शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

गोसंरक्षण करणारी व्यवस्था निर्माण होणे गरजेचे : मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 22:08 IST

उपयोगी पडणाऱ्या सर्व प्राणीमात्रांना मातृत्व देणे ही भारताची हजारो वर्षांची परंपरा..

ठळक मुद्देगायीचे महत्व विज्ञानावर सिद्ध झाल्याचा दावा

पुणे : देशी गायींचे महत्व आता विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध झाले आहे. मानवी जीवन तसेच शेतीसाठीही देशी गाय महत्वाची आहे. उपयोगी पडणाऱ्या सर्व प्राणीमात्रांना मातृत्व देणे ही भारताची हजारो वर्षांची परंपरा आहे, म्हणूनच गोमातेला वाचवणारी एक सक्षम यंत्रणा निर्माण होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.गो विज्ञान संशोधन संस्था व दादरा नगर हवेली मुक्ती संग्राम समिती यांच्या वतीने डीपी रस्त्यावरील शुभारंभ लॉन्स येथे भागवत यांच्या हस्ते मोरोपंत पिंगळे गोसेवा पुरस्कार देण्यात आले. समितीचे अध्यक्ष शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, संशोधन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र लुंकड, बापू कुलकर्णी, पुणे महानगर संघचालक रविंद्र वंजारवाडकर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. पिंगळे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे.भागवत म्हणाले, गायीचे महत्व आता विज्ञानाने सिद्ध केले आहे. देशी गायींवर आधारीत शेतीतून पिकणारे धान्य विषमुक्त होते, आता खतांमधून तयार होणारे धान्य विषयुक्त आहे. कत्तलखान्यात जाणाºया गायी वाचवल्या तर त्या पाळण्यासाठी कोणी तयार होत नाही. कत्तलखान्यात गायी नेणारेही हिंदू ठेकेदारच असतात. म्हणूनच  गो संरक्षण करणारी व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे व ते शक्य आहे.मोरोपंत पिंगळे हे अशक्य कामे करणारे व्यक्तीमत्व होते. सरस्वती नदीचा त्यांनी शोध लावला. १५ व्या शतकापासून राम मंदिर बांधण्याचा प्रयत्न होत होता, पिंगळे यांनी ते काम हाती घेतले व आता मंदिर बांधले जाणार आहे. गो संरक्षण हाही त्यांचाच ध्यास होता व तो आता प्रत्यक्षात येणार आहे असे भागवत म्हणाले. त्यांनी स्थापन केलेल्या संस्थांचा अल्पावधीतच देशभर विस्तार झाला, गो सेवा संस्था हाही त्याचाच एक भाग असून आता तर वैज्ञानिक प्रयोगांमधूनही गोमूत्र, शेण, यांचे शास्त्रीय महत्व सिद्ध झाले आहे असे त्यांनी सांगितले. कलकत्ता येथील गो सेवा संस्था, तळेगाव दाभाडे येथील ज्योती मुदरंगी,  भोसरी येथील अजित उदावंत, पुनम राऊत, शाम अगरवाल यांना गो सेवा पुरस्कार देण्यात आले. लुंकड यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. पुनम राऊत व मुदरंगी यांनी मनोगत व्यक्त केले. गो पूजन व रामदास सोंगटे यांनी म्हटलेले गो माता गौरव श्लोकाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. सुप्रिया अत्रे यांनी सुत्रसंचालन केले.  

टॅग्स :PuneपुणेcowगायMohan Bhagwatमोहन भागवतGovernmentसरकार