शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
5
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
6
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
7
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
8
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
9
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
10
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
11
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
12
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
13
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
14
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
15
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
16
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
17
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
18
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
19
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
20
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा

CoronaVirus: "महाराष्ट्र सरकारकडून गोरगरिबांची उपेक्षा; उपासमारीतून होतेय चेष्टा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 20:08 IST

या निर्णयानुसार कार्डधारकांनी आधी त्यांना देय असणारे धान्य विकत घ्यायचे आहे, मगच त्यांना मोफत धान्य मिळू शकेल. 

 मुंबईः केंद्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरीब व कष्टकरी वर्गासाठी पुढील तीन महिने मोफत धान्य देण्याचा चांगला निर्णय घेतला, परंतु त्या निर्णयाची अंमलबजावणी महाराष्ट्रात अद्याप सुरू झाली नव्हती. कालच अन्न व नागरी पुरवठा विभागातर्फे याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय म्हणजे गरिबांची थट्टा व अन्न नागरी पुरवठा विभागाच्या आडमुठेपणाचा व परिस्थितीची अजिबात जाणीव नसल्याचा नमुना आहे, अशी टीका अन्न अधिकार अभियानाच्या उल्का महाजन महाजन यांनी केली आहे.या निर्णयानुसार कार्डधारकांनी आधी त्यांना देय असणारे धान्य विकत घ्यायचे आहे, मगच त्यांना मोफत धान्य मिळू शकेल. गेले पंधरा दिवस सर्व कामे ठप्प आहेत लॉकडाऊन होऊन आता एक आठवडा झाला आहे. गरीब व रोजंदारीवर जगणाऱ्यांच्या हातात अजिबात पैसे नाहीत, अशा स्थितीत लहान मुलं पाच रुपयांचा बिस्कीटचा पुडादेखील घेऊ शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. या परिस्थितीमध्ये विकत धान्य घ्या मगच मोफत मिळेल, अशी अट घालणे म्हणजे शासनाच्या उफराटेपणाचा व असंवेदनशीलतेचा कळस आहे. याबाबत अन्न व नागरी पुरवठा मंत्री व प्रधान सचिव यांच्या बरोबर संवाद साधला असता त्यांनी केंद्र सरकारच्या तशा सूचना असल्याचे सांगितले. परंतु वस्तुस्थिती तशी नाही. केंद्र सरकारचे आदेश तपासले असतां अशी कोणतीही अट त्यांनी घातलेली नाही. तसेच केंद्रीय योजनेप्रमाणे अन्य सर्व राज्ये मोफत धान्य देत आहेत, महाराष्ट्र सरकार स्वत: तर काही द्यायला तयार नाहीच, तेवढी दानत देखील दाखवत नाही, शिवाय केंद्र सरकारने दिलेले मोफत धान्य लोक उचलूच शकणार नाहीत, अशी अट घालत आहेत. ही निव्वळ गरिबांची क्रूर चेष्टाच आहे.मोफत धान्य दुकानदार काळ्या बाजारात विकतील ह्या भीतीपोटी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. पण दोन रुपये/ तीन रुपयांचे धान्य देखील ते काळ्या बाजारात विकू शकतील. न्यायाचे तत्त्व असे म्हणते की, हजार अपराधी सुटले तरी चालतील, पण एका निरपराध्याला फाशी होता कामा नये. त्याप्रमाणे धान्य आधी गरिबांना मिळाले पाहिजे, एकही उपाशी माणूस राहता कामा नये, हे अंतिम ध्येय हवे. पण इथे लाखो उपाशी मेले तरी चालतील पण धान्याचा काळा बाजार होता कामा नये, असे सरकारचे आडमुठे म्हणणे आहे. काळा बाजार काही केलं तरी होऊ शकतोच कारण व्यवस्था तशीच आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या या उफराटेपणाचा व बेपर्वाईचा आम्ही निषेध करतो आणि मुख्यमंत्र्यांनी यांत लक्ष घालावे, असे आवाहन करत आहोत. तसेच स्थलांतरित व रोजंदारीवर जगणा-या अनेक कुटुंबांकडे कार्ड नाहीत, त्यांना या पॅकेजचा कसलाही फायदा होणार नाही, तेव्हा रेशनकार्ड धारकांच्या व्यतिरिक्त अन्य गरजू कुटुंबांना देखील केरळ, तेलंगणा, दिल्ली, कर्नाटक, झारखंड राज्यांप्रमाणे मोफत धान्य देण्यात यावे अशी मागणी करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शाहू महाराजांचा वारसा सांगणा-या महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील सर्वात गरीब, असुरक्षित नागरिकांच्या सुरक्षेसाठी ही किमान अपेक्षा आहे, अशी आशाही उल्का महाजन यांनी व्यक्त केली आहे.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस