Cyclone Shakti : राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले असतानाच आता महाराष्ट्रावर आणखी एक संकट येत असल्याचा इशारा दिला आहे. भारतीय हवामान विभागाने ‘शक्ती’ चक्रीवादळाचा इशारा देत मुंबई, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग या किनारी जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला आहे.
४ ते ७ ऑक्टोबर दरम्यान या भागात मुसळधार पाऊस, वादळी वारे (४५-६५ किमी प्रतितास वेगाने) आणि समुद्रात प्रचंड लाटा येण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
मच्छिमारांना इशारा
आयएमडीनुसार, वाऱ्याचा वेग आणखी वाढू शकतो. यामुळे समुद्राच्या मोठ्या येऊ शकतात. मच्छिमारांना समुद्रापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हवामान खात्याने पूर्व विदर्भ आणि मराठवाडा प्रदेशांसह महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे.
सरकारने अलर्ट दिला
मुसळधार पावसामुळे किनारपट्टीच्या भागात पूर परिस्थिती येऊ शकते. विशेषतः कोकण किनारपट्टीवर वादळासह मुसळधार पाऊस आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ 'शक्ती'ला तोंड देण्यासाठी महाराष्ट्र सरकारनेही तयारी सुरू केली आहे.
महाराष्ट्र सरकारने सर्व जिल्ह्यांमधील मदत पथकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. लोकांना किनाऱ्यापासून दूर राहण्यास सांगण्यात आले आहे. किनाऱ्याजवळ राहणाऱ्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. पर्यटकांना समुद्राजवळ जाऊ नये असा सल्लाही देण्यात आला आहे.
Web Summary : Maharashtra faces 'Shakti' cyclone threat. Coastal districts, including Mumbai, are on alert for heavy rains and strong winds from October 4-7. Fishermen are warned; government prepares for potential flooding.
Web Summary : महाराष्ट्र में 'शक्ति' चक्रवात का खतरा। मुंबई सहित तटीय जिले, 4-7 अक्टूबर तक भारी बारिश और तेज हवाओं के लिए अलर्ट पर हैं। मछुआरों को चेतावनी; सरकार संभावित बाढ़ के लिए तैयार।