शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

coronavirus: ११ लाख शेतकऱ्यांच्या कर्जाची हमी सरकारने घेतली, खरिपाचे कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 06:19 IST

लॉकडाऊनमुळे शेतकºयांना महाविकास आघाडीतर्फे दिली जात असलेली कर्जमाफी काही ठिकाणी पूर्णपणे देता आलेली नाही. आत्तापर्यंत सरकारने ३० लाख शेतकºयांना पात्र ठरविले आहे. त्यातील १९ लाख शेतकºयांना १२ हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत. उर्वरित ११ लाख शेतकºयांना ८,१०० कोटी देणे बाकी आहे.

मुंबई : राज्यातील अकरा लाख शेतकऱ्यांना खरिपासाठी कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या सर्व शेतकºयांना बँकांनी कर्ज द्यावे, असा आदेश सरकार काढत असल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली. लॉकडाऊनमुळे शेतकºयांना महाविकास आघाडीतर्फे दिली जात असलेली कर्जमाफी काही ठिकाणी पूर्णपणे देता आलेली नाही. आत्तापर्यंत सरकारने ३० लाख शेतकºयांना पात्र ठरविले आहे. त्यातील १९ लाख शेतकºयांना १२ हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत. उर्वरित ११ लाख शेतकºयांना ८,१०० कोटी देणे बाकी आहे. सरकारतर्फे एक आदेश काढण्यात येत आहे. या ११ लाख शेतकºयांकडून येणारी थकबाकी आता शासनाकडून येणे आहे अशी नोंद शेतकºयांच्या कर्ज खात्यावर करण्याविषयीचे आदेश राज्यातल्या सर्व बँकांना पाठवले जात आहेत. रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या अधिकाºयांसोबत याबद्दल एक बैठक झाली.आरबीआयने देखील ही अडचण लक्षात घेऊन अशा नोंदी करण्यात तत्त्वत: मान्यता दिली आहे. त्यामुळे शेतकºयांचा सातबारा कोरा होईल. त्यांच्या खात्यावर असलेली थकबाकी सरकारच्या नावावर टाकली जाईल आणि शेतकºयांना खरिपाचे कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा होईल. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील एक बैठक घेतली होती. रिझर्व्ह बँकेचे अधिकारी तसेच अन्य बँकांच्या अधिकाºयांनीही त्यास मान्यता दिल्याचे त्यांनी सांगितले.केंद्र सरकारने जाहीरकेलेल्या वीस लाख कोटींच्या पॅकेजमधून महाराष्ट्राला नेमके काय मिळणार? महाराष्ट्रातल्या शेतकºयांनाव सहकार विभागाच्या माध्यमातून कोणते लाभ मिळतील याचा अभ्यास करण्याच्या सूचना अधिकाºयांना देण्यात आल्या आहेत. त्याबद्दल देखील लवकरच माहिती दिली जाईल, असेही सहकार मंत्री पाटील यांंनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारBanking Sectorबँकिंग क्षेत्र