शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
2
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
3
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
4
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
5
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
6
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
7
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
8
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
9
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
10
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
11
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
12
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
13
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
14
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
15
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
16
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...
17
राहुल गांधींचे आव्हान भाजपने स्वीकारले; खुल्या चर्चेसाठी 'या' नेत्याची केली निवड...
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
RR ला मोठा धक्का; स्टार खेळाडूची IPL 2024 मधून माघार, Play Off ची जागा पक्की होण्यापूर्वी झटका
20
Dust Storm: मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प

Coronavirus: राज्यात 5 जण निरीक्षणाखाली; 25 जणांना घरी सोडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2020 9:43 PM

राज्यात चीन व कोरोनाबाधित भागातून आलेल्या व्यक्तींना भेदभावाची वागणूक देऊ नये; आरोग्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये आज 5 जणांना रुग्णालयात निरीक्षणाखाली दाखल करण्यात आले आहे. पुणे येथे तीन जणांना तर अहमदनगर व जळगाव येथे प्रत्येकी एक जण भरती करण्यात आला आहे. आतापर्यंत राज्यामध्ये 25 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, कोरोना संबंधी सोशल मीडियावर विविध अफवा पसरवल्या जात आहे. त्यावर विश्वास ठेऊ नये, चीन व कोरोना बाधित भागातून आलेल्या व्यक्तींना भेदभावाची वागणूक देऊ नये, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केले.

कोरोना बाधित भागातून येणाऱ्या व्यक्तींना कामावर रुजू करुन घेताना त्यांच्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्र किंवा प्रयोगशाळा अहवालाची मागणी केली जाते. हे चुकीचे आहे. अशा व्यक्तींची आरोग्य विभागामार्फत 14 दिवसांपर्यंत दैनंदिन सर्वेक्षण केले जाते. या काळात कोणतीही लक्षणे आढळलेल्या व्यक्तींना तपासणीची गरज नाही. त्यांच्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्र मागू नये असे आवाहनदेखील आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.

१८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आतापर्यंत ३० जणांना भरती करण्यात आले आहे. यातील ५ प्रवासी आज भरती झाले आहेत. यातील ३ जण नायडू रुग्णालयात  तर प्रत्येकी  १ जण जिल्हा रुग्णालय अहमदनगर आणि जळगाव येथे भरती करण्यात आला आहे. आता पर्यंत २५ जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आल्याचे एन आय व्ही पुणे यांनी कळवले आहे. आज भरती झालेल्या ५ ही जणांचे नमुने आज प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले असून त्यांचे अहवाल उद्यापर्यंत प्राप्त होतील. आज नायडू रुग्णालयात भरती झालेल्या ३ रुग्णांपैकी एक चिनी नागरिक आहे.

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनसोशल मीडिया वर करोना विषयी विविध अफवा पसरत आहेत, त्यावर विश्वास ठेवू नये. विशेषतः चिकन खाल्ल्याने किंवा मांसाहार केल्याने कोरोनाची बाधा होऊ शकते असे संदेश फिरताना दिसत आहेत. या प्रकारच्या संदेशामध्ये काहीही तथ्य नाही. आरोग्याच्या दृष्टीने मांसाहार करताना तो पूर्णपणे शिजलेला असावा, कच्चे किंवा अर्धवट शिजलेले मांस खाऊ नये, हे महत्वाचे आहे. सोशल मिडियावरील प्रत्येक बाबीची अधिकाधिक स्त्रोतांमार्फत खातरजमा करावी, असेही आवाहन विभागामार्फत करण्यात येत आहे.

बाधित भागातून येणा-या व्यक्तींना भेदभावाची वागणूक नकोचीन किंवा इतर करोना बाधित भागातून येणा-या व्यक्तींना कामावर रुजू करुन घेताना भेदभावाची वागणूक दिली जाते, असे लक्षात आले आहे. अनेक कंपन्यांमध्ये या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रमाणपत्राची किंवा प्रयोगशाळा अहवालाची मागणी केली जाते, हे चुकीचे आहे. बाधित भागातून येणाऱ्या व्यक्तींनी १४ दिवस घरी थांबावे आणि त्या काळात आरोग्य विभागामार्फत त्यांचे दैनंदिन सर्वेक्षण करण्यात येते. या काळात कोणतेही लक्षण न आढळलेल्या व्यक्तींना कोणत्याही तपासणीची गरज नाही. त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र अथवा प्रयोगशाळा तपासणी अहवाल मागण्याची काहीही आवश्यकता नाही.

बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण १३५ प्रवाशांपैकी ५७ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत १६ हजार ६३ प्रवासी तपासण्यात आले आहेत, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना