शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

क्राइम ब्रँचची ‘लोणकढी थाप’!

By admin | Updated: August 27, 2015 02:43 IST

सुमारे आठ वर्षांपूर्वी मुंबईत रफी अहमद किडवई मार्गावरील नॅशनल मार्केटमध्ये एकाला अटक करायला गेलेल्या पोलीस पथकावर व्यापारी व इतरांच्या जमावाने हल्ला करून अटक

मुंबई : सुमारे आठ वर्षांपूर्वी मुंबईत रफी अहमद किडवई मार्गावरील नॅशनल मार्केटमध्ये एकाला अटक करायला गेलेल्या पोलीस पथकावर व्यापारी व इतरांच्या जमावाने हल्ला करून अटक केलेल्या आरोपीला त्यांनी सोडवून नेले, ही गुन्हे शाखेने मारलेली ‘लोणकढी थाप’ उच्च न्यायालयाच्याही पचनी पडलेली नाही.२४ आॅक्टोबर २००७ रोजी घडलेल्या या कथित घटनेवरून क्राइम ब्रँचच्या युनिट ४ ने सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद यासीन मोहम्मद इब्राहीम शेख यांच्यासह २२ जणांविरुद्ध बेकायदा जमाव जमविणे, दंगल करणे, पोलिसांच्या कामात व्यत्यय आणणे, दगडफेक करून जखमी करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे यासारख्या आरोपांवरून खटला दाखल केला होता. सत्र न्यायालयाने या सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले होते. त्याविरुद्ध अपिलाची परवानगी मागणारा अर्ज न्या. अभय ठिपसे यांनी फेटाळून लावला. विशेष म्हणजे आरोपींविरुद्ध कोणताही पुरावा नाही. मुळात पोलीस ज्याला अटक करायला म्हणून तेथे गेले होते, त्याच्याविरुद्ध कोणताही गुन्हा नोंदविलेला नव्हता. त्यामुळे पोलिसांनी केलेली कारवाईच पूर्णपणे बेकायदा होती. एवढेच नव्हे तर हा खटला म्हणजे पोलिसांनी स्वत:ची बेकायदा कृती दडपण्यासाठी अरेरावीने रचलेले कुभांड आहे, या सत्र न्यायालयाच्या निष्कर्षांवर न्या. ठिपसे यांनी शतप्रतिशत शिक्कामोर्तब केले. नॅशनल मार्केटमधील भुल्लू या इसमाविरुद्ध किडवई मार्ग पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीवरून आम्ही तेथे गेलो. भुल्लूला पकडून परतत असताना व्यापारी व इतरांचा दोन-तीन हजारांचा जमाव जमला. जमावाने पोलिसांचा रस्ता अडविला व दगडफेक केली. या दंगलसदृश वातावरणात पकडलेला भुल्लू आमच्या ताब्यातून सुटून पळाला, असे कथानक पोलिसांनी रचले होते. सत्र न्यायालयाच्या पाठोपाठ आता उच्च न्यायालयानेही ते असंभवनीय ठरवून अमान्य केले आहे. (विशेष प्रतिनिधी)न्यायालयाने ओढलेले असूड..भुल्लूविरुद्ध कोणत्याही दखलपात्र गुन्ह्याची नोंद नव्हती. त्यामुळे त्याला धरून आणण्यासाठी पोलिसांनी नॅशनल मार्केटमध्ये जाणेच मुळात बेकायदा होते. जमावाने दगडफेक केली व त्यात पोलीस वाहनांचे नुकसान झाले आणि काही पोलीस जखमी झाले यास कोणताही पुरावा नाही.मोहम्मद इब्राहीम शेख हे त्या भागातील मान्यवर सामाजिक कार्यकर्ते आहेत. भुल्लू हा त्यांचा पुतण्या आहे. त्यामुळे पोलिसांनी भुल्लूला पकडल्यावर शेख यांनी मध्ये पडणे स्वाभाविक होते.खरेतर किडवई मार्ग पोलीस ठाण्याचे माजी निरीक्षक विलास जोशी यांचा शेख यांच्यावर डोळा होता. त्यामुळे कदाचित जोशी यांनीच हे पोलीस पथक पाठविले असावे, या समजातून व्यापारी व इतरांनी गर्दी करणे म्हणजे बेकयदा जमाव जमविणे होत नाही. मुळात पोलिसांना बेकायदा कृत्याचा जाब विचारणे हा त्यांच्या कामात व्यत्यय ठरत नाही.