शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

क्राइम ब्रँचची ‘लोणकढी थाप’!

By admin | Updated: August 27, 2015 02:43 IST

सुमारे आठ वर्षांपूर्वी मुंबईत रफी अहमद किडवई मार्गावरील नॅशनल मार्केटमध्ये एकाला अटक करायला गेलेल्या पोलीस पथकावर व्यापारी व इतरांच्या जमावाने हल्ला करून अटक

मुंबई : सुमारे आठ वर्षांपूर्वी मुंबईत रफी अहमद किडवई मार्गावरील नॅशनल मार्केटमध्ये एकाला अटक करायला गेलेल्या पोलीस पथकावर व्यापारी व इतरांच्या जमावाने हल्ला करून अटक केलेल्या आरोपीला त्यांनी सोडवून नेले, ही गुन्हे शाखेने मारलेली ‘लोणकढी थाप’ उच्च न्यायालयाच्याही पचनी पडलेली नाही.२४ आॅक्टोबर २००७ रोजी घडलेल्या या कथित घटनेवरून क्राइम ब्रँचच्या युनिट ४ ने सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद यासीन मोहम्मद इब्राहीम शेख यांच्यासह २२ जणांविरुद्ध बेकायदा जमाव जमविणे, दंगल करणे, पोलिसांच्या कामात व्यत्यय आणणे, दगडफेक करून जखमी करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे यासारख्या आरोपांवरून खटला दाखल केला होता. सत्र न्यायालयाने या सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले होते. त्याविरुद्ध अपिलाची परवानगी मागणारा अर्ज न्या. अभय ठिपसे यांनी फेटाळून लावला. विशेष म्हणजे आरोपींविरुद्ध कोणताही पुरावा नाही. मुळात पोलीस ज्याला अटक करायला म्हणून तेथे गेले होते, त्याच्याविरुद्ध कोणताही गुन्हा नोंदविलेला नव्हता. त्यामुळे पोलिसांनी केलेली कारवाईच पूर्णपणे बेकायदा होती. एवढेच नव्हे तर हा खटला म्हणजे पोलिसांनी स्वत:ची बेकायदा कृती दडपण्यासाठी अरेरावीने रचलेले कुभांड आहे, या सत्र न्यायालयाच्या निष्कर्षांवर न्या. ठिपसे यांनी शतप्रतिशत शिक्कामोर्तब केले. नॅशनल मार्केटमधील भुल्लू या इसमाविरुद्ध किडवई मार्ग पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीवरून आम्ही तेथे गेलो. भुल्लूला पकडून परतत असताना व्यापारी व इतरांचा दोन-तीन हजारांचा जमाव जमला. जमावाने पोलिसांचा रस्ता अडविला व दगडफेक केली. या दंगलसदृश वातावरणात पकडलेला भुल्लू आमच्या ताब्यातून सुटून पळाला, असे कथानक पोलिसांनी रचले होते. सत्र न्यायालयाच्या पाठोपाठ आता उच्च न्यायालयानेही ते असंभवनीय ठरवून अमान्य केले आहे. (विशेष प्रतिनिधी)न्यायालयाने ओढलेले असूड..भुल्लूविरुद्ध कोणत्याही दखलपात्र गुन्ह्याची नोंद नव्हती. त्यामुळे त्याला धरून आणण्यासाठी पोलिसांनी नॅशनल मार्केटमध्ये जाणेच मुळात बेकायदा होते. जमावाने दगडफेक केली व त्यात पोलीस वाहनांचे नुकसान झाले आणि काही पोलीस जखमी झाले यास कोणताही पुरावा नाही.मोहम्मद इब्राहीम शेख हे त्या भागातील मान्यवर सामाजिक कार्यकर्ते आहेत. भुल्लू हा त्यांचा पुतण्या आहे. त्यामुळे पोलिसांनी भुल्लूला पकडल्यावर शेख यांनी मध्ये पडणे स्वाभाविक होते.खरेतर किडवई मार्ग पोलीस ठाण्याचे माजी निरीक्षक विलास जोशी यांचा शेख यांच्यावर डोळा होता. त्यामुळे कदाचित जोशी यांनीच हे पोलीस पथक पाठविले असावे, या समजातून व्यापारी व इतरांनी गर्दी करणे म्हणजे बेकयदा जमाव जमविणे होत नाही. मुळात पोलिसांना बेकायदा कृत्याचा जाब विचारणे हा त्यांच्या कामात व्यत्यय ठरत नाही.