शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

Coronavirus: "कोरोना संकटात उद्धव ठाकरे घराबाहेर पडतच नाहीत, शपथविधीला मात्र सहकुटुंब गेले"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 20:50 IST

''शेतकऱ्यांना वाचवणार, कर्जमाफी देणार, चिंतामुक्त करणार अशा घोषणा करणारं सरकार शेतकऱ्यांकडे बघायलाही तयार नाही''- गिरीश महाजन

ठळक मुद्देराज्य सरकार कोरोना संकट हाताळण्यात सपशेल अपयशी ठरल्याची टीका भाजपाकडून करण्यात येत आहे. सरकारच्या निष्क्रियतेविरोधात प्रदेश भाजपानं 'महाराष्ट्र बचाओ' अभियानाची घोषणाही केलीय. माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा दररोज वाढणारा आकडा सगळ्यांचीच काळजी वाढवतोय. सोमवारी राज्यातील कोरोनारुग्णांच्या संख्येनं ३५ हजारांचा टप्पा ओलांडलाय. संसर्गाचा हा वेग लक्षात घेऊनच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन-४ जाहीर केलाय, पण तरीही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होतेय. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकार कोरोना संकट हाताळण्यात सपशेल अपयशी ठरल्याची टीका भाजपाकडून करण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यपालांना भेटून, सरकारच्या कामगिरीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. तसंच, प्रदेश भाजपानं 'महाराष्ट्र बचाओ' अभियानाची घोषणाही केलीय. त्यामुळे राजकीय वर्तुळात शाब्दिक चकमक रंगण्याची चिन्हं दिसत असतानाच, माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारकीची शपथ घेतली. मुख्यमंत्रिपदी कायम राहिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. मात्र, राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ज्या पद्धतीने काम व्हायला हवे, तसे होताना दिसत नाही. मुख्यमंत्री तर घराच्या बाहेर निघत नाहीत. विधानपरिषद सदस्यत्वाच्या शपथविधीसाठी ते सहकुटुंब बाहेर पडल्याचं पाहिलं. पण, कोरोनाशी संबंधित मीटिंगसाठी किंवा कुठल्या अडचणींबाबत ते कुणालाही भेटत नाहीत, असा टोला गिरीश महाजन यांनी लगावला.

ठाकरे सरकारचं मंत्रिमंडळही घरात बसून आहे. रस्त्यावर कुणी येत नाही. कुणी हॉस्पिटलला जाताना दिसत नाही की कोरोना वॉरियर्सचं मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न करत नाही. नुसतेच घरात बसून बाईट दिले जात आहेत. सरकारच्या कुठल्याच खात्यात समन्वय नाही, केंद्राच्या पॅकेजचा फायदा घेण्यातही ते अपयशी ठरलेत, असं टीकास्त्र त्यांनी सोडलं.

महाराष्ट्रातील आकडा आत्तापेक्षा दुप्पट किंवा तिप्पट वाढू शकतो. त्यात पावसाळा येतोय. मुंबई, पुण्यात परिस्थिती आणखी बिघडू शकते. अशावेळी, रुग्णांना कसा दिलासा देणार?, त्यांच्यावर कसे उपचार करणार?, हे सरकारने सांगावं. अजूनही वेळ गेलेली नाही, लवकरात लवकर उपाययोजना केल्यास निश्चित फायदा होऊ शकतो, असंही महाजन यांनी नमूद केलं. विरोधी पक्षाने सहकार्याची भूमिका घेतलीय, पण सरकारकडून प्रतिसादच मिळत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

गिरीश महाजन यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. कोरोना संकटाचा मुकाबला करणाऱ्या जळगावकरांच्या मागण्यांचं निवेदन त्यांनी सादर केलं. त्यानंतर, प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारला लक्ष्य केलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांना वाचवणार, कर्जमाफी देणार, चिंतामुक्त करणार अशा घोषणा केल्या. पण आज त्यांचं सरकार शेतकऱ्यांकडे बघायलाही तयार नाही, अशी चपराक त्यांनी लगावली.

हेही वाचाः

मोदींना पत्र लिहिणाऱ्या पवारांनी उद्धव ठाकरेंनाही पत्र पाठवावं; फडणवीसांचा टोला

कोरोनाला रोखण्यात राज्य सरकार अपयशी, राज्यपालांची भेट घेत भाजपाच्या शिष्टमंडळाचा आरोप

कोरोना इतक्या लवकर हद्दपार होणार नाही, शरद पवारांकडून मुख्यमंत्र्यांना काही सूचना

...अन्यथा आपल्या ‘कोरोना योद्धे’ म्हणण्याला अर्थ नाही; अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

... म्हणून मी लॉकडाऊन वाढवला, उद्धव ठाकरेंची नागरिकांना भावनिक साद

जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री ठाकरेंकडून मोदींचा खास उल्लेख; म्हणाले...

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUddhav Thackerayउद्धव ठाकरेGirish Mahajanगिरीश महाजनDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv Senaशिवसेना