शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
"ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

CoronaVirus News : राज्यात काेराेना रुग्णांच्या मृत्यूंमध्ये ४० टक्क्यांनी घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2020 06:59 IST

CoronaVirus News in Maharashtra : राज्याच्या आरोग्य विभागाचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की, पुढील दोन आठवड्यांत रुग्णसंख्येचे प्रमाण आणखी कमी होईल अशी अपेक्षा आहे. मात्र चाचण्या कमी करण्यात आलेल्या नाहीत.

मुंबई :   राज्याच्या कोरोना रुग्णांची संख्या मागील काही दिवसांपासून कमी होत असून, दैनंदिन मृत्यूंमध्येही घट झाली आहे. गेल्या पाच महिन्यांत पहिल्यांदा राज्यात दोन अंकी मृत्यूसंख्येची नोंद झाली. हे प्रमाण ४० टक्क्यांनी घटले आहे.राज्यात शनिवारी नोंद झालेले दिवसभरातील काेराेनाचे ७४ मृत्यू हे मागील १५९ दिवसांतील सर्वांत कमी प्रमाण आहे. यापूर्वी, राज्यात २५ मे रोजी दिवसभरात ६० कोरोना रुग्णांचा बळी गेला होता. राज्यात मागील १४ दिवसांत दैनंदिन मृत्यूंची संख्या २०० पेक्षा कमी आहे.दरम्यान, राज्यात दररोज करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांची संख्या जवळपास ७० हजार असूनही पॉझिटिव्हीटी रेटचा आलेख कमी झाला आहे.राज्याच्या आरोग्य विभागाचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की, पुढील दोन आठवड्यांत रुग्णसंख्येचे प्रमाण आणखी कमी होईल अशी अपेक्षा आहे. मात्र चाचण्या कमी करण्यात आलेल्या नाहीत. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे मुंबई, ठाणे, सोलापूर आणि कोल्हापूर येथील रुग्णसंख्या कमी झाली आहे. शहरांसह ग्रामीण भागात घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू आहे, त्यामुळे संशयित रुग्णांची तत्काळ तपासणी, निदान आणि उपचार वेळेवर होत असून संसर्गाची साखळी तोडण्यास मदत होत आहे.

मुंबईत काेराेनाचे १८ हजार ५२२ रुग्ण सक्रियमुंबई :  मुंबईत दिवसभरात काेराेनाचे ९०८ रुग्ण आढळले असून २५ मृत्यू झाले. त्यामुळे शहर, उपनगरातील काेराेनाबाधितांची संख्या २  लाख ५८ हजार ४०५ झाली असून आतापर्यंत एकूण १० हजार ३१८ मृत्यू झाले. सध्या १८ हजार ५२२ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.शहर, उपनगरात रविवारी दिवसभरात  १ हजार ७१६ काेराेनाचे रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत २ लाख २९ हजार २५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९ टक्के असून रुग्ण दुपटीचा कालावधी आता तब्बल  १७१ दिवसांवर आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मागील चोवीस तासांत रुग्णांच्या सहवासातील ९ हजार ६६० अतिजोखमीच्या सहवासितांचा शाेध  घेण्यात मुंबई महापालिकेला यश आले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबई