शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

coronavirus: विचारशक्तीचा अभाव, मरणाची भीती अन् गावाची ओढ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 05:41 IST

कोविड-१९ विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र, राज्य सरकारकडून मार्चमध्ये लॉकडाऊन लागू केल्यापासून इतर राज्यात काम करणाऱ्या मजुरांचे गावांकडे जाण्याची धडपड सुरू झाली.

- असिफ कुरणेकोल्हापूर : कोविड १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर प्रमुख महामार्गावर मजुरांचे जथ्येच्या जथ्ये दिसू लागले. ५० दिवसानंतरही परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. या स्थलांतरामागे मरणाची भीती, विचारशक्तीचा अभाव आणि सोशल मीडियावरून मिळणारी चुकीची माहिती अशी विविध कारणे असल्याचे मानसशास्त्रांनी स्पष्ट केले. मजुरांसह अनेकांचे सुरू असलेले स्थलांतर आता चिंताजनक बनत आहे.कोविड-१९ विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र, राज्य सरकारकडून मार्चमध्ये लॉकडाऊन लागू केल्यापासून इतर राज्यात काम करणाऱ्या मजुरांचे गावांकडे जाण्याची धडपड सुरू झाली. या स्थलांतरामागे बंद पडलेले उद्योग, रोजगाराचा अभाव आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न ही कारणे वरवर दिसत असली, तरी यामागे मानसशास्त्रीय कारणे आहेत. त्याचा महत्त्वाचा प्रभाव स्थलांतरामागे असल्याचे मानसशास्त्रज्ञ डॉ. वृषाली राऊत यांनी म्हटले आहे. गरीब लोक हजार ते १५०० किलोमीटर अंतर लहान मुलांसोबत कसे कापायचे. आपण तेथेपर्यंत पोहोचू की नाही, याचा विचार न करता चालत घराबाहेर पडले आहेत. याचा मोठा परिणाम आगामी काळात जाणवणार आहे.अशाप्रकारे महास्थलांतर झाल्यामुळे येत्या काही महिन्यात शहरातील सामाजिक, आर्थिक घडामोडींवर विपरित परिणाम होणार असून मानवी श्रमाची किंमत कळेल. तसेच कमी झालेली सहसंवेदनेचा फटका देखील बसेल. तसेच श्रीमंत व उच्च मध्यमवर्गीय लोकांना या समस्येचा जास्त सामना करावा लागू शकतो अशी भीती यांनी व्यक्त केली.१० कोटी प्रवासी मजूर२०१६ च्या आर्थिक सर्व्हेनुसार१० कोटींपेक्षा जास्त लोकदेशात प्रवासी मजूर असल्याचा अंदाज आहे.आंतरराज्य मजुरांचा अधिकृत आकडा नसला तरी ६.५ कोटींपर्यंत त्यांची संख्या असल्याचे मानले जाते.त्यात उत्तर प्रदेश (२५), बिहार (१४), राजस्थान (६), मध्य प्रदेश (५) या राज्यांचा वाटा जास्त आहे.म्हणजे ४० ते ६० लाख उत्तर प्रदेशात, २० ते ३० लाख लोक बिहार, १० लाख राजस्थान तर ९ लाख लोक मध्य प्रदेशात जावू इच्छितात किंवा वाटेवर आहेत.कोठे आहेत जास्त मजूरदिल्ली, मुंबई, गुरूग्राम, नोएडा, बेंगळुरू, सुरत, पुणे, थिरुवरुलू, चेन्नई, कांचीपूरम, इंदोर, भोपाळसोबत औद्योगिकदृष्ट्या प्रगत असलेल्या महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, कर्नाटक, पंजाब, तेलंगणा, तमिळनाडूमधील ग्रामीण भागातून जास्त मजूर गावी परतू लागले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndiaभारत