शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मुंबई-गोवा महामार्गावरील काँक्रिटीकरणाला गेले तडे; ठेकेदाराकडून मागविला अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2023 09:02 IST

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या प्रकरणात लक्ष घातल्याचे दिसत आहे

लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : मुंबई-गोवामहामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम काँक्रिटीकरणाच्या साहाय्याने करण्यात येत आहे. मात्र, काँक्रिटीकरण दर्जेदारपणे करण्यात येत नसल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते, तसेच वाहनचालकांकडून करण्यात येत आहे, तर निकृष्ट कामामुळे महामार्गाला तडे गेल्याचे निदर्शनास येत असून, याबाबत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कंत्राटदार कंपनीकडून अहवाल मागविला आहे. तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी जरी डिसेंबर २०२३ पर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होणार असल्याचे जाहीर केले असले तरी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणण्यानुसार हे काम मे २०२४ मध्ये पूर्ण होणार आहे, अशी माहिती मिळत आहे.

पळस्पे ते इंदापूरदरम्यान ८४ किलोमीटर लांबीचे मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम २०११ मध्ये सुरू झाले. मात्र, १२ वर्षांचा कालावधी उलटूनही महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण होऊ शकले नाही. सद्य:स्थितीत महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, ठिकठिकाणी छोटे-मोठे खड्डे पडले आहेत. सुरुवातीला पळस्पे ते इंदापूर दरम्यान चौपदरीकरणाचे काम डांबरीकरणाच्या माध्यमातून करण्यात येत होते. मात्र, सध्या चौपदरीकरण काँक्रिटीकरणाच्या साहाय्याने केले जात आहे. या कामाचे पळस्पे ते कासू आणि कासू ते इंदापूर असे दोन भाग केले आहे. त्यानुसार काँक्रिटीकरणाचे काम करताना सुमारे आठ इंच व्हाइट टॉपिंग (अस्तित्वात असलेल्या डांबरी फूटपाथला सिमेंट काँक्रीटच्या थराने झाकून) उंचीचे स्लॅब घातले आहेत.

व्हाइट टॉपिंग कार्यान्वित

 भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पनवेल ते कासू विभाग डिसेंबर २०२३ पर्यंत, तर कासू ते इंदापूर मे २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सध्या पनवेल ते कासू विभागाचा सुमारे १७ कि.मी., तर कासू ते इंदापूर दरम्यान सुमारे १.५५० कि.मी.च्या एका लेनवर व्हाइट टॉपिंग कार्यान्वित करण्यात आली आहे, अशी माहिती प्राधिकरणाचे उपमहाव्यवस्थापक वाय. एन. गोतकर यांनी दिली.

टॅग्स :Mumbaiमुंबईgoaगोवाhighwayमहामार्ग