शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

coronavirus: निमलष्करी दल पाठवा; राज्याची विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 06:43 IST

निमलष्करी दलामध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांतर्गतचे केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), केंद्रीय औद्योगिक पोलीस दल (सीआयएसएफ), सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), इंडो तिबेटियन बॉर्डर फोर्स आणि दिल्ली पोलीस यांचा समावेश असतो.

मुंबई : राज्यात कोरोनामुळे पोलीस दलावर आलेला कामाचा भार पाहता कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने निमलष्करी दलाच्या २० तुकड्या पाठविण्याची मागणी राज्य शासनाने केंद्रीय गृहमंत्रालयाकडे केली आहे.निमलष्करी दलामध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांतर्गतचे केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), केंद्रीय औद्योगिक पोलीस दल (सीआयएसएफ), सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), इंडो तिबेटियन बॉर्डर फोर्स आणि दिल्ली पोलीस यांचा समावेश असतो.राज्याने मागणी केल्यानंतर या पाचपैकी कोणत्याही एका दलाचे जवान पाठवायचे की, वेगवेगळ्या दलांचे जवान पाठवायचे, याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालय करीत असते. एका तुकडीमध्ये २०० जवान असतात.आपण २० तुकड्या मागितल्या आहेत, याचा अर्थ दोन हजार जवानांची मागणी आपण केलेली आहे. निमलष्करी दल हे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या, तर लष्कर हे संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येते. आम्हाला लष्कराची गरज नाही.राज्यातील प्रत्येक नागरिकच सैनिक बनून कोरोनाचा मुकाबला करील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच म्हटले आहे.पोलिसांचे मनोबल अजिबात खचलेले नाही : देशमुखराज्यातील दोन लाखांवर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आज कोरोनाच्या संकटाचा प्राणपणाने मुकाबला करीत आहेत. त्यांचे मनोबल तसूभरही कमी झालेले नाही. ते अत्यंत सक्षम आहेत; पण त्यांना विश्रांतीची कुठे ना कुठे गरज आहे.पोलीस दलातील काही अधिकारी, कर्मचारी यांनादेखील कोरोनाची बाधा झालेली आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था परिस्थिती या पार्श्वभूमीवरकेंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची मागणी केली आहे, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. ते म्हणाले की, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या जवानांचा उपयोग मुख्यत्वे कंटेनमेंट झोन तसेच कायदा व सुव्यवस्थेची स्थिती उत्पन्न झाल्यास त्या ठिकाणी केला जाईल.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार