शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

CoronaVirus Lockdown News: ३१ मेनंतर लॉकडाऊन वाढणार? मुख्यमंत्र्यांनी एकाच वाक्यात दिले स्पष्ट संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2021 12:57 IST

CoronaVirus Lockdown News: राज्यातील लॉकडाऊन संदर्भात मुख्यमंत्र्यांचं महत्त्वपूर्ण विधान; एका वाक्यात दिले महत्त्वाचे संकेत

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. एप्रिल महिन्यात राज्यात दररोज ७० हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत होते. आता हाच आकडा ३० हजारांच्या खाली आला आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेवरील ताण काहीसा कमी झाला आहे. त्यामुळे ३१ मेनंतर लॉकडाऊन संपणार का, असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे. याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महत्त्वाचे संकेत दिले आहेत. लहान मुलांसाठी स्थापन केलेल्या टास्क फोर्समधील तज्ज्ञ डॉक्टरांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी एक अतिशय सूचक विधान केलं आहे.१ जूननंतर राज्यातील लॉकडाऊन वाढणार का?; आरोग्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलंमुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक या मोठ्या शहरांमधील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांत लक्षणीय घटली आहे. कोरोना रुग्ण वाढीचा वेग कमी झाला आहे. त्यामुळे या शहरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र ग्रामीण भागांत कोरोनानं हातपाय पसरले आहेत. त्यामुळे राज्यात लागू असलेला लॉकडाऊन कायम राहणार की रद्द केला जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आज तज्ज्ञ डॉक्टरांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनबद्दल महत्त्वाचं वक्तव्य केलं. कटूपणा घेण्याची माझी तयारी आहे, असं अत्यंत सूचक विधान मुख्यमंत्र्यांनी केलं.कोरोनाची दुसरी लाट ओसरली, लॉकडाऊन राहणार की हटणार? राज्यांचा मूड काय सांगतो? जाणून घ्या...पुढील काही महिन्यांत देशात कोरोनाची तिसरी लाट येईल आणि त्याचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असेल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे ठाकरे सरकारनं बालरोगतज्ज्ञांच्या टास्क फोर्सची स्थापना केली आहे. या टास्क फोर्समधील डॉक्टरांशी आज मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. 'लहान मुलांच्या पालकांनी काळजी करू नये. लहान मुलांची काळजी घेण्यास सरकार समर्थ आहे. त्यादृष्टीनं प्रशासनाची तयारी सुरू आहे. पालकांनी मुलांना घरीच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतंही औषध देऊ नये. त्यांच्यावर अनावश्यक भडिमार करू नये,' असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.डॉक्टरांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी कोरोना लसीकरणाबद्दलही महत्त्वाची माहिती दिली. लसींचा साठा कमी असल्यानं सध्या नाईलाजास्तव १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचं लसीकरण थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. लसींची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांची क्षमता जूनपासून वाढेल. त्यानंतर लसींचा साठा उपलब्ध होईल अशी आशा आहे. १२ कोटी डोस एकरकमी खरेदी करण्याची सरकारची तयारी आहे. प्रत्येकाचं लसीकरण करण्यात येईल. त्यापासून कोणीही वंचित राहणार नाही. कोरोना लसींचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्यानंतर अहोरात्र लसीकरण मोहिम राबवण्यात येईल. २४ तास लसीकरण सुरू राहील, अशी महत्त्वाची माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस