शहरं
Join us  
Trending Stories
1
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
2
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
3
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
4
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
5
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
6
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
7
एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
१७ वर्षांची तरुणी न सांगताच घराबाहेर पडली, आता २ महिन्यांनी जंगलात सापडला मृतदेह, कोकणात खळबळ 
9
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
10
EMI भरतोय म्हणून घरावर पतीचा अधिकार होत नाही; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, प्रकरण काय?
11
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
12
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
13
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
14
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
15
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
16
नांदेडचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ
17
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
18
"ही भिवंडी आहे, मराठीत कशाला बोलायचं?"; अबु आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, मनसे म्हणाली, "लाज वाटते तर..."
19
गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
20
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?

Coronavirus: हे विषाणूशी युद्धच; आम्ही लढतोय, पण तुमचं आणखी सहकार्य हवंयः मुख्यमंत्र्यांची साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 13:06 IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेला संदेश दिला. महाराष्ट्रात आढळलेले कोरोनाचे रुग्ण हे परदेशातून आलेले आहेत. सध्यातरी त्यांच्या संपर्कात आलेल्यांना लागण झालेली आहे. यामुळे ही साथ आटोक्यात असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

ठळक मुद्देकोरोना हा विषाणू एकेक पाऊल पुढे टाकतोय. रुग्णांची संख्या वाढत आहे. . पंतप्रधान मोदींशी बोललो असून केंद्र सरकारसुद्धा आपल्या बरोबरीने या युद्धामध्ये उतरले आहे.युद्ध सुरू झालंय, सायरन वाजलाय, सगळ्या यंत्रणा लढत आहेत. आम्ही ज्या सूचना देतोय त्या पाळा.

मुंबई : कोरोना व्हायरस हा अद्याप आटोक्यात असून  आपण एक जागतिक युद्ध लढत आहोत. सरकारी यंत्रणा जिवाची पर्वा न करता लढतेय. परदेशात अडकलेल्या नागरिकांना महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हा व्हायरस पसरू नये यासाठी राज्यातील नागरिकांनी घरात राहण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेला संदेश दिला. महाराष्ट्रात आढळलेले कोरोनाचे रुग्ण हे परदेशातून आलेले आहेत. सध्यातरी त्यांच्या संपर्कात आलेल्यांना लागण झालेली आहे. यामुळे ही साथ आटोक्यात आहे. सर्वांना धन्यवाद देऊ इच्छितो. या युद्धात तुमचं सगळ्यांचं सहकार्य हे सरकारचं बळ आहे. या युद्धाचा मुकाबला करताना आपलं सरकार म्हणजेच यंत्रणा सज्ज आहे. यंत्र आणि यंत्रणा यातील फरक लक्षात घ्यावा. आपल्याकडे जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा आहे. घाबरून युद्ध लढता येत नाही. जिद्दीनेच लढावं लागतं, असा संदेश ठाकरे यांनी दिला. 

याचबरोबर त्य़ांनी सावधही केले आहे. युद्धाचा अनुभव फार वाईट असतो. जवान लढतात, धारातिर्थी पडतात. ६५ आणि ७१ सालचं युद्ध अनुभवलंय. सायरन वाजला की पळापळ व्हायची. घराघरातील दिवे बंद व्हायचे. ते कुणाला आवडत नव्हतं. पण शत्रूच्या विमानांना आपली वस्ती कळू नये म्हणून तशा सूचना दिलेल्या होत्या, असा अनुभवही त्यांनी मांडला. तशाच प्रकारचे हे विषाणूंशी युद्ध आहे. 

युद्ध सुरू झालंय, सायरन वाजलाय, सगळ्या यंत्रणा लढत आहेत. आम्ही ज्या सूचना देतोय त्या पाळा. घरदार कुटुंब, स्वतःच्या जिवाची पर्वा न करता घराबाहेर जाऊ नका, अनावश्यक प्रवास करू नका. तसेच गर्दी टाळण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे. 

गर्दी टाळण्यासाठी आवाहन करताना त्यांनी मंदिरं, मशिदी, दर्गे येथील दर्शनं बंद केली आहेत. जत्रा, यात्रा, कार्यक्रम रद्द केले आहेत. ट्रेनची गर्दी ओसरली, बसची गर्दी ओसरली ही चांगली बाब आहे. पण गर्दी आणखी कमी झाली पाहिजे. कोरोना हा विषाणू एकेक पाऊल पुढे टाकतोय. रुग्णांची संख्या वाढत आहे. काळजी घ्यावीच लागणार आहे. पंतप्रधान मोदींशी बोललो असून केंद्र सरकारसुद्धा आपल्या बरोबरीने या युद्धामध्ये उतरले आहे, असे सांगतानाच कोरोनाग्रस्त रुग्णाला अपराध्याची वागणूक न देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUddhav Thackerayउद्धव ठाकरेcorona virusकोरोना वायरस बातम्याGovernmentसरकारNarendra Modiनरेंद्र मोदी