शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

मालेगावात काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम, महापौरांसह २८ नगरसेवक राष्ट्रवादीत, अजित पवारांनी दिला असा शब्द 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 16:00 IST

Malegaon Politics News: मालेगावमध्ये NCPने आपलाच मित्रपक्ष असलेल्या Congressचा करेक्ट कार्यक्रम केला आहे. मालेगावच्या महापौरांसह एकूण २८ नगरसेवकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांनी सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिला.

मुंबई - मालेगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आपलाच मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम केला आहे. मालेगावच्या महापौरांसह एकूण २८ नगरसेवकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. माजी आमदार रशिद शेख आणि महापौर ताहेरा शेख यांच्या नेतृत्वामध्ये हा पक्षप्रवेश झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिला. यावेळी पक्षांतर केलं म्हणजे आगीतून उठलो आणि फुफाट्यात पडलो, अशी वेळ मी तुमच्यावर येऊ देणार नाही, असा शब्दही अजित पवार यांनी या नगरसेवकांना दिला.

यावेळी अजित पवार म्हणाले की, तुम्ही सर्व नगरसेवकांनी शेख रशिद यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मी तुमचे आभार मानतो. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांच्यावतीने तसेच संपूर्ण पक्षाच्या मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. आगीतून उठलो आणि फुफाट्यात पडलो, अशी वेळ मी तुमच्यावर येऊ देणार नाही. एक चांगल्या पद्धतीने आधार देण्याचं काम एकमेकांनी करायचं आहे. तसं काम होईल, अशी ग्वाही मी तुम्हाला देतो, असे अजित पवार यांनी सांगितले.

आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेशावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, नवाब मलिक आदी नेते उपस्थित होते. यावेळी मालेगावच्या महापौरांसह इतर सर्व नगरसेवकांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला. हा पक्षप्रवेश म्हणजे काँग्रेसला मालेगावमध्ये बसलेला मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, काँग्रेसला सोडचिठ्ठी देताना रशिद शेख यांनी काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांवर गंभीर आरोप केला होता. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. मात्र बाळासाहेब थोरात वगळता कुठल्याही मंत्र्याकडून आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे आम्ही नाराज होते. ऊर्जा मंत्रालय कांग्रेसकडे होते. मात्र मालेगावसाठी काहीही निर्णय झाला नाही. या सर्व कारणांमुळे आम्ही काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले होते.  

टॅग्स :MalegaonमालेगांवNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसAjit Pawarअजित पवार