शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

CoronaVirus News : राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९० टक्क्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2020 06:11 IST

CoronaVirus News : राज्यात दिवसभरात ५ हजार ५४८ रुग्ण आणि ७४ मृत्यूंची नोंद झाली आहे. कोरोनाबाधितांची संख्या १६ लाख ७८ हजार ४०६ वर पोहोचली असून, बळींचा आकडा ४३ हजार ९११ वर पोहोचला आहे.

मुंबई : राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाला सात महिन्यांचा काळ लोटला आहे. मोठ्या कालावधीनंतर शनिवारी कोरोनामुक्तीचा दर तब्बल ९० टक्क्यांवर येऊन पोहोचला आहे. राज्यात शनिवारी ७ हजार ३०३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत १५ लाख १० हजार ३५३ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. राज्यात सध्या १ लाख २३ हजार ५८५ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात दिवसभरात ५ हजार ५४८ रुग्ण आणि ७४ मृत्यूंची नोंद झाली आहे. कोरोनाबाधितांची संख्या १६ लाख ७८ हजार ४०६ वर पोहोचली असून, बळींचा आकडा ४३ हजार ९११ वर पोहोचला आहे. सध्या राज्यात २५ लाख ३७ हजार ५९१ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून, १२ हजार ३४२ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.राज्याचा मृत्युदर सध्या २.६२ टक्के असून नोंद झालेल्या ७४ मृत्यूंमध्ये मुंबई ३२, ठाणे ३, ठाणे मनपा १, नवी मुंबई मनपा २, वसई विरार मनपा १, पनवेल मनपा १, नाशिक १, जळगाव २, पुणे १, पुणे मनपा ६, सोलापूर ३, सांगली ३, जालना २, परभणी १, बीड १, नांदेड १, नांदेड मनपा २, चंद्रपूर २, अकोला १, अकोला मनपा १, यवतमाळ २, बुलडाणा १, नागपूर १, नागपूर मनपा ३ या रुग्णांचा समावेश आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMaharashtraमहाराष्ट्र