शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

coronavirus: मजुरांच्या जत्थ्यांमुळे महामार्गावर कोंडी, एसटीसोबतच मिळेल त्या वाहनांनी प्रवास  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 06:18 IST

मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, उल्हासनगर, कल्याण आदी परिसरातील हजारो कामगार, मजुरांचे जत्थे मुंबई - नाशिक राष्ट्रीय महामार्गाने गावी निघाले आहेत. कुणी ट्रक, टेम्पोने, कुणी सायकलने, तर काही जण चक्की पायीच निघाले आहेत.

ठाणे/ मुंबई : मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेशला जाता यावे म्हणून राज्याची सीमा गाठण्यासाठी मजुरांची धावपळ सुरू असून अशा मजुरांचे जत्थेच्या जत्थे नाशिकमार्गे निघाल्याने कसारा घाटात रविवारी दिवसभर वाहनांची कोंडी झाली होती.मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, उल्हासनगर, कल्याण आदी परिसरातील हजारो कामगार, मजुरांचे जत्थे मुंबई - नाशिक राष्ट्रीय महामार्गाने गावी निघाले आहेत. कुणी ट्रक, टेम्पोने, कुणी सायकलने, तर काही जण चक्की पायीच निघाले आहेत.राज्य सरकारकडून होणाऱ्या वाहन व्यवस्थेची वाट न पाहता मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेशातील बहुतांश मजूर एकत्र येत मिळेल त्या वाहनाने गाव गाठण्याचा प्रयत्न करीत आहेत. गेल्या काही दिवसांत सायकलींवरून १५ हजारांपेक्षा जास्त मजूर गावी गेल्याचा अंदाज प्रत्यक्षदर्शी लक्ष्मण कांबळे यांनी व्यक्त केला. वाहन न मिळाल्याने पायी जाणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. पायी जाणाºयांना दोन दिवसांत नाशिक येथून ७९ बसेसने पुढे सोडण्यात आले. शनिवारी ४२ आणि रविवारी ३७ बसेस नाशिक येथून सोडल्याचे सेवानिवृत्त प्रांत अधिकारी नितीन मुंडावरे यांनी एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक नितीन मैंड यांचा हवाला देत सांगितले. या बस मध्य प्रदेशच्या सीमेपर्यंत मजुरांना सोडणार आहेत. मुंबईतून बहुतांश मजूर बाहेर पडल्याने दहिसर, मुलुंड चेकनाक्यावर शनिवारच्या तुलनेत रविवारी कमी गर्दी होती.मोफत प्रवास मजुरांसाठीचलॉकडाउनमध्ये राज्यातील विविध भागांत अडकलेल्या मजुरांसाठी एसटी महामंडळाकडून ११ मेपासून मोफत बस सुरू करण्यात येत आहेत. ही सुविधा केवळ विविध ठिकाणी अडकून पडलेल्या मजुरांसाठीच आहे. - वृत्त/२५७२ भारतीय मुंबईत दाखलपरदेशात अडकलेले ५७२ भारतीय रविवारी मुंबईत दाखल झाले. लंडनहून एअर इंडियाच्या विशेष विमानाने रविवारी मध्यरात्री दीड वाजता ३२९, तर सिंंगापूर येथून दुपारी साडेबाराला आलेल्या विमानातून २४३ प्रवाशांचे मुंबई विमानतळावर आगमन झाले. - वृत्त/२

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMaharashtraमहाराष्ट्र