शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

Coronavirus: हे विषाणूशी युद्धच; आम्ही लढतोय, पण तुमचं आणखी सहकार्य हवंयः मुख्यमंत्र्यांची साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 13:06 IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेला संदेश दिला. महाराष्ट्रात आढळलेले कोरोनाचे रुग्ण हे परदेशातून आलेले आहेत. सध्यातरी त्यांच्या संपर्कात आलेल्यांना लागण झालेली आहे. यामुळे ही साथ आटोक्यात असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

ठळक मुद्देकोरोना हा विषाणू एकेक पाऊल पुढे टाकतोय. रुग्णांची संख्या वाढत आहे. . पंतप्रधान मोदींशी बोललो असून केंद्र सरकारसुद्धा आपल्या बरोबरीने या युद्धामध्ये उतरले आहे.युद्ध सुरू झालंय, सायरन वाजलाय, सगळ्या यंत्रणा लढत आहेत. आम्ही ज्या सूचना देतोय त्या पाळा.

मुंबई : कोरोना व्हायरस हा अद्याप आटोक्यात असून  आपण एक जागतिक युद्ध लढत आहोत. सरकारी यंत्रणा जिवाची पर्वा न करता लढतेय. परदेशात अडकलेल्या नागरिकांना महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हा व्हायरस पसरू नये यासाठी राज्यातील नागरिकांनी घरात राहण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेला संदेश दिला. महाराष्ट्रात आढळलेले कोरोनाचे रुग्ण हे परदेशातून आलेले आहेत. सध्यातरी त्यांच्या संपर्कात आलेल्यांना लागण झालेली आहे. यामुळे ही साथ आटोक्यात आहे. सर्वांना धन्यवाद देऊ इच्छितो. या युद्धात तुमचं सगळ्यांचं सहकार्य हे सरकारचं बळ आहे. या युद्धाचा मुकाबला करताना आपलं सरकार म्हणजेच यंत्रणा सज्ज आहे. यंत्र आणि यंत्रणा यातील फरक लक्षात घ्यावा. आपल्याकडे जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा आहे. घाबरून युद्ध लढता येत नाही. जिद्दीनेच लढावं लागतं, असा संदेश ठाकरे यांनी दिला. 

याचबरोबर त्य़ांनी सावधही केले आहे. युद्धाचा अनुभव फार वाईट असतो. जवान लढतात, धारातिर्थी पडतात. ६५ आणि ७१ सालचं युद्ध अनुभवलंय. सायरन वाजला की पळापळ व्हायची. घराघरातील दिवे बंद व्हायचे. ते कुणाला आवडत नव्हतं. पण शत्रूच्या विमानांना आपली वस्ती कळू नये म्हणून तशा सूचना दिलेल्या होत्या, असा अनुभवही त्यांनी मांडला. तशाच प्रकारचे हे विषाणूंशी युद्ध आहे. 

युद्ध सुरू झालंय, सायरन वाजलाय, सगळ्या यंत्रणा लढत आहेत. आम्ही ज्या सूचना देतोय त्या पाळा. घरदार कुटुंब, स्वतःच्या जिवाची पर्वा न करता घराबाहेर जाऊ नका, अनावश्यक प्रवास करू नका. तसेच गर्दी टाळण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे. 

गर्दी टाळण्यासाठी आवाहन करताना त्यांनी मंदिरं, मशिदी, दर्गे येथील दर्शनं बंद केली आहेत. जत्रा, यात्रा, कार्यक्रम रद्द केले आहेत. ट्रेनची गर्दी ओसरली, बसची गर्दी ओसरली ही चांगली बाब आहे. पण गर्दी आणखी कमी झाली पाहिजे. कोरोना हा विषाणू एकेक पाऊल पुढे टाकतोय. रुग्णांची संख्या वाढत आहे. काळजी घ्यावीच लागणार आहे. पंतप्रधान मोदींशी बोललो असून केंद्र सरकारसुद्धा आपल्या बरोबरीने या युद्धामध्ये उतरले आहे, असे सांगतानाच कोरोनाग्रस्त रुग्णाला अपराध्याची वागणूक न देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUddhav Thackerayउद्धव ठाकरेcorona virusकोरोना वायरस बातम्याGovernmentसरकारNarendra Modiनरेंद्र मोदी