शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

CoronaVirus News : एसटी महामंडळाचे पोर्टल विकसित होतोय; १० हजार बस धावणार, अडकलेल्या नागरिकांना सोडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 22:30 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates : एसटी महामंडळाकडून गावी जाणाऱ्या नागरिकांसाठी काही हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत. यासह ऑनलाईन बुकिंगसाठी एक नवीन वेब पोर्टल विकसित करण्यात येत आहे. 

ठळक मुद्देराज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अडकलेले विद्यार्थी, मजूर,पर्यटक यांच्यासाठी पुढील चार ते पाच दिवसात त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यात जाण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील अडकलेल्या प्रत्येक नागरिकाला यामुळे सुरक्षित आपल्या घरी जाण्यास मदत होणार आहे.

मुंबई :  लॉकडाऊनमुळे राज्यातील विविध भागात नागरिक अडकले आहेत. या नागरिकांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी एसटी महामंडळाच्या १० हजार बस धावणार आहेत. त्यासाठी एसटी महामंडळाकडून गावी जाणाऱ्या नागरिकांसाठी काही हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत. यासह ऑनलाईन बुकिंगसाठी एक नवीन वेब पोर्टल विकसित करण्यात येत आहे. 

यापोर्टल मार्फत अर्जदार एकटा किंवा दोन ते तीन व्यक्तींचा छोटा गट असला तरीही त्याची नोंद करणे सहज शक्य होणार आहे. याद्वारे ऑनलाईन बुकिंग करून एका ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या घरी जाता येणार आहे. १० मे पर्यंत पोर्टल विकसित होण्याची शक्यता आहे. यासाठी काम युद्ध पातळीवर सुरु आहे, अशी माहिती एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांनी  दिली आहे.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अडकलेले विद्यार्थी, मजूर,पर्यटक यांच्यासाठी पुढील चार ते पाच दिवसात त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यात जाण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील अडकलेल्या प्रत्येक नागरिकाला यामुळे सुरक्षित आपल्या घरी जाण्यास मदत होणार आहे. लॉकडाऊनमुळे अनेक नागरिक एकाच ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यामुळे या नागरिकांना त्यांच्या घरी पोहोचवले जाणार असल्याची माहिती मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.   

राज्यात विविध जिल्हात अडकलेल्या मजुरांना घरी सोडण्याची जबाबदारी महामंडळाने घेतली आहे. आतापर्यत अनेक मजुरांनी २५ जणांचा गट तयार करून आणि त्यानंतर पोलिसांची परवानगी घेऊन बस आरक्षित केली आहे. अनेक गटांनी प्रत्येकी खासगी बसला अतिरिक्त पैसे देऊन बाहेर राज्यात जात आहे. त्यामुळे मजुरांची,प्रवाशांची आर्थिक पिळवणुक होत आहे. परंतु आता या पोर्टलमुळे या गोष्टी सहज शक्य होणार अशी माहिती सुद्धा अधिकाऱ्यांनी दिली आहे.

अशी करावी बुकिंग प्रवाशांना घरी जायचं असेल तर आता गट तयार करावे लागत होते. मात्र आता पोर्टलमुळे तुम्हाला थेट अर्ज करता येणार आहे. अर्ज करताना आधार कार्ड, पोलीस परवानगीसह इतर कागदपत्र  आणि गंतव्य स्थानकाची माहिती नोंदवु शकतात. पोर्टल अशा अर्जाचे एकत्रिकरण करेल आणि विविध गंतव्यस्थानासाठी अजर्दारांची यादी तयार केली जाईल. त्यानंतर त्या-त्या भागातील प्रवाशांचे गट तयार करुन त्यांना पुढील प्रवासासाठी बसची माहिती दिली जाईल.

आगार-दुरध्वनी क्रमांक  पोर्टलला एका हेल्पलाइनद्वारे जोडले जाणार आहे.ज्यावर प्रवासी आपल्या शंका आणि त्यांची वैयक्तिक माहिती देऊ शकतात. या हेल्पलाईनवर अडचणी शंकांचे निरासण केले जाणार आहे त्यासाठी .मुंबईतील नियंत्रण कक्ष आगार दुरध्वनी क्रमांक,  विद्याविहार ०२२-२५१०११८२, मुंबई आगार ०२२-२३०७२३७१, परळ आगार ०२२-२४३०४६२०, कुर्ला नेहरु नगर आगार ०२२-२५५२२०७२, पनवेल आगार ०२२-२७४८२८४४  आणि  उरण आगार ०२२-२७२२२४६६ 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसstate transportएसटी