शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: 'त्याला काय होतंय...' या वृत्तीनेच घात केला; सातारा, सांगली, कोल्हापुरात कोरोना वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 10:11 IST

सातारा, सांगली, कोल्हापुरात म्हणूनच वाढला कोरोना; पुणे-मुंबईकरांचा राबता बाधला

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जबरदस्त तडाखा पश्चिम महाराष्ट्राला बसला. त्यातही सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील वाढता संसर्ग कमी होण्याचे नाव घेत नसल्याने प्रशासनाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. आजही हे तीनही जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. या दुरवस्थेच्या अनेक कारणांपैकी निर्बंधांना झुगारून पुण्या-मुंबईहून दाखल झालेली गर्दी हे एक प्रमुख कारण असल्याच्या चर्चेने आता जोर धरला आहे. १४ एप्रिल रोजी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर उन्हाळ्याची सुटी गावीच घालवण्याच्या इराद्याने खासगी ट्रॅव्हल्स, जीप, अगदी रिक्षानेसुद्धा कुटुंबे आली आणि संसर्ग वाढत गेला.सातारा- पाहुण्यांची गर्दीसातारा : कोरोनाच्या पहिल्या लाटेत सुरक्षित असलेला ग्रामीण भाग दुसऱ्या लाटेत मात्र अक्षरश: पिळवटून निघाला. मुंबई-पुण्याहून खासगी ट्रॅव्हल्स तुडुंब भरून रातोरात ग्रामीण भागात येत आहेत. यातील एकाही प्रवाशाची प्रशासनाकडे नोंद नाही, ना त्यांची चाचणी केली गेली. निर्बंध झुगारून परजिल्ह्यातून आलेल्यांचा संसर्ग वाढण्याला मोठा हातभार लागत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. परजिल्ह्यातून येणाऱ्यांना कोणीही ई-पास मागत नाही की, तुम्हाला परवानगी आहे का, याची विचारणा करत नाही. याचे आश्चर्य गावकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. दुसऱ्या लाटेत गावपातळीवरील समित्याही कार्यरत नव्हत्या. त्यामुळे अशा लोकांना आणखी मोकळे रान मिळाले. गतवर्षी ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा फैलाव फारसा नव्हता. पुणे- मुंबईहून आलेल्या प्रवाशांमुळे यावेळी संसर्ग वाढला. त्यांना गतवर्षीसारखे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले नव्हते. याचे गंभीर परिणाम भोगावे लागत आहेत.    -उत्तम वाघ,     रा. तारळे, जि. सातारागतवर्षी गावामध्ये बांबू आडवे लावून वाहतूक अडवण्यात आली होती; पण यंदा असे काहीच केले नाही. त्यामुळे पुणे- मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त होती.    -संदीप साळुंखे, रा. कडवे बुद्रुक, ता. पाटण, जि. साताराकोल्हापूर- गृह विलगीकरण महागातकोल्हापूर : कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी जितके गांभीर्य गावागावात पाळले गेले, तेवढे गांभीर्य दुसऱ्या लाटेवेळी पाळले गेले नाही हे वास्तव आहे. कोरोनाचा संसर्ग वाढण्यासाठी गृह विलगीकरण नसणे हे महत्त्वाचे कारण ठरले आहे. पुणे, मुंबईसह बाहेरच्या शहरांतून आलेले नागरिक थेट घरातच राहिले. त्यांच्या कोणत्याही चाचण्या झाल्या नाहीत. मे महिन्यात जिल्ह्यात ५० हजार नागरिक पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये गृहीत धरलेल्या गावातील संख्या अधिक आहे. कारण पॉझिटिव्ह रुग्ण घरात राहिल्यानंतर शिस्त पाळली गेली नाही. ते घरातीलच इतरांच्या संपर्कामध्ये आले आणि घरचे बाहेर फिरत राहिले. परिणामी संख्या वाढतच राहिली. प्रभाग समित्या, ग्राम समित्यांनीही प्रभावीपणे काम केले नाही. जिल्ह्यातील कोरोना रुग्णवाढीसाठी गृह विलगीकरण हे अनेक कारणांपैकी एक कारण आहे. त्यामुळे जिल्ह्यात शक्यतो संस्थात्मक विलगीकरणाला प्राधान्य द्यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.    - डॉ. उषादेवी कुंभार, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी, कोल्हापूर जिल्हा परिषदसांगली- तेच सुपर स्प्रेडरसांगली : सांगली जिल्ह्याला कोरोनाची दुसरी लाट तुलनेने फारच महाग ठरली आहे. गृह विलगीकरणाविषयी बेफिकिरी आणि परजिल्ह्यातून आलेल्या नागरिकांचे बिनधास्त फिरणे नडल्याने पाहता पाहता जिल्हा रेड झोनमध्ये जाऊन बसला.  दुसऱ्या लाटेत संस्थात्मक विलगीकरण गांभीर्याने राबवले गेले नाही. गृह विलगीकरणामध्येच रुग्ण राहिले. त्यांच्यावर कुणाचाच वॉच नसल्याने नियम झुगारून बिनधास्त रस्त्यावर येत राहिले आणि इतरांसाठी ते सुपर स्प्रेडर ठरले. सातारा जिल्ह्यात येणाऱ्या लक्झरी बसवर कारवाई करण्यासाठी रात्री काम करण्यासाठी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकाने महिन्यात २४ लक्झरी बसवर कारवाई केली आहे. अद्यापही कारवाईची मोहीम सुरू आहे.    - विनोद चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस