शहरं
Join us  
Trending Stories
1
कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
2
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
3
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
4
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
5
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
7
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
8
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
9
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
10
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
11
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
12
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
13
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?
14
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
15
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
16
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
17
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
18
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
19
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
20
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?

coronavirus: मजुरांच्या जत्थ्यांमुळे महामार्गावर कोंडी, एसटीसोबतच मिळेल त्या वाहनांनी प्रवास  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 06:18 IST

मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, उल्हासनगर, कल्याण आदी परिसरातील हजारो कामगार, मजुरांचे जत्थे मुंबई - नाशिक राष्ट्रीय महामार्गाने गावी निघाले आहेत. कुणी ट्रक, टेम्पोने, कुणी सायकलने, तर काही जण चक्की पायीच निघाले आहेत.

ठाणे/ मुंबई : मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेशला जाता यावे म्हणून राज्याची सीमा गाठण्यासाठी मजुरांची धावपळ सुरू असून अशा मजुरांचे जत्थेच्या जत्थे नाशिकमार्गे निघाल्याने कसारा घाटात रविवारी दिवसभर वाहनांची कोंडी झाली होती.मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, उल्हासनगर, कल्याण आदी परिसरातील हजारो कामगार, मजुरांचे जत्थे मुंबई - नाशिक राष्ट्रीय महामार्गाने गावी निघाले आहेत. कुणी ट्रक, टेम्पोने, कुणी सायकलने, तर काही जण चक्की पायीच निघाले आहेत.राज्य सरकारकडून होणाऱ्या वाहन व्यवस्थेची वाट न पाहता मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेशातील बहुतांश मजूर एकत्र येत मिळेल त्या वाहनाने गाव गाठण्याचा प्रयत्न करीत आहेत. गेल्या काही दिवसांत सायकलींवरून १५ हजारांपेक्षा जास्त मजूर गावी गेल्याचा अंदाज प्रत्यक्षदर्शी लक्ष्मण कांबळे यांनी व्यक्त केला. वाहन न मिळाल्याने पायी जाणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. पायी जाणाºयांना दोन दिवसांत नाशिक येथून ७९ बसेसने पुढे सोडण्यात आले. शनिवारी ४२ आणि रविवारी ३७ बसेस नाशिक येथून सोडल्याचे सेवानिवृत्त प्रांत अधिकारी नितीन मुंडावरे यांनी एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक नितीन मैंड यांचा हवाला देत सांगितले. या बस मध्य प्रदेशच्या सीमेपर्यंत मजुरांना सोडणार आहेत. मुंबईतून बहुतांश मजूर बाहेर पडल्याने दहिसर, मुलुंड चेकनाक्यावर शनिवारच्या तुलनेत रविवारी कमी गर्दी होती.मोफत प्रवास मजुरांसाठीचलॉकडाउनमध्ये राज्यातील विविध भागांत अडकलेल्या मजुरांसाठी एसटी महामंडळाकडून ११ मेपासून मोफत बस सुरू करण्यात येत आहेत. ही सुविधा केवळ विविध ठिकाणी अडकून पडलेल्या मजुरांसाठीच आहे. - वृत्त/२५७२ भारतीय मुंबईत दाखलपरदेशात अडकलेले ५७२ भारतीय रविवारी मुंबईत दाखल झाले. लंडनहून एअर इंडियाच्या विशेष विमानाने रविवारी मध्यरात्री दीड वाजता ३२९, तर सिंंगापूर येथून दुपारी साडेबाराला आलेल्या विमानातून २४३ प्रवाशांचे मुंबई विमानतळावर आगमन झाले. - वृत्त/२

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMaharashtraमहाराष्ट्र