शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

coronavirus: राज्यात सरकारकडून फेकाफेकी, आकड्यांचा घोळ; देवेंद्र फडणवीस यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2020 16:07 IST

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्य सरकारवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे.

ठळक मुद्देराज्यात सरकारकडून आकड्यांची फेकाफेकी सुरू आहेआयसीएमआरने दिलेल्या सूचनांचे राज्य सरकारकडून पालन होत नाही आहेराज्यात अधिकारी कारभार चालवत आहेत, मात्र त्यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव आहे

मुंबई - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे महाराष्ट्रात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्य सरकारवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. राज्यात सरकारकडून आकड्यांची फेकाफेकी सुरू आहे, आयसीएमआरने दिलेल्या सूचनांचे राज्य सरकारकडून पालन होत नाही आहे, सर्वसामान्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, तसेच राज्यात अधिकारी कारभार चालवत आहेत, मात्र त्यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

एका वृत्तवाहिनीसोबत संवाद साधताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्या प्रकारे राज्यात कोरोना वाढतोय ते पाहिल्यास देशातील ४१ टक्के अॅक्टिव्ह पेशंट महाराष्ट्रात होत आहेत. तसेच देशात होणाऱ्या कोरोनाबाधितांच्या एकूण मृत्यूंपैकी ४१ टक्के महाराष्ट्रात झाले आहे. ही संख्या रोज वाढतेय. अशा परिस्थितीत राज्य सरकारकडून आकड्यांची हेरफेर सुरू आहे. काल एका दिवसांत ८ हजार जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याचे सांगण्यात आले. खरोखर रुग्ण होत असतील तर आनंदच आहेत. मात्र केवळ नंबर गेमसाठी आकड्यांचा असा खेळ करण्यापेक्षा मुंबईत लोकांना बेड्स, ऑक्सिजन आणि अॅम्ब्युलन्स मिळवण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर लोक मरत आहेत. यासंदर्भात सरकारकडून काही उपाययोजना केल्या पाहिजे होत्या.’’

तसेच आयसीएमआरकडून दिलेल्या सूचनांचे पालनही राज्य सरकारने योग्य प्रकारे केले नसल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. ते म्हणाले की, राज्यामध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होणार असे आयसीएमआरकडून त्यानंतर केंद्रीय पथकाने सांगितले होते. मात्र त्याबाबत राज्य सरकारने काय व्यवस्था केली होती. आता राज्य सरकार बेड्सची व्यवस्था केल्याचे सांगतेय मात्र हे सर्व बेड्स मिळून चार हजार आहेत. तर रुग्णांची संख्या दररोज दीड हजारने वाढत आहे. तसेच इथे वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा अभाव आहे.

अशा परिस्थितीत राजकारण करणे योग्य ठरणार नाही. त्याची ही वेळदेखील नाही. त्यामुळे अशा स्थितीत कोरोनाला रोखण्यापेक्षा सरकार आकड्यांची फेकाफेक करत असेल, बनवाबनवी करत असेल तर आम्हाला सरकारला, आरसा दाखवावा लागेल. तसेच आपल्याला कोरोनाची लढाई लढायची आहे त्यासाठी तुम्ही योग्य कारवाई, करा असे सांगावे लागेल, असे फडणवीस यांनी सांगितले.

फडणवीस पुढे म्हणाले की, आयसीएमआरच्या निर्देशांचे म्हणावे तसे पालन आपल्या राज्यात झाले नाही.  परवा राज्यातल्या एका मंत्र्याने आपण जगातील सर्वात जास्त टेस्ट केल्याचे सांगितले. मात्र महाराष्ट्रापेक्षा राजस्थान, हरियाणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूने अधिक टेस्ट केल्या. तसेच आपल्या आजूबाजूच्या राज्यांचा विचार केल्यास महाराष्ट्रात दर दशलक्ष लोकसंख्ये मागे २५१३ चाचण्या केल्या आहेत. तर गुरजातने २४६४ आणि कर्नाटकने २४६७ चाचण्या केल्या आहेत. मात्र या राज्यांपेक्षा आपल्याकडे कोरोनाचा प्रभाव अधिक आहे. मुंबईत  १० हजार टेस्टची क्षमता असताना कमी टेस्ट केल्या जात आहेत, असा आरोपही फडणवीस यांनी केला.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

ऐकणार नसाल तर युद्धाला तयार राहा, चीनची या देशाला थेट धमकी

120 दिवस आधी रिझर्वेशन करता येणार, तात्काळ तिकीटही मिळणार; या तारखेपासून रेल्वे पूर्वीप्रमाणे सुविधा देणार

क्षेत्रफळ, लोकसंख्या, अर्थव्यवस्था आणि सैन्यक्षमता; असं आहे भारत आणि चीनचं बलाबल...  

शास्त्रज्ञांनी लावला कोरोना विषाणूला निष्क्रीय करणाऱ्या जीवाणूंचा शोध

गरज पडल्यास आमचे सैन्य लढण्यास तयार, नेपाळच्या संरक्षणमंत्र्यांची भारताला धमकी

सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा आमचा विचार नाही. पण ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या गोष्टी सरकारने केल्या नाहीत. तर कुणीतर विचारलंच पाहिजे. ही बाब सरकारच्या लक्षात आणून दिली पाहिजे. उद्या समजा आकडे अचानक वाढले. तर आपल्याल पळता येईल का, म्हणूनच आपण प्रोटोकॉल पाळला पाहिजे, असेही फडणवीस पुढे म्हणाले. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबईDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी