शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

coronavirus : नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे कोरोनाविरोधातील लढाई हरले तर जिंकणार कोण?

By बाळकृष्ण परब | Updated: April 15, 2020 14:20 IST

उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी कोरोनाविरोधातील ही लढाई हरले तर काय होईल? याचा विचार कधी केलाय का?

ठळक मुद्देकोरोना विषाणूवरून आता राजकारण आणि आरोप प्रत्यारोपांनाही जोर आला आहेफेकन्यूज, अफवा पसरवल्या जात आहे. त्यातून आधीच असलेल्या संकटात नव्या समस्यांची भर पडत आहेउद्धव ठाकरे ही लढाई हरले तर राज्य हरेल आणि मोदी या लढाईत पराभूत झाले तर संपूर्ण राष्ट्र पराभूत होईल

- बाळकृष्ण परब एकीकडे राज्यात आणि देशभरामध्ये कोरोना विषाणूचे संक्रमण दिवसेंदिवस अधिकाधिक भयानक रूप घेत आहे. तर दुसरीकडे या कोरोना विषाणूवरून आता राजकारण आणि आरोप प्रत्यारोपांनाही जोर आला आहे. विशेषतः फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल मीडियावर  या आरो-प्रत्यारोपांनी अत्यंत हीन पातळी गाठली आहे. विशेषतः आपल्या महाराष्ट्रात नुकत्याच घडलेल्या काही राजकीय घडामोडींची पार्श्वभूमी ताजी असल्याने आरोप-प्रत्यारोपांची धार अधिकच तीव्र आहे. कोरोनाविरोधातील लढाईत आपला नेताच कसे कुशल नेतृत्व करतोय आणि विरोधी नेता कसा अपयशी ठरतोय, हे दाखवण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. यामध्ये सर्वच राजकीय पक्षांचे समर्थक आघाडीवर आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे समाजात विचारवंत आणि इतर जबाबदार क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीही आपल्या सोईप्रमाणे संबंधितांची तळी उचलत आहेत. त्यामुळे आधीच कोरोना विषाणूमुळे भौतिक जग दूषित झाले असताना सोशल मीडियावरचे वैचारिक जगही परस्पर द्वेषाने प्रदूषित झाले आहे. अशा परिस्थितीत आपण, आपले राज्य आणि अंतिमतः आपला देश कोरोनासारख्या महाभयंकर आपत्तीविरोधातील लढाई कशी काय जिंकणार, हा यक्षप्रश्नच आहे.

एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कठीण परिस्थितीत राज्याची धुरा समर्थपणे वाहत आहेत. तर मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारही कोरोनाविरोधात युद्धपातळीवर तयारी करून सज्ज झाले आहे. राज्य, देशास संपूर्ण जगावर आलेल्या या आपत्तीचा सामना करण्यासाठी आपण योग्य तो समन्वय राखून असल्याचे सांगत आहेत. मात्र या दोन्ही नेत्यांचे समर्थक मात्र एकमेकांचे सोशल मीडियावर परस्परांचे वाभाडे काढत आहेत. दावे, प्रतिदावे केले जात आहेत. प्रसंगी अनेक फेकन्यूज, अफवा पसरवल्या जात आहे. त्यातून आधीच असलेल्या संकटात नव्या समस्यांची भर पडत आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासकीय यंत्रणेवर ताण येतो तो वेगळाच.

दुर्दैवाने अशा आणीबाणीच्या प्रसंगी समाजातील विचारवंत आणि इतर जबाबदार क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींनी समाज प्रबोधनाची जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे. मात्र या मंडळींपैकी अनेकजणही सध्या राजकीय पक्षांच्या प्रवक्त्यांप्रमाणे हिसाबकिताब चुकते करण्यात गुंतले आहेत. कोरोनाविरोधात सुरू असलेली ही लढाई उद्धव ठाकरे हरावेत, असे यापैकी काही जणांना वाटते. तर कोरोनाच्या या संकटाचा सामना करण्यात नरेंद्र मोदी अपयशी ठरावेत, असे अनेकांना मनोमन वाटतेय. 

पण उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी कोरोनाविरोधातील ही लढाई हरले तर काय होईल? याचा विचार तुम्ही केलाय का? उद्धव ठाकरे ही लढाई हरले तर राज्य हरेल आणि मोदी या लढाईत पराभूत झाले तर संपूर्ण राष्ट्र पराभूत होईल आणि या दोन्हींपैकी एकही गोष्ट आपल्याला अजिबात परवडणारी नाही. त्यामुळे किमान हे संकट असेपर्यंत तरी आपापसातील मतभेद विसरा आणि एक राज्य, एक राष्ट्र म्हणून या संकटाचा सामना करा!!!

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदी