शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
5
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
6
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
7
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
8
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
9
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
10
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
11
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
12
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
13
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
14
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
15
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
16
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
17
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
18
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
19
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
20
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

CoronaVirus News: 'त्याला काय होतंय...' या वृत्तीनेच घात केला; सातारा, सांगली, कोल्हापुरात कोरोना वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 10:11 IST

सातारा, सांगली, कोल्हापुरात म्हणूनच वाढला कोरोना; पुणे-मुंबईकरांचा राबता बाधला

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जबरदस्त तडाखा पश्चिम महाराष्ट्राला बसला. त्यातही सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील वाढता संसर्ग कमी होण्याचे नाव घेत नसल्याने प्रशासनाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. आजही हे तीनही जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. या दुरवस्थेच्या अनेक कारणांपैकी निर्बंधांना झुगारून पुण्या-मुंबईहून दाखल झालेली गर्दी हे एक प्रमुख कारण असल्याच्या चर्चेने आता जोर धरला आहे. १४ एप्रिल रोजी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर उन्हाळ्याची सुटी गावीच घालवण्याच्या इराद्याने खासगी ट्रॅव्हल्स, जीप, अगदी रिक्षानेसुद्धा कुटुंबे आली आणि संसर्ग वाढत गेला.सातारा- पाहुण्यांची गर्दीसातारा : कोरोनाच्या पहिल्या लाटेत सुरक्षित असलेला ग्रामीण भाग दुसऱ्या लाटेत मात्र अक्षरश: पिळवटून निघाला. मुंबई-पुण्याहून खासगी ट्रॅव्हल्स तुडुंब भरून रातोरात ग्रामीण भागात येत आहेत. यातील एकाही प्रवाशाची प्रशासनाकडे नोंद नाही, ना त्यांची चाचणी केली गेली. निर्बंध झुगारून परजिल्ह्यातून आलेल्यांचा संसर्ग वाढण्याला मोठा हातभार लागत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. परजिल्ह्यातून येणाऱ्यांना कोणीही ई-पास मागत नाही की, तुम्हाला परवानगी आहे का, याची विचारणा करत नाही. याचे आश्चर्य गावकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. दुसऱ्या लाटेत गावपातळीवरील समित्याही कार्यरत नव्हत्या. त्यामुळे अशा लोकांना आणखी मोकळे रान मिळाले. गतवर्षी ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा फैलाव फारसा नव्हता. पुणे- मुंबईहून आलेल्या प्रवाशांमुळे यावेळी संसर्ग वाढला. त्यांना गतवर्षीसारखे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले नव्हते. याचे गंभीर परिणाम भोगावे लागत आहेत.    -उत्तम वाघ,     रा. तारळे, जि. सातारागतवर्षी गावामध्ये बांबू आडवे लावून वाहतूक अडवण्यात आली होती; पण यंदा असे काहीच केले नाही. त्यामुळे पुणे- मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त होती.    -संदीप साळुंखे, रा. कडवे बुद्रुक, ता. पाटण, जि. साताराकोल्हापूर- गृह विलगीकरण महागातकोल्हापूर : कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी जितके गांभीर्य गावागावात पाळले गेले, तेवढे गांभीर्य दुसऱ्या लाटेवेळी पाळले गेले नाही हे वास्तव आहे. कोरोनाचा संसर्ग वाढण्यासाठी गृह विलगीकरण नसणे हे महत्त्वाचे कारण ठरले आहे. पुणे, मुंबईसह बाहेरच्या शहरांतून आलेले नागरिक थेट घरातच राहिले. त्यांच्या कोणत्याही चाचण्या झाल्या नाहीत. मे महिन्यात जिल्ह्यात ५० हजार नागरिक पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये गृहीत धरलेल्या गावातील संख्या अधिक आहे. कारण पॉझिटिव्ह रुग्ण घरात राहिल्यानंतर शिस्त पाळली गेली नाही. ते घरातीलच इतरांच्या संपर्कामध्ये आले आणि घरचे बाहेर फिरत राहिले. परिणामी संख्या वाढतच राहिली. प्रभाग समित्या, ग्राम समित्यांनीही प्रभावीपणे काम केले नाही. जिल्ह्यातील कोरोना रुग्णवाढीसाठी गृह विलगीकरण हे अनेक कारणांपैकी एक कारण आहे. त्यामुळे जिल्ह्यात शक्यतो संस्थात्मक विलगीकरणाला प्राधान्य द्यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.    - डॉ. उषादेवी कुंभार, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी, कोल्हापूर जिल्हा परिषदसांगली- तेच सुपर स्प्रेडरसांगली : सांगली जिल्ह्याला कोरोनाची दुसरी लाट तुलनेने फारच महाग ठरली आहे. गृह विलगीकरणाविषयी बेफिकिरी आणि परजिल्ह्यातून आलेल्या नागरिकांचे बिनधास्त फिरणे नडल्याने पाहता पाहता जिल्हा रेड झोनमध्ये जाऊन बसला.  दुसऱ्या लाटेत संस्थात्मक विलगीकरण गांभीर्याने राबवले गेले नाही. गृह विलगीकरणामध्येच रुग्ण राहिले. त्यांच्यावर कुणाचाच वॉच नसल्याने नियम झुगारून बिनधास्त रस्त्यावर येत राहिले आणि इतरांसाठी ते सुपर स्प्रेडर ठरले. सातारा जिल्ह्यात येणाऱ्या लक्झरी बसवर कारवाई करण्यासाठी रात्री काम करण्यासाठी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकाने महिन्यात २४ लक्झरी बसवर कारवाई केली आहे. अद्यापही कारवाईची मोहीम सुरू आहे.    - विनोद चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस