शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

Cyclone Nisarga: “कोकणातील जनता ही आपली मालमत्ता असल्यासारखं शिवसेना वागतेय”

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 17:35 IST

ज्या बाळासाहेब ठाकरेंवर कोकणवासियांनी प्रेम केले. त्यांची शिवसेनेने दिशाभूल केली त्यांना फसवलं आहे असा आरोप भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेनेवर केला आहे.

ठळक मुद्देकोकणातील जनतेला शिवसेनेने गृहित धरलं आहेजोपर्यंत तुम्ही लोकांना भेटत नाही तोपर्यंत त्यांचे दु:ख कळणार नाहीतपालकमंत्री, एकनाथ शिंदे येऊन फक्त तहसिलदार, तलाठ्यांना भेटून गेले

मुंबई – निसर्ग चक्रीवादळामुळेकोकणाचं प्रचंड नुकसान झालं. ठाकरे सरकारने कोकणवासियांच्या तोंडाला पानं पुसली आहेत, अतिशय मन हेलावून टाकणाऱ्या घटना कोकणात पाहायला मिळत आहे. अशा या परिस्थितीत कोकणाला फक्त ७५ कोटी रुपये दिले आहेत त्यातून जे नुकसान झालं आहे त्यातून जी झाडे पडली, घरं कोसळली ती साफ करण्यासाठीही तेवढे पुरणार नाहीत अशी टीका भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी राज्य सरकारवर केली आहे.

त्याचसोबत ज्या बाळासाहेब ठाकरेंवर कोकणवासियांनी प्रेम केले. त्यांची शिवसेनेने दिशाभूल केली त्यांना फसवलं आहे असा आरोप त्यांनी केला. पालकमंत्री, एकनाथ शिंदे येऊन फक्त तहसिलदार, तलाठ्यांना भेटून गेले, गावकऱ्यांना भेटले नाहीत, कोकणातील जनतेला शिवसेनेने गृहित धरलं आहे. जोपर्यंत तुम्ही लोकांना भेटत नाही तोपर्यंत त्यांचे दु:ख कळणार नाहीत. कोकणातील जनता म्हणजे शिवसेनेची मालमत्ता आहे अशाप्रकारे वागत आहेत असा घणाघातही प्रसाद लाड यांनी शिवसेनेवर केला आहे.

तर कोकणात निसर्ग चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झालं आहे, राज्य सरकारने तात्पुरती जी मदत दिली ती तोकडी आहे. कोकणावर शिवसेनेने कायम प्रेम केले, त्यामुळे किमान ५०० कोटी रत्नागिरीला, ८०० कोटी रायगडला तर सिंधुदुर्गाला १०० कोटींची मदत करण्यात यावी, ज्या कोकणातील माणसांनी तुमच्यावर भरभरुन प्रेम केले त्यांच्यावर मेहेरबानी करा, मच्छिमारांसाठी वेगळं पॅकेज जाहीर करावी अशा विविध मागण्या आमदार प्रसाद लाड यांनी राज्य सरकारकडे केली.

दरम्यान, मच्छिमार करणारे कोळी समाज हा मुंबईचा आत्मा आहे, त्यांना उभारी देण्यासाठी प्रयत्न करा, शैक्षणिक, पर्यटन व्यवसायासाठी मदत करावी, याबाबत मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना पत्र देण्यात आलं आहे. कोविड १९ ची लॅब रत्नागिरीत व्हावी अशी मागणी आम्ही केली, त्यानंतर ३ महिन्यांनी सरकारला जाग आली, जर या सरकारने आमची भूमिका मान्य केली नाही तर जनतेसाठी, कोकणासाठी आम्ही राज्य सरकारशी दोन हात करण्याचीही तयारी केली आहे असा इशारा भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला.   

अन्य महत्त्वाच्या बातम्या

अरविंद सावंत यांनी घेतला राजनाथ सिंह यांचा समाचार; ही बाळासाहेब ठाकरे यांचीच शिवसेना आहे पण...

मुख्यमंत्री नेमकं केस-दाढी कुठं करतात? भाजपा आमदाराचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

भारताबाबत खरा ठरतोय ‘या’ वैज्ञानिकाचा दावा; जुलैपर्यंत २१ लाख कोरोना रुग्ण होणार?

...म्हणून भाजपा नेते ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या आईला दिल्लीच्या रुग्णालयात केलं दाखल

कोरोनाची वाढती संख्या पाहता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्राची नवी गाईडलाईन, काय आहेत नियम?

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाCyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेkonkanकोकण