शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: विचारशक्तीचा अभाव, मरणाची भीती अन् गावाची ओढ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 05:41 IST

कोविड-१९ विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र, राज्य सरकारकडून मार्चमध्ये लॉकडाऊन लागू केल्यापासून इतर राज्यात काम करणाऱ्या मजुरांचे गावांकडे जाण्याची धडपड सुरू झाली.

- असिफ कुरणेकोल्हापूर : कोविड १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर प्रमुख महामार्गावर मजुरांचे जथ्येच्या जथ्ये दिसू लागले. ५० दिवसानंतरही परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. या स्थलांतरामागे मरणाची भीती, विचारशक्तीचा अभाव आणि सोशल मीडियावरून मिळणारी चुकीची माहिती अशी विविध कारणे असल्याचे मानसशास्त्रांनी स्पष्ट केले. मजुरांसह अनेकांचे सुरू असलेले स्थलांतर आता चिंताजनक बनत आहे.कोविड-१९ विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र, राज्य सरकारकडून मार्चमध्ये लॉकडाऊन लागू केल्यापासून इतर राज्यात काम करणाऱ्या मजुरांचे गावांकडे जाण्याची धडपड सुरू झाली. या स्थलांतरामागे बंद पडलेले उद्योग, रोजगाराचा अभाव आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न ही कारणे वरवर दिसत असली, तरी यामागे मानसशास्त्रीय कारणे आहेत. त्याचा महत्त्वाचा प्रभाव स्थलांतरामागे असल्याचे मानसशास्त्रज्ञ डॉ. वृषाली राऊत यांनी म्हटले आहे. गरीब लोक हजार ते १५०० किलोमीटर अंतर लहान मुलांसोबत कसे कापायचे. आपण तेथेपर्यंत पोहोचू की नाही, याचा विचार न करता चालत घराबाहेर पडले आहेत. याचा मोठा परिणाम आगामी काळात जाणवणार आहे.अशाप्रकारे महास्थलांतर झाल्यामुळे येत्या काही महिन्यात शहरातील सामाजिक, आर्थिक घडामोडींवर विपरित परिणाम होणार असून मानवी श्रमाची किंमत कळेल. तसेच कमी झालेली सहसंवेदनेचा फटका देखील बसेल. तसेच श्रीमंत व उच्च मध्यमवर्गीय लोकांना या समस्येचा जास्त सामना करावा लागू शकतो अशी भीती यांनी व्यक्त केली.१० कोटी प्रवासी मजूर२०१६ च्या आर्थिक सर्व्हेनुसार१० कोटींपेक्षा जास्त लोकदेशात प्रवासी मजूर असल्याचा अंदाज आहे.आंतरराज्य मजुरांचा अधिकृत आकडा नसला तरी ६.५ कोटींपर्यंत त्यांची संख्या असल्याचे मानले जाते.त्यात उत्तर प्रदेश (२५), बिहार (१४), राजस्थान (६), मध्य प्रदेश (५) या राज्यांचा वाटा जास्त आहे.म्हणजे ४० ते ६० लाख उत्तर प्रदेशात, २० ते ३० लाख लोक बिहार, १० लाख राजस्थान तर ९ लाख लोक मध्य प्रदेशात जावू इच्छितात किंवा वाटेवर आहेत.कोठे आहेत जास्त मजूरदिल्ली, मुंबई, गुरूग्राम, नोएडा, बेंगळुरू, सुरत, पुणे, थिरुवरुलू, चेन्नई, कांचीपूरम, इंदोर, भोपाळसोबत औद्योगिकदृष्ट्या प्रगत असलेल्या महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, कर्नाटक, पंजाब, तेलंगणा, तमिळनाडूमधील ग्रामीण भागातून जास्त मजूर गावी परतू लागले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndiaभारत