शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: ई-पास रद्द; आंतरजिल्हा प्रवास खुला, खासगी बससेवा सुरू; मुंबई मेट्रो, लोकल, रेस्टॉरंट मात्र बंदच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 06:26 IST

राज्यात ३० सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. मात्र अनलॉक-४ अंतर्गत दिलेल्या सवलतींची अंमलबजावणी २ सप्टेंबरपासून म्हणजे गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवसापासून होणार आहे.

मुंबई : पुनश्च हरिओमच्या पुढच्या टप्प्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणताना राज्य शासनाने लॉज आणि हॉटेल १०० टक्के क्षमतेने सुरू करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, इतर रेस्टॉरंट बंदच राहणार आहेत. आंतरजिल्हा प्रवासासाठीचा ई-पास रद्द करण्यात आला असून खासगी बसेसना परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.राज्यात ३० सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. मात्र अनलॉक-४ अंतर्गत दिलेल्या सवलतींची अंमलबजावणी २ सप्टेंबरपासून म्हणजे गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवसापासून होणार आहे.शाळा, महाविद्यालये, सिनेमागृहे, सर्व प्रकारचे रेस्टॉरन्ट, जिम बंद असतील पण रेस्टॉरन्टमधून पार्सलसेवा पूर्वीप्रमाणेच सुरू असेल. आधी ३३ टक्के उपस्थितीने लॉज आणि हॉटेल (लॉजिंग अ‍ॅण्ड बोर्डिंग) सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती. आता सोशल डिस्टंन्सिगच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करीत १०० टक्के क्षमतेने ती सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.खासगी कार्यालयांमध्ये आतापर्यंत १० कर्मचारी वा १० टक्के कर्मचारी यापैकी जास्त असलेल्या संख्येने कर्मचारी उपस्थितीची मुभा होती. आता ती ३० टक्के कर्मचारी वा ३० कर्मचारी अशी असेल.धार्मिक स्थळे बंदच राहणारधार्मिक स्थळं उघडण्यासंदर्भात आंदोलने सुरू असली तरी ती तूर्त बंदच ठेवण्याची भूमिका राज्य शासनाने घेतली आहे. परिस्थितीचा पुन्हा आढावा घेऊन या बाबत येत्या काही दिवसांत निर्णय होण्याची शक्यता आहे.काय सुरू होणारलॉज आणि हॉटेलजिल्हांतर्गत वाहतुकीसाठीयापुढे ई-पासची गरज नाहीखासगी बस, मिनी बस-आंतरराष्टÑीय विमान प्रवास(गृहमंत्रालयाच्या निर्देशानुसार)रिक्षामध्ये चालकासहदोन तर चारचाकीमध्ये चालकासह तीन प्रवाशांना मुभाकाय बंद राहणाररेस्टॉरंट आणि बार,नाट्य आणि सिनेमागृह,जिम, स्विमिंग पूललोकल, मेट्रो, रेल्वेसेवा बंदशाळा, महाविद्यालये, धार्मिक स्थळेसामाजिक, राजकीय, क्रीडा, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदीकोणत्याही अटीशिवाय दुसºया जिल्ह्यात जाता येणारआजच्या निर्णयामुळे आंतरजिल्हा वाहतुकीवरीलसर्व निर्बंध उठविण्यात आले आहेत. आताकोणत्याही अटीशिवाय एका जिल्ह्यातून दुसºया जिल्ह्यात जाता येईल.सरकारी कार्यालयांतील उपस्थितीबाबत नवे नियमसरकारी कार्यालयांमध्ये वर्ग-१ आणि २ चे अधिकारी १०० टक्के उपस्थित राहतील. मात्र, वर्ग-३ आणि ४ चे ५० कर्मचारी वा ५० टक्के कर्मचारी यापैकी जी जास्त असेल, त्या संख्येने उपस्थित राहतील. मुंबईसह एमएमआर क्षेत्र आणि पुणे, पिंपरी- चिंचवडच्या पीएमआर क्षेत्रात सरकारी कार्यालयांमधील वर्ग-१ आणि वर्ग-२ च्या अधिकाऱ्यांची उपस्थिती १०० टक्के असेल, पण वर्ग-३ आणि ४ चे कर्मचारी हे ३० टक्के वा ३० यापेक्षा जास्त असलेल्या संख्येने उपस्थित राहतील.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक