शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

CoronaVirus: दिलासादायक! राज्यात 'कोरोनामुक्त' होऊन घरी जाणाऱ्यांची संख्या वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2020 16:10 IST

लॉकडाऊनमुळे नवीन रुग्णांची संख्या रोडावत चालली आहे. तर कोरोनाचे उपचार घेून बरे होत असलेल्या रुग्णांचीही संख्या वाढत चालली आहे.

मुंबई : कोरोना व्हायरसमुळे रुग्णांची संख्या वाढू लागल्याने पुढील धोका लक्षात घेऊन महाराष्ट्रात ३१ मार्चपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशच २१ दिवस म्हणजेच १४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन करण्याचे आदेश दिले होते. यामुळे हातावर पोट असलेल्या मजुरांनी त्यांच्या गावाकडे पायपीट सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १५५ वर आली असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

लॉकडाऊनमुळे नवीन रुग्णांची संख्या रोडावत चालली आहे. तर कोरोनाचे उपचार घेून बरे होत असलेल्या रुग्णांचीही संख्या वाढत चालली आहे. महाराष्ट्रात आजपर्यंत एकूण १९६ रुग्ण सापडले होते. यामध्ये मुंबई व ठाणे परिसर 107, पुणे 37,नागपूर 13, अहमदनगर 03, रत्नागिरी 01,औरंगाबाद 01,यवतमाळ 03, मिरज 25,सातारा 02,सिंधुदुर्ग 01,कोल्हापूर 01,जळगाव 01,बुलढाणा 01अशी आकडेवारी समोर आली होती.

तर यापैकी ३४ रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आल्याचे टोपे यांनी सांगितले. राज्यातील मुंबई 14, पुणे 15, नागपूर 01, औरंगाबाद 01, यवतमाळ 03 असे 34 सदस्य बरे होऊन रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत, असे टोपे यांनी स्पष्ट केले आहे. तर सात जणांचा मृत्यू झाला आहे. आज मुंबईमध्ये ४० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याRajesh Topeराजेश टोपे