शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

Coronavirus: "कोरोना संकटात उद्धव ठाकरे घराबाहेर पडतच नाहीत, शपथविधीला मात्र सहकुटुंब गेले"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 20:50 IST

''शेतकऱ्यांना वाचवणार, कर्जमाफी देणार, चिंतामुक्त करणार अशा घोषणा करणारं सरकार शेतकऱ्यांकडे बघायलाही तयार नाही''- गिरीश महाजन

ठळक मुद्देराज्य सरकार कोरोना संकट हाताळण्यात सपशेल अपयशी ठरल्याची टीका भाजपाकडून करण्यात येत आहे. सरकारच्या निष्क्रियतेविरोधात प्रदेश भाजपानं 'महाराष्ट्र बचाओ' अभियानाची घोषणाही केलीय. माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा दररोज वाढणारा आकडा सगळ्यांचीच काळजी वाढवतोय. सोमवारी राज्यातील कोरोनारुग्णांच्या संख्येनं ३५ हजारांचा टप्पा ओलांडलाय. संसर्गाचा हा वेग लक्षात घेऊनच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन-४ जाहीर केलाय, पण तरीही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होतेय. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकार कोरोना संकट हाताळण्यात सपशेल अपयशी ठरल्याची टीका भाजपाकडून करण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यपालांना भेटून, सरकारच्या कामगिरीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. तसंच, प्रदेश भाजपानं 'महाराष्ट्र बचाओ' अभियानाची घोषणाही केलीय. त्यामुळे राजकीय वर्तुळात शाब्दिक चकमक रंगण्याची चिन्हं दिसत असतानाच, माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारकीची शपथ घेतली. मुख्यमंत्रिपदी कायम राहिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. मात्र, राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ज्या पद्धतीने काम व्हायला हवे, तसे होताना दिसत नाही. मुख्यमंत्री तर घराच्या बाहेर निघत नाहीत. विधानपरिषद सदस्यत्वाच्या शपथविधीसाठी ते सहकुटुंब बाहेर पडल्याचं पाहिलं. पण, कोरोनाशी संबंधित मीटिंगसाठी किंवा कुठल्या अडचणींबाबत ते कुणालाही भेटत नाहीत, असा टोला गिरीश महाजन यांनी लगावला.

ठाकरे सरकारचं मंत्रिमंडळही घरात बसून आहे. रस्त्यावर कुणी येत नाही. कुणी हॉस्पिटलला जाताना दिसत नाही की कोरोना वॉरियर्सचं मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न करत नाही. नुसतेच घरात बसून बाईट दिले जात आहेत. सरकारच्या कुठल्याच खात्यात समन्वय नाही, केंद्राच्या पॅकेजचा फायदा घेण्यातही ते अपयशी ठरलेत, असं टीकास्त्र त्यांनी सोडलं.

महाराष्ट्रातील आकडा आत्तापेक्षा दुप्पट किंवा तिप्पट वाढू शकतो. त्यात पावसाळा येतोय. मुंबई, पुण्यात परिस्थिती आणखी बिघडू शकते. अशावेळी, रुग्णांना कसा दिलासा देणार?, त्यांच्यावर कसे उपचार करणार?, हे सरकारने सांगावं. अजूनही वेळ गेलेली नाही, लवकरात लवकर उपाययोजना केल्यास निश्चित फायदा होऊ शकतो, असंही महाजन यांनी नमूद केलं. विरोधी पक्षाने सहकार्याची भूमिका घेतलीय, पण सरकारकडून प्रतिसादच मिळत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

गिरीश महाजन यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. कोरोना संकटाचा मुकाबला करणाऱ्या जळगावकरांच्या मागण्यांचं निवेदन त्यांनी सादर केलं. त्यानंतर, प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारला लक्ष्य केलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांना वाचवणार, कर्जमाफी देणार, चिंतामुक्त करणार अशा घोषणा केल्या. पण आज त्यांचं सरकार शेतकऱ्यांकडे बघायलाही तयार नाही, अशी चपराक त्यांनी लगावली.

हेही वाचाः

मोदींना पत्र लिहिणाऱ्या पवारांनी उद्धव ठाकरेंनाही पत्र पाठवावं; फडणवीसांचा टोला

कोरोनाला रोखण्यात राज्य सरकार अपयशी, राज्यपालांची भेट घेत भाजपाच्या शिष्टमंडळाचा आरोप

कोरोना इतक्या लवकर हद्दपार होणार नाही, शरद पवारांकडून मुख्यमंत्र्यांना काही सूचना

...अन्यथा आपल्या ‘कोरोना योद्धे’ म्हणण्याला अर्थ नाही; अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

... म्हणून मी लॉकडाऊन वाढवला, उद्धव ठाकरेंची नागरिकांना भावनिक साद

जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री ठाकरेंकडून मोदींचा खास उल्लेख; म्हणाले...

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUddhav Thackerayउद्धव ठाकरेGirish Mahajanगिरीश महाजनDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv Senaशिवसेना