शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
5
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
6
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
7
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
8
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
9
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
10
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
11
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
12
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
13
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
14
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
15
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
16
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
17
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
18
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
19
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
20
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : राज्यातील आकडेवारी नवजात बालक ते १० वर्षांपर्यंतच्या १ लाखाहून अधिक मुलांना कोरोना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2021 07:21 IST

CoronaVirus News: सर्वाधिक संसर्ग हा ३१ ते ४० वयोगटात झाला असून, ही रुग्णसंख्या ७ लाख १२ हजार २१५ इतकी आहे. राज्याच्या एकूण रुग्णसंख्येत ती २१.५३ टक्के आहे.

मुंबई : काेरोनाच्या दुसऱ्या लाटेतील संसर्गाचा वेग जास्त असून, तरुण, वृद्धांसोबतच लहान मुलांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढल्याचे धक्कादायक निरीक्षण समोर आले आहे. दररोज येणाऱ्या नव्या बाधितांमध्ये सरासरी ५ ते ७ टक्के रुग्ण ही लहान बालके असल्याचे आढळून आले आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अहवालानुसार, राज्यात नवजात बालक ते दहा वर्षांपर्यंतच्या १ लाख १ हजार ८०९ बालकांना कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोनाच्या एकूण रुग्णसंख्येत हे प्रमाण ३.०९ टक्के आहे.११ ते २० वयोगटात २ लाख २० हजार १०४ मुला-मुलींना कोरोना झाला असून, राज्यातील काेराेनाच्या एकूण रुग्णसंख्येत हे प्रमाण ६.०६ टक्के आहे. सर्वाधिक संसर्ग हा ३१ ते ४० वयोगटात झाला असून, ही रुग्णसंख्या ७ लाख १२ हजार २१५ इतकी आहे. राज्याच्या एकूण रुग्णसंख्येत ती २१.५३ टक्के आहे.पहिल्या लाटेत लहान मुलांना काेरोना होण्याचे प्रमाण कमी होते; परंतु आता हे प्रमाण वाढले आहे. काेरोनाचा नवा स्ट्रेन तीव्र स्वरूपाचा, लवकर पसरणारा आणि मृत्यूचे प्रमाण वाढविणारा आहे. पालक लहान मुलांना घराबाहेर घेऊन जातात.    आवारात मुलांची गर्दी जमताना पहायला मिळत आहे. मुले एकत्र खेळतात. यामुळे त्यांना संसर्ग होण्याचे प्रमाण आता वाढले आहे. शिवाय कोरोना विषाणूनेही स्वरूप बदलल्याचा फटका लहान मुलांना बसू लागल्याचे मत बालरोगतज्ज्ञांनी व्यक्त केले.

अशी घ्या काळजीमुलांनी हात चांगले धुतले की नाही हे पाहावे. त्यांना साबण, कोमट पाणी आणि अल्कोहोलयुक्त हँड सॅनिटायझरने हात स्वच्छ करायला सांगावे. तोंडाला चांगल्या प्रकारचा मास्क लावावा. शक्य ताे त्यांना बाहेर नेऊ नये. बाहेर गेल्यास मुले ताेंडाला लावलेला मास्क काढणार नाहीत याची काळजी घ्यावी. आपल्या बोटांनी डोळे, नाक आणि तोंडाला सतत स्पर्श करू नये. प्राण्यांपासून लांब राहावे, मिठाचे सेवन करणे टाळावे. बाहेरचे खाद्यपदार्थ घेणे टाळावे. शिंकताना, खोकताना तोंडावर रुमालाचा वापर करावा. भरपूर पेय घेणे. भरपूर विश्रांती घ्यावी.

पालकांनी अधिक जबाबदारीने वागणे गरजेचेकोरोनाच्या पहिल्या लाटेत दोन टक्के मुले पॉझिटिव्ह येत होती. आता ही संख्या ७ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. याचे एक कारण व्हायरसमध्ये झालेले म्युटेशन असू शकते. गेल्या वर्षीच्या तुलनेत आता मुले लोकांमध्ये जास्त मिसळू लागली आहेत. कामानिमित्त बाहेर असणाऱ्या मोठ्या व्यक्तींशी मुलांचा संपर्क वाढला आहे. त्यातल्या त्यात दिलासा म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, मुलांमध्ये इतर वयोगटांच्या तुलनेत काेराेना मृत्यूदर फार कमी आहे. पालकांनी अधिक जबाबदारीने वागणे गरजेचे आहे.- डॉ. किशोर दालमिया, बालरोगतज्ज्ञ 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस