शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

CoronaVirus News: राज्यातील लॉकडाऊन वाढणार?; सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 12:25 IST

कोरोना संकटाला रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांची सर्वपक्षीय नेत्यांसोबत चर्चा

मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काल सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सगळ्या नेत्यांनी केलेल्या सूचना ऐकल्या. आता मे अखेरपर्यंत काळजी घेऊन आपल्याला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू द्यायचा नाही, अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी राज्यातील लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत दिले. आपण सगळे एकजुटीनं हे संकट दूर करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांशी काल मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. या बैठकीत सर्वच नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना काही सूचना केल्या. कोरोनाचा संकटाचा सामना करण्यासाठी घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती यावेळी सरकारकडून देण्यात आली. ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळालेला नाही, त्यांना पीककर्ज मिळावे म्हणून रिझव्‍‌र्ह बँकेशी बोलणे सुरू आहे. बियाणं व खरीप हंगाम व्यवस्थित मार्गी लावावा म्हणून चांगलं नियोजन केलं आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.मुंबई आणि राज्यातील आरोग्य परिस्थितीवर अधिक लक्ष देण्याची गरज असून रुग्णालय व्यवस्थापनात सुधारणा करण्याची गरज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. केंद्राकडे अधिकाधिक रेल्वे मागितल्या पाहिजेत. पोलिसांचं नैतिक बळ वाढवायला हवं. आपली अर्थव्यवस्था सुरू करताना क्षेत्रनिहाय तज्ज्ञांचे गट करावेत आणि गटनिहाय विविध उद्योग व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न करावा. विरोधी पक्ष म्हणून आम्ही पूर्णपणे पाठीशी आहोत. आमच्याकडून राजकारण होणार नाही, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.परप्रांतीय मजूर पुन्हा राज्यात येतील. तेव्हा त्यांची स्थलांतरित कायद्यांतर्गत नोंद करण्यात यावी, अशी आग्रही मागणी राज ठाकरेंनी केली. परप्रांतीयांमुळे इथल्या सोयी सुविधांवर ताण येतो. त्यामुळे गोंधळ निर्माण होतो, हे आपण पाहिलं आहे. आता कोरोना संकटाच्या निमित्तानं परप्रांतीय मजूर राज्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे निर्माण झालेला गोंधळ दूर करण्याची हीच ती वेळ, असं राज ठाकरे म्हणाले. परप्रांतीय मजूर पुन्हा राज्यात येताना त्यांची नोंद व्हायला हवी, असं राज यांनी म्हटलं.पालघर रेड झोनमध्ये येतं. पण याठिकाणी आदिवासी भागही आहे. त्यांचे हाल सुरू आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी सकाळ, संध्याकाळ अशा रीतीने उपनगरी रेल्वेसेवा काही प्रमाणात तरी सुरू करावी, अशी मागणी बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केली. तर रिक्षा, हातगाड्या घेतलेल्यांचे कर्जाचे हप्ते थकले आहेत. ते पुनर्गठित करावेत, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRaj Thackerayराज ठाकरे