शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

coronavirus: राज्यात सरकारकडून फेकाफेकी, आकड्यांचा घोळ; देवेंद्र फडणवीस यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2020 16:07 IST

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्य सरकारवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे.

ठळक मुद्देराज्यात सरकारकडून आकड्यांची फेकाफेकी सुरू आहेआयसीएमआरने दिलेल्या सूचनांचे राज्य सरकारकडून पालन होत नाही आहेराज्यात अधिकारी कारभार चालवत आहेत, मात्र त्यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव आहे

मुंबई - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे महाराष्ट्रात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्य सरकारवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. राज्यात सरकारकडून आकड्यांची फेकाफेकी सुरू आहे, आयसीएमआरने दिलेल्या सूचनांचे राज्य सरकारकडून पालन होत नाही आहे, सर्वसामान्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, तसेच राज्यात अधिकारी कारभार चालवत आहेत, मात्र त्यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

एका वृत्तवाहिनीसोबत संवाद साधताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्या प्रकारे राज्यात कोरोना वाढतोय ते पाहिल्यास देशातील ४१ टक्के अॅक्टिव्ह पेशंट महाराष्ट्रात होत आहेत. तसेच देशात होणाऱ्या कोरोनाबाधितांच्या एकूण मृत्यूंपैकी ४१ टक्के महाराष्ट्रात झाले आहे. ही संख्या रोज वाढतेय. अशा परिस्थितीत राज्य सरकारकडून आकड्यांची हेरफेर सुरू आहे. काल एका दिवसांत ८ हजार जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याचे सांगण्यात आले. खरोखर रुग्ण होत असतील तर आनंदच आहेत. मात्र केवळ नंबर गेमसाठी आकड्यांचा असा खेळ करण्यापेक्षा मुंबईत लोकांना बेड्स, ऑक्सिजन आणि अॅम्ब्युलन्स मिळवण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर लोक मरत आहेत. यासंदर्भात सरकारकडून काही उपाययोजना केल्या पाहिजे होत्या.’’

तसेच आयसीएमआरकडून दिलेल्या सूचनांचे पालनही राज्य सरकारने योग्य प्रकारे केले नसल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. ते म्हणाले की, राज्यामध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होणार असे आयसीएमआरकडून त्यानंतर केंद्रीय पथकाने सांगितले होते. मात्र त्याबाबत राज्य सरकारने काय व्यवस्था केली होती. आता राज्य सरकार बेड्सची व्यवस्था केल्याचे सांगतेय मात्र हे सर्व बेड्स मिळून चार हजार आहेत. तर रुग्णांची संख्या दररोज दीड हजारने वाढत आहे. तसेच इथे वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा अभाव आहे.

अशा परिस्थितीत राजकारण करणे योग्य ठरणार नाही. त्याची ही वेळदेखील नाही. त्यामुळे अशा स्थितीत कोरोनाला रोखण्यापेक्षा सरकार आकड्यांची फेकाफेक करत असेल, बनवाबनवी करत असेल तर आम्हाला सरकारला, आरसा दाखवावा लागेल. तसेच आपल्याला कोरोनाची लढाई लढायची आहे त्यासाठी तुम्ही योग्य कारवाई, करा असे सांगावे लागेल, असे फडणवीस यांनी सांगितले.

फडणवीस पुढे म्हणाले की, आयसीएमआरच्या निर्देशांचे म्हणावे तसे पालन आपल्या राज्यात झाले नाही.  परवा राज्यातल्या एका मंत्र्याने आपण जगातील सर्वात जास्त टेस्ट केल्याचे सांगितले. मात्र महाराष्ट्रापेक्षा राजस्थान, हरियाणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूने अधिक टेस्ट केल्या. तसेच आपल्या आजूबाजूच्या राज्यांचा विचार केल्यास महाराष्ट्रात दर दशलक्ष लोकसंख्ये मागे २५१३ चाचण्या केल्या आहेत. तर गुरजातने २४६४ आणि कर्नाटकने २४६७ चाचण्या केल्या आहेत. मात्र या राज्यांपेक्षा आपल्याकडे कोरोनाचा प्रभाव अधिक आहे. मुंबईत  १० हजार टेस्टची क्षमता असताना कमी टेस्ट केल्या जात आहेत, असा आरोपही फडणवीस यांनी केला.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

ऐकणार नसाल तर युद्धाला तयार राहा, चीनची या देशाला थेट धमकी

120 दिवस आधी रिझर्वेशन करता येणार, तात्काळ तिकीटही मिळणार; या तारखेपासून रेल्वे पूर्वीप्रमाणे सुविधा देणार

क्षेत्रफळ, लोकसंख्या, अर्थव्यवस्था आणि सैन्यक्षमता; असं आहे भारत आणि चीनचं बलाबल...  

शास्त्रज्ञांनी लावला कोरोना विषाणूला निष्क्रीय करणाऱ्या जीवाणूंचा शोध

गरज पडल्यास आमचे सैन्य लढण्यास तयार, नेपाळच्या संरक्षणमंत्र्यांची भारताला धमकी

सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा आमचा विचार नाही. पण ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या गोष्टी सरकारने केल्या नाहीत. तर कुणीतर विचारलंच पाहिजे. ही बाब सरकारच्या लक्षात आणून दिली पाहिजे. उद्या समजा आकडे अचानक वाढले. तर आपल्याल पळता येईल का, म्हणूनच आपण प्रोटोकॉल पाळला पाहिजे, असेही फडणवीस पुढे म्हणाले. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबईDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी