शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

EMI दिलासा ठरणार आतबट्ट्याचा; SBI सह अन्य बँकांचे 'गणित' पाहून डोळे पांढरे होतील

By हेमंत बावकर | Published: April 01, 2020 4:32 PM

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी ग्राहकांना तीन महिने ईएमआय न भरण्यापासून सूट दिली आहे. या बँकांनी आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी शुक्रवारी दिलेल्या सूचनांचे पालन केले आहे.

मुंबई : रिझर्व्ह बँकेने लॉकडाऊन आणि कोरोनाच्या संकटामुळे गृह, वाहन आदी कर्जदारांना तीन महिन्यांचा ईएमआय दिलासा देण्यास सांगितले होते. यावर मंगळवारी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी ग्राहकांना तीन महिन्यांचा ईएमआय दिलासा दिला आहे. म्हणजेच तुमच्या कर्जाचा हप्ता घेण्यात येणार नाही. यामुळे कर्जदारांना हायसे वाटू लागले आहे. पण ही बातमी वाचल्यानंतर त्यांची झोपच उडणार आहे. 

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी ग्राहकांना तीन महिने ईएमआय न भरण्यापासून सूट दिली आहे. या बँकांनी आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी शुक्रवारी दिलेल्या सूचनांचे पालन केले आहे. दास यांनी रिटेल आणि कृषी कर्जासह अन्य टर्म लोनचे हप्ते तीन महिने घेऊ नयेत असे आवाहन बँकांना केले होते. आता बँकांनी हे हप्ते मुदतवाढ करून भरण्याची सोय दिली आहे. पंजाब नॅशनल बँक, एसबीआय, बँक ऑफ बड़ोदा, युनिअन बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, कॉर्पोरेशन बँक, इंडियन बँक, यूको बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, आँध्र बँक, इंडियन ओवरसीज बँक, सिंडिकेट बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, अलाहाबाद बँक, बँक ऑफ इंडिया आणि आयडीबीआय बँकांनीही तीन महिने ईएमआय न घेण्याचा निर्णय घेतला आहे. एका दृष्टीने हा गरजवंतांसाठी दिलासा असला तरीही तो आतबट्ट्याचा व्यवहार ठरणार आहे. यामुळे ग्राहकांवर पश्चातापाची वेळ येणार आहे. कसे ते पहा. 

आरबीआयच्या सूचना सर्वात आधी एसबीआय ही देशातील सर्वात मोठी बँक अंमलात आणते. पण या बँकेनेच ही माहिती देऊन ईएमआय दिलासा घेऊ इच्छिणाऱ्यांची झोप उडविली आहे. एसबीआयने त्यांच्या वेबसाईटवर एक लिंक दिली आहे. यावर त्यांनी हा ईएमआय दिलासा म्हणजेच न भरण्याची सूट दिल्याचे म्हटले आहे. तसेच ही योजना कशी लागू होईल याबाबतही सांगितले आहे. यामध्ये त्यांनी वाहन आणि गृह कर्ज अशी दोन उदाहरणे दिली आहेत. 

 

  • जर तुम्ही ६ लाखांचे वाहन कर्ज ५४ महिन्यांच्या मुदतीचे घेतले असेल आणि आरबीआयनुसार तीन महिन्यांचा दिलासा घेतला तर तुमच्या कर्जाला मुदतवाढ मिळणार आहे. तसेच या काळातील एकूण कर्जाच्या रकमेवर तब्बल १९००० रुपये व्याज आकरले जाण्याची शक्यता आहे. ही रक्कम तुमच्या कारच्या हप्त्याच्या दीड पट असणार आहे. 
  • जर तुम्ही ३० लाखांचे १५ वर्षांच्या मुदतीचे गृहकर्ज घेतले असेल तर तुम्हाला तीन महिन्यांचे एकून कर्जाच्या रकमेचे व्याजच २.३४ लाख रुपये भरावे लागणार आहे. हे व्याज म्हणजे तुमचे घराचे ८ हप्ते असणार आहे.

एकूणच काय तर तुम्ही तीन हप्ते टाळण्यासाठी किंवा सूट घेण्याचा हव्यास धरलात तर वाहनाचे दीड महिन्याचाच EMI दिलासा मिळणार आहे. तर घराचे कर्ज असलेल्यांना तर तीन महिन्यांचे हप्ते आणि व्याजाचे ८ महिन्यांचे हप्ते असे ११ हप्ते जादा भरावे लागणार आहेत. 

हा  EMI दिलासा कोणी घ्यावा? गणित एकदम सोपे आहे. यामुळे जर गरज असले, तुमची नोकरी, रोजगार गेला असेल तरच EMI दिलाश्याचा लाभ घेणे सोईचे होणार आहे. अन्यथा हा व्यवहार आतबट्ट्याचाच ठरणार आहे. 

फायदे कोणते? ईएमआय दिसासा देण्याचे दोन फायदे आहेत. जर लॉकडाऊन काळात हप्ते भरण्याची ताकद नसेल तर तेवढा दिलासा मिळणार आहे. दुसरा म्हणजे हप्ता चुकला तरीही सिबिल स्कोअरवर त्याची नोंद होणार नाही. हा प्रकार केवळ एसबीआयच नाही तर अन्य बँकांकडूनही केला जाणार आहे. यामुळे जर गरज नसेल तर तीन महिन्यांचा दिलासा न घेणेच परवडणारे आहे. 

EMI ला तीन महिन्यांचा दिलासा म्हणजे नेमके काय? जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकSBIएसबीआयbankबँक