शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
2
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
3
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
4
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
5
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
6
"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली
7
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
8
Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते; वाचा वास्तू नियम!
9
मोदींवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांना हसन मुश्रिफ यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, मग शाहू महाराजांना...
10
Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!
11
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
12
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
13
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
14
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
15
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
16
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
17
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
18
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
19
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
20
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा

coronavirus: जून-जुलै महिने चिंताजनक - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 6:52 AM

देशभरातील मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. लॉकडाऊनबाबत पंतप्रधानांनी निश्चित व ठोस अशी दिशा दाखवावी, अशी अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले

मुंबई : आपण एप्रिलमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला; मात्र मे अखेर कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता असून जून, जुलैमध्ये हा संसर्ग उच्चांकीपातळीवर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा तसा इशारा दिला आहे. चीनच्या वूहानमध्ये परत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्याचे वाचण्यात आले आहे. त्यामुळे लॉकडाऊनबाबत अत्यंत काळजीपूर्वक निर्णय घ्यावा लागेल, असे सांगत जूनपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचे सूतोवाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.देशभरातील मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. लॉकडाऊनबाबत पंतप्रधानांनी निश्चित व ठोस अशी दिशा दाखवावी, अशी अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, देशभरात मजुरांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे. मात्र मजूर विविध झोन्समधून प्रवास करीत असल्याने प्रत्येक राज्याने व्यवस्थित काळजी आवश्यक आहे. अन्यथा, कोरोनाचा प्रादर्भाव 

वाढू शकतो. लॉकडाऊनमुळे राज्याला सुमारे ३५ हजार कोटींचा फटका बसला आहे. त्यामुळे केंद्राने जीएसटीच्या परताव्याची रक्कम आणि केंद्रीय करातील राज्याचा वाटा तातडीने द्यावा, अशी मागणीही ठाकरे यांनी यावेळी केली.महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची योजना सुरु होती. मात्र काही जिल्ह्यांमध्ये विशेषत: विदर्भातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळालेला नाही. आता खरीप हंगाम सुरु झाला आहे. त्यामुळे त्यांना पीककर्ज मिळावे म्हणून रिझर्व्ह बँकेला सूचना द्याव्यात. सुमारे १० लाख शेतकºयांना त्याचा फायदा होईल, असे ठाकरे यांनी सांगितले. वैद्यकीय उपकरणांवरील जीएसटी शुल्क माफ करावे. काही संस्था उपकरणे आयात करीत आहेत, त्यांना सीमा शुल्कात सवलत द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांसाठी मुंबईतील उपनगरीय रेल्वेसेवा सुरू करण्यात यावी. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांना विशेष पास देऊन या सेवेचा उपयोग करता येईल, अशी मागणीही ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे केली.

पोलिसांना विश्रांती हवी; केंद्रीय मनुष्यबळाची गरजकोरोना महामारीच्या या संकटकाळात डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस अहोरात्र काम करीत आहेत.विशेषत: पोलिसांना विश्रांती देण्याची गरज आहे. ते आजारी पडून चालणार नाही. त्यामुळे आवश्यकता भासेल, तसे केंद्र सरकारने त्यांच्याकडील मनुष्यबळ उपलब्ध करून दिल्यास पोलिसांवरील ताण कमी होईल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदी