शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

Coronavirus: हे विषाणूशी युद्धच; आम्ही लढतोय, पण तुमचं आणखी सहकार्य हवंयः मुख्यमंत्र्यांची साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 13:06 IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेला संदेश दिला. महाराष्ट्रात आढळलेले कोरोनाचे रुग्ण हे परदेशातून आलेले आहेत. सध्यातरी त्यांच्या संपर्कात आलेल्यांना लागण झालेली आहे. यामुळे ही साथ आटोक्यात असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

ठळक मुद्देकोरोना हा विषाणू एकेक पाऊल पुढे टाकतोय. रुग्णांची संख्या वाढत आहे. . पंतप्रधान मोदींशी बोललो असून केंद्र सरकारसुद्धा आपल्या बरोबरीने या युद्धामध्ये उतरले आहे.युद्ध सुरू झालंय, सायरन वाजलाय, सगळ्या यंत्रणा लढत आहेत. आम्ही ज्या सूचना देतोय त्या पाळा.

मुंबई : कोरोना व्हायरस हा अद्याप आटोक्यात असून  आपण एक जागतिक युद्ध लढत आहोत. सरकारी यंत्रणा जिवाची पर्वा न करता लढतेय. परदेशात अडकलेल्या नागरिकांना महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हा व्हायरस पसरू नये यासाठी राज्यातील नागरिकांनी घरात राहण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेला संदेश दिला. महाराष्ट्रात आढळलेले कोरोनाचे रुग्ण हे परदेशातून आलेले आहेत. सध्यातरी त्यांच्या संपर्कात आलेल्यांना लागण झालेली आहे. यामुळे ही साथ आटोक्यात आहे. सर्वांना धन्यवाद देऊ इच्छितो. या युद्धात तुमचं सगळ्यांचं सहकार्य हे सरकारचं बळ आहे. या युद्धाचा मुकाबला करताना आपलं सरकार म्हणजेच यंत्रणा सज्ज आहे. यंत्र आणि यंत्रणा यातील फरक लक्षात घ्यावा. आपल्याकडे जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा आहे. घाबरून युद्ध लढता येत नाही. जिद्दीनेच लढावं लागतं, असा संदेश ठाकरे यांनी दिला. 

याचबरोबर त्य़ांनी सावधही केले आहे. युद्धाचा अनुभव फार वाईट असतो. जवान लढतात, धारातिर्थी पडतात. ६५ आणि ७१ सालचं युद्ध अनुभवलंय. सायरन वाजला की पळापळ व्हायची. घराघरातील दिवे बंद व्हायचे. ते कुणाला आवडत नव्हतं. पण शत्रूच्या विमानांना आपली वस्ती कळू नये म्हणून तशा सूचना दिलेल्या होत्या, असा अनुभवही त्यांनी मांडला. तशाच प्रकारचे हे विषाणूंशी युद्ध आहे. 

युद्ध सुरू झालंय, सायरन वाजलाय, सगळ्या यंत्रणा लढत आहेत. आम्ही ज्या सूचना देतोय त्या पाळा. घरदार कुटुंब, स्वतःच्या जिवाची पर्वा न करता घराबाहेर जाऊ नका, अनावश्यक प्रवास करू नका. तसेच गर्दी टाळण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे. 

गर्दी टाळण्यासाठी आवाहन करताना त्यांनी मंदिरं, मशिदी, दर्गे येथील दर्शनं बंद केली आहेत. जत्रा, यात्रा, कार्यक्रम रद्द केले आहेत. ट्रेनची गर्दी ओसरली, बसची गर्दी ओसरली ही चांगली बाब आहे. पण गर्दी आणखी कमी झाली पाहिजे. कोरोना हा विषाणू एकेक पाऊल पुढे टाकतोय. रुग्णांची संख्या वाढत आहे. काळजी घ्यावीच लागणार आहे. पंतप्रधान मोदींशी बोललो असून केंद्र सरकारसुद्धा आपल्या बरोबरीने या युद्धामध्ये उतरले आहे, असे सांगतानाच कोरोनाग्रस्त रुग्णाला अपराध्याची वागणूक न देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUddhav Thackerayउद्धव ठाकरेcorona virusकोरोना वायरस बातम्याGovernmentसरकारNarendra Modiनरेंद्र मोदी