शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

एक लाख हेक्टरवरील पिकांची माती, सर्वाधिक नुकसान नाशिक, बुलढाण्यात; ६ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 07:27 IST

Unseasonal rain in Maharashtra: राज्यात मागील दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे १६ जिल्ह्यांतील अंदाजे १ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.

मुंबई : राज्यात मागील दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे १६ जिल्ह्यांतील अंदाजे १ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. बुलढाणा आणि नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. हा आकडा आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. या नैसर्गिक आपत्तीत सहाजणांनी आपला जीव गमावला असून, १६१ जनावरे दगावली आहेत. 

कापूस, कांदा, द्राक्ष, केळी, मोसंबी, डाळिंब, काढणीस आलेला भात, ज्वारी, गहू, हरभरा यांसह भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाले आहे. कृषी, मदत व पुनर्वसन आणि महसूल विभागाच्या वतीने झालेल्या नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. जिथे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल तिथे मदत करण्यासाठी शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहण्याची शासनाची भूमिका असल्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक : सरकार काय देणार?राज्य मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी होत असून तीत अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची चर्चा होणार आहे. शेतकऱ्यांना मदत जाहीर करणार का, या बाबत उत्सुकता आहे. नेमके किती नुकसान झाले याची माहिती प्रशासनाकडून मंत्रिमंडळ बैठकीत दिली जाणार आहे. शेतकऱ्यांची आजची स्थिती पाहता नियम, अटी, पंचनामे या कामात वेळ न घालवता तातडीने मदत देण्याची गरज आहे. कोरडवाहू शेतीसाठी एकरी २५ हजार रुपये व बागायती शेतीच्या नुकसानीपोटी एकरी ५० हजार रुपयांची मदत तत्काळ द्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली.

 

टॅग्स :CropपीकRainपाऊसFarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र