शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

क्राइम ब्रँचची ‘लोणकढी थाप’!

By admin | Updated: August 27, 2015 02:43 IST

सुमारे आठ वर्षांपूर्वी मुंबईत रफी अहमद किडवई मार्गावरील नॅशनल मार्केटमध्ये एकाला अटक करायला गेलेल्या पोलीस पथकावर व्यापारी व इतरांच्या जमावाने हल्ला करून अटक

मुंबई : सुमारे आठ वर्षांपूर्वी मुंबईत रफी अहमद किडवई मार्गावरील नॅशनल मार्केटमध्ये एकाला अटक करायला गेलेल्या पोलीस पथकावर व्यापारी व इतरांच्या जमावाने हल्ला करून अटक केलेल्या आरोपीला त्यांनी सोडवून नेले, ही गुन्हे शाखेने मारलेली ‘लोणकढी थाप’ उच्च न्यायालयाच्याही पचनी पडलेली नाही.२४ आॅक्टोबर २००७ रोजी घडलेल्या या कथित घटनेवरून क्राइम ब्रँचच्या युनिट ४ ने सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद यासीन मोहम्मद इब्राहीम शेख यांच्यासह २२ जणांविरुद्ध बेकायदा जमाव जमविणे, दंगल करणे, पोलिसांच्या कामात व्यत्यय आणणे, दगडफेक करून जखमी करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे यासारख्या आरोपांवरून खटला दाखल केला होता. सत्र न्यायालयाने या सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले होते. त्याविरुद्ध अपिलाची परवानगी मागणारा अर्ज न्या. अभय ठिपसे यांनी फेटाळून लावला. विशेष म्हणजे आरोपींविरुद्ध कोणताही पुरावा नाही. मुळात पोलीस ज्याला अटक करायला म्हणून तेथे गेले होते, त्याच्याविरुद्ध कोणताही गुन्हा नोंदविलेला नव्हता. त्यामुळे पोलिसांनी केलेली कारवाईच पूर्णपणे बेकायदा होती. एवढेच नव्हे तर हा खटला म्हणजे पोलिसांनी स्वत:ची बेकायदा कृती दडपण्यासाठी अरेरावीने रचलेले कुभांड आहे, या सत्र न्यायालयाच्या निष्कर्षांवर न्या. ठिपसे यांनी शतप्रतिशत शिक्कामोर्तब केले. नॅशनल मार्केटमधील भुल्लू या इसमाविरुद्ध किडवई मार्ग पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीवरून आम्ही तेथे गेलो. भुल्लूला पकडून परतत असताना व्यापारी व इतरांचा दोन-तीन हजारांचा जमाव जमला. जमावाने पोलिसांचा रस्ता अडविला व दगडफेक केली. या दंगलसदृश वातावरणात पकडलेला भुल्लू आमच्या ताब्यातून सुटून पळाला, असे कथानक पोलिसांनी रचले होते. सत्र न्यायालयाच्या पाठोपाठ आता उच्च न्यायालयानेही ते असंभवनीय ठरवून अमान्य केले आहे. (विशेष प्रतिनिधी)न्यायालयाने ओढलेले असूड..भुल्लूविरुद्ध कोणत्याही दखलपात्र गुन्ह्याची नोंद नव्हती. त्यामुळे त्याला धरून आणण्यासाठी पोलिसांनी नॅशनल मार्केटमध्ये जाणेच मुळात बेकायदा होते. जमावाने दगडफेक केली व त्यात पोलीस वाहनांचे नुकसान झाले आणि काही पोलीस जखमी झाले यास कोणताही पुरावा नाही.मोहम्मद इब्राहीम शेख हे त्या भागातील मान्यवर सामाजिक कार्यकर्ते आहेत. भुल्लू हा त्यांचा पुतण्या आहे. त्यामुळे पोलिसांनी भुल्लूला पकडल्यावर शेख यांनी मध्ये पडणे स्वाभाविक होते.खरेतर किडवई मार्ग पोलीस ठाण्याचे माजी निरीक्षक विलास जोशी यांचा शेख यांच्यावर डोळा होता. त्यामुळे कदाचित जोशी यांनीच हे पोलीस पथक पाठविले असावे, या समजातून व्यापारी व इतरांनी गर्दी करणे म्हणजे बेकयदा जमाव जमविणे होत नाही. मुळात पोलिसांना बेकायदा कृत्याचा जाब विचारणे हा त्यांच्या कामात व्यत्यय ठरत नाही.