शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

CoronaVirus in Thane ठाणे जिल्हा @ 3139; आज नव्या रुग्णांची विक्रमी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 20:27 IST

कल्याण डोंबिवली येथे 33 नवीन मिळून आलेल्या रुग्णांमुळे एकूण संख्या 424 झाली आहे. तेथेही एकाचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या 9 झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक 234 रुग्ण एकाच दिवशी सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. या नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांनी 3 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात शुक्रवारी सर्वात जास्त 13 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा शंभर झाला आहे.शुक्रवारी जिल्ह्यातील ठाणे महापालिका हद्दीत सर्वाधिक 83 नवे रुग्ण नोंदवले गेले असून सर्वात जास्त 6 जणांच्या मृत्यूची ही नोंद ठामपामध्ये झाली आहे. त्यापाठोपाठ नव्या रुग्णांसह मृत्यूमुखी पडण्याची संख्या नवीमुंबईत आहे. तसेच नवीमुंबईने एक हजारांचा तर केडीएमसीने चारशेचा आकडा पार केला आहे.एकूण तीन हजार 139 रुग्णांपैकी एक हजार 48 रुग्ण हे एकट्या नवीमुंबईतील असल्याची माहिती ठाणे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.

जिल्ह्यात गुरुवारी 195 सर्वात जास्त रुग्ण एकाच दिवशी सापडले होते. तो विक्रम चोवीस तासांमध्ये मोडीत निघाला असून शुक्रवारी तब्बल 234 नवीन रुग्णांची नोंदणी झाली आहे. त्याचबरोबर 13 जणांच्या मृत्यूची एकाच दिवशी होण्याची पहिलीच जिल्ह्यातील वेळ आहे. त्यातच ठामपामध्ये 83 नव्या रुग्णांमुळे तेथील रुग्ण संख्या 996 झाली आहे. तर दुसरीकडे ठामपामध्ये 6 जण दगवल्याने मृतांचा आकडा ही 48 वर पोहोचला आहे. त्या खालोखाल नवीमुंबई 74 रुग्णांची नोंदणी झाल्याने येथील रुग्ण संख्या एक हजार 48 वर पोहोचली आहे.येथेच चार जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 23 इतका झाला आहे.

कल्याण डोंबिवली येथे 33 नवीन मिळून आलेल्या रुग्णांमुळे एकूण संख्या 424 झाली आहे. तेथेही एकाचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या 9 झाली आहे. 13 नवीन रुग्ण उल्हासनगर येथे आढळून आल्याने रुग्ण 94 वर पोहोचली आहे. तेथे एकाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 5 वर गेली आहे. तर अंबरनाथ येथील नव्या 9 रुग्णांमुळे रुग्ण संख्या 32 झाली आहे. ठाणे ग्रामीण मध्येही 8 रुग्ण सापडल्याने रुग्ण संख्या 137 वर गेली आहे. मिराभाईंदर आणि भिवंडीत प्रत्येकी 5 नव्या रुग्णांची नोंद झाल्याने तेथील अनुक्रमे रुग्ण संख्या 291 आणि 38 इतकी आहे. मात्र मिराभाईंदरमध्ये एक जण दगावल्याने मृतांची संख्या 8 झाली आहे. त्याचबरोबर सर्वात कमी 4 नवे रुग्ण बदलापूरात सापडल्याने तेथील रुग्ण संख्या 79 इतकी असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

महत्वाच्या बातम्या...

EPFO चा मोठा दिलासा; लॉकडाऊनमध्ये पीएफ भरण्यास उशिर झाला तर दंड माफ

राज्य सरकार दीड महिन्यात बंपर भरती करणार; राजेश टोपेंची घोषणा

मजुरांना पायी जाण्यापासून रोखू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

सावधान! भारताचा योद्धा येतोय; एकटाच पाकिस्तान, चीनला भारी पडणार

शेतमालाच्या किंमतीला मिळणार कायद्याचे संरक्षण; अर्थमंत्र्यांचे मोठे आश्वासन

Atmanirbhar Bharat Abhiyan कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधांसाठी १ लाख कोटी; निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा

Corona Lockdown कोरोनाचे वेगळेच, लॉकडाऊनने घेतले शेकडो बळी; 91 जणांनी तर आत्महत्याच केली

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे