शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
4
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
5
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
6
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
7
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
8
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
9
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
10
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
11
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
12
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
13
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
14
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
15
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
16
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
17
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
18
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
19
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
20
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक

शालेय पोषण आहाराचा कोट्यवधीचा बारदाना दुर्लक्षित

By admin | Updated: May 29, 2014 01:13 IST

तांदुळाचा बारदाना योजनेच्या प्रारंभापासूनच गोळा न केल्याने या करोडो रुपयांच्या बारदान्याच्या हिशेबाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

आकोट : संपूर्ण राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेंतर्गत पुरविण्यात येणार्‍या तांदुळाचा बारदाना योजनेच्या प्रारंभापासूनच गोळा न केल्याने या करोडो रुपयांच्या बारदान्याच्या हिशेबाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विद्यार्थ्यांची शाळेत नियमित उपस्थिती राहावी आणि त्यांच्या मध्यान्ह भोजनाची सोय व्हावी, या दुहेरी हेतूने शासनाने शालेय पोषण आहाराची योजना कार्यान्वित केली. त्यासाठी भोजनाचे प्रमाण निश्‍चित करून प्रत्येक शाळेला तांदूळ तथा खिचडीकरिता लागणारे मसाल्याचे पदार्थ पुरवण्यात येतात. यामधील महत्त्वाचा घटक असलेला तांदूळ गोणपाटाच्या कट्टय़ात ५0 किलोच्या प्रमाणात पुरवण्यात येतो. यातील तांदूळ तथा अन्य किराणा मालाचा कागदोपत्री नीट हिशेब ठेवल्या जातो. त्यासाठी साठा पुस्तिकेत प्रत्येक वाणासाठी कॉलम आहेत; परंतु बारदाना जमा करण्याबाबत कुठेच उल्लेख नाही. परिणामी गोणपाटाच्या या कट्टय़ांचा हिशेब कुठेच ठेवल्या जात नाही. हा प्रकार अगदी योजना सुरू झाल्यापासूनच सुरू आहे. शासनानेही या बाबीकडे समूळ दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे किमान ८ वर्षांंपासून या बारदान्याचे लाखो कट्टे गहाळ झालेले आहेत. बाजारात या खाली कट्टय़ांची किंमत १४ ते १६ रुपये आहे. बाजार भावाचा हा संदर्भ घेतल्यास आजवर शासनाचे करोडो रुपये मातीत गेले असल्याचे दिसून येते. शासनच विचारीत नाही म्हणून तर अधिकारी हिशेब मागीत नाही म्हणून खिचडीवाले शिक्षक या बारदान्याबाबत उदासीन आहेत; परंतु यातील काही बेरकी लोकांनी मात्र बारदान्याचे महत्त्व ओळखून हा बारदाना हातोहात लंपास केला आहे. काही शिक्षकांनी बारदाना गोळा करण्याचा प्रयास केला; परंतु जेथे विद्यार्थ्यांनाच बसण्यास वर्ग खोल्यांची मारामार आहे, तेथे बारदान्यासाठी एक संपूर्ण वर्गखोली का गुंतवून ठेवावी, हा सुज्ञ विचार करून त्या शिक्षकांनी बारदाना गोळा करण्याचा विचार त्यागला. जो बारदाना गोळा केला तो पायपुसणी म्हणून विद्यार्थी व शिक्षकांच्या पायदळी तुडविल्या गेला. यातून जो बारदाना वाचवला त्यावर उंदरांनी ताव मारून निरुपयोगी करून टाकला आहे. संपूर्ण राज्यातील शाळांमधून हा बारदाना बाजारात आणला असता, तर त्यापोटी शासनास करोडोचा लाभ झाला असता; परंतु शासन, अधिकारी तथा शिक्षकांच्या उदासीन धोरणाने करोडो रुपयांच्या बारदान्याची पुरती वाट लागली आहे. हा बारदाना सुरक्षित राहून त्यावर महसूल प्राप्त करण्यासाठी तांदूळ व किराणा मालासोबतच बारदान्याचा हिशेब ठेवणे अतिशय गरजेचे आहे. त्यासोबतच दरमहा गोळा केलेला बारदाना संकलित करून शासनानेच त्याच्या साठवणुकीची तथा सुरक्षेची हमी घेणे, हे शासनाच्या आर्थिक हिताचे आहे.