शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: विचारशक्तीचा अभाव, मरणाची भीती अन् गावाची ओढ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 05:41 IST

कोविड-१९ विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र, राज्य सरकारकडून मार्चमध्ये लॉकडाऊन लागू केल्यापासून इतर राज्यात काम करणाऱ्या मजुरांचे गावांकडे जाण्याची धडपड सुरू झाली.

- असिफ कुरणेकोल्हापूर : कोविड १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर प्रमुख महामार्गावर मजुरांचे जथ्येच्या जथ्ये दिसू लागले. ५० दिवसानंतरही परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. या स्थलांतरामागे मरणाची भीती, विचारशक्तीचा अभाव आणि सोशल मीडियावरून मिळणारी चुकीची माहिती अशी विविध कारणे असल्याचे मानसशास्त्रांनी स्पष्ट केले. मजुरांसह अनेकांचे सुरू असलेले स्थलांतर आता चिंताजनक बनत आहे.कोविड-१९ विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र, राज्य सरकारकडून मार्चमध्ये लॉकडाऊन लागू केल्यापासून इतर राज्यात काम करणाऱ्या मजुरांचे गावांकडे जाण्याची धडपड सुरू झाली. या स्थलांतरामागे बंद पडलेले उद्योग, रोजगाराचा अभाव आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न ही कारणे वरवर दिसत असली, तरी यामागे मानसशास्त्रीय कारणे आहेत. त्याचा महत्त्वाचा प्रभाव स्थलांतरामागे असल्याचे मानसशास्त्रज्ञ डॉ. वृषाली राऊत यांनी म्हटले आहे. गरीब लोक हजार ते १५०० किलोमीटर अंतर लहान मुलांसोबत कसे कापायचे. आपण तेथेपर्यंत पोहोचू की नाही, याचा विचार न करता चालत घराबाहेर पडले आहेत. याचा मोठा परिणाम आगामी काळात जाणवणार आहे.अशाप्रकारे महास्थलांतर झाल्यामुळे येत्या काही महिन्यात शहरातील सामाजिक, आर्थिक घडामोडींवर विपरित परिणाम होणार असून मानवी श्रमाची किंमत कळेल. तसेच कमी झालेली सहसंवेदनेचा फटका देखील बसेल. तसेच श्रीमंत व उच्च मध्यमवर्गीय लोकांना या समस्येचा जास्त सामना करावा लागू शकतो अशी भीती यांनी व्यक्त केली.१० कोटी प्रवासी मजूर२०१६ च्या आर्थिक सर्व्हेनुसार१० कोटींपेक्षा जास्त लोकदेशात प्रवासी मजूर असल्याचा अंदाज आहे.आंतरराज्य मजुरांचा अधिकृत आकडा नसला तरी ६.५ कोटींपर्यंत त्यांची संख्या असल्याचे मानले जाते.त्यात उत्तर प्रदेश (२५), बिहार (१४), राजस्थान (६), मध्य प्रदेश (५) या राज्यांचा वाटा जास्त आहे.म्हणजे ४० ते ६० लाख उत्तर प्रदेशात, २० ते ३० लाख लोक बिहार, १० लाख राजस्थान तर ९ लाख लोक मध्य प्रदेशात जावू इच्छितात किंवा वाटेवर आहेत.कोठे आहेत जास्त मजूरदिल्ली, मुंबई, गुरूग्राम, नोएडा, बेंगळुरू, सुरत, पुणे, थिरुवरुलू, चेन्नई, कांचीपूरम, इंदोर, भोपाळसोबत औद्योगिकदृष्ट्या प्रगत असलेल्या महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, कर्नाटक, पंजाब, तेलंगणा, तमिळनाडूमधील ग्रामीण भागातून जास्त मजूर गावी परतू लागले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndiaभारत