचनामे करा, मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी सकाळी राज्याचे मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली. तसेच तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले.
  • शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळाला पाहिजे. संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभे आहे. यादृष्टीने महसूल यंत्रणेने लगेच कामाला लागावे आणि पंचनामे करावेत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे, अशा सूचनाही दिल्या आहेत.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रRainपाऊसFarmerशेतकरी