शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

महिनाभरात पीक विम्याची नुकसानभरपाई मिळणार; राज्यात ३४ लाख बाधित शेतकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 9:10 AM

२० लाख जणांचे पंचनामे पूर्ण

पुणे : अतिवृष्टीने बाधित पिकांची विमा नुकसानभरपाई शेतकऱ्यांना महिनाभरात मिळणार आहे. राज्य सरकारने ९७३ कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा केल्यानंतर आता केंद्र सरकारही लवकरच ९०० कोटी रुपये विमा कंपन्यांकडे जमा करणार असून, त्यामुळे कंपन्यांना आता पैसे अदा करावेच लागतील. राज्य सरकारने पैसे जमा केल्यानंतर नियमाप्रमाणे विमा कंपन्यांनी केंद्राकडे त्यांच्या पहिल्या हप्त्याची मागणी करायला हवी होती. ती केलीच गेली नाही. राज्य कृषी खात्याच्या पाठपुराव्यानंतर आता विमा कंपन्यांनी केंद्र सरकारकडे त्यांच्या पहिल्या हप्त्याची मागणी केली आहे.राज्यात एकूण सहा विमा कंपन्या केंद्र सरकारने दिल्या आहेत. जुलै व नंतरच्या अतिवृष्टीत पिके बाधित झाल्याच्या राज्यभरात एकूण ३३ लाख ८३ हजार पूर्वसूचना विमा कंपन्यांकडे दाखल झाल्या आहेत. राज्य सरकारने कंपन्यांकडे विम्याच्या पहिल्या हप्त्याचे ९७३ कोटी रुपये जमा करून १५ दिवसांपेक्षा जास्त काळ झाला. दरम्यानच्या काळात विमा कंपन्यांनी केंद्र सरकारकडे त्यांच्या पहिल्या हप्त्याची मागणी करणे आवश्यक होते. राज्याच्या ९७३ कोटी रुपयांवर व्याज मिळत असल्याने कंपन्यांकडून ही मागणी केली जात नव्हती. मात्र, कृषी खात्याच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आता सर्व कंपन्यांनी केंद्राकडे मागणी केली आहे.त्यामुळे साधारण महिनाभरात त्यातही काहीजणांना दिवाळीपूर्वीच विम्याची नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित आहे. दाखल झालेल्या ३३ लाख पूर्वसूचनांपैकी २० लाखपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. उर्वरित पंचनामे कृषी खात्याकडून युद्धस्तरावर करण्यात येत आहेत.   केंद्र सरकारकडे सर्व कंपन्यांनी बिले (एकूण मागणी) जमा केली असून, रकमेची मागणी केली आहे. ते पैसे विनाविलंब मिळतात. पंचनामे होऊन ज्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची रक्कम निश्चित झालेली आहे, त्यांना पैसे मिळण्यात आता काही अडचण नाही.- विनयकुमार आवटी, विभाग प्रमुख, सांख्यिकी, कृषी विभाग