शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

Coronavirus Lockdown: राज्यात ३० एप्रिलपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 13:26 IST

राज्यात कोरोना संक्रमक रोखण्यासाठी ठाकरे सरकारनं ३० एप्रिलपर्यंत वीकेंड लॉकडाऊन लावला आहे. त्याचसोबत नाईट कर्फ्यूसारखी विविध निर्बंध लावले आहेत. तरीही राज्यातील कोरोना संक्रमितांची संख्येत घट होताना दिसत नाही.

ठळक मुद्देसत्ताधारी पक्षाचे नेते आणि मंत्री राज्यात संपूर्ण लॉकडाऊन लावण्याची मागणी करत आहेत.कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात ३ आठवड्यांचा लॉकडाऊन गरजेचा आहे. कम्युनिटी स्प्रेड रोखण्यासाठी आणि लोकांचा जीव वाचवण्यासाठी हे गरजेचे आहे

मुंबई – महाराष्ट्रात कोरोना संक्रमणामुळे परिस्थिती भयंकर होऊ लागली आहे. दिवसाला राज्यात ५० हजारांपेक्षा कोरोना रूग्ण आढळत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी कोरोना परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर राज्यात लॉकडाऊन लावण्याबाबत घोषणा होऊ शकते.

राज्यात कोरोना संक्रमक रोखण्यासाठी ठाकरे सरकारनं ३० एप्रिलपर्यंत वीकेंड लॉकडाऊन लावला आहे. त्याचसोबत नाईट कर्फ्यूसारखी विविध निर्बंध लावले आहेत. तरीही राज्यातील कोरोना संक्रमितांची संख्येत घट होताना दिसत नाही. अशातच सत्ताधारी पक्षाचे नेते आणि मंत्री राज्यात संपूर्ण लॉकडाऊन लावण्याची मागणी करत आहेत.

महाराष्ट्रात ३ आठवड्यांसाठी लॉकडाऊन

राज्य सरकारचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात ३ आठवड्यांचा लॉकडाऊन गरजेचा आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने वीकेंड लॉकडाऊनने काही होणार नाही. संक्रमण रोखण्यासाठी आपल्याला प्रत्येक पाऊल उचलणं गरजेचे आहे. त्याचसोबत राज्यात आरोग्य यंत्रणेवर ताण येऊ नये यासाठी पदवीत्तर करणाऱ्या ५ लाख डॉक्टरांनाही सेवेत घेण्याबाबत आढावा घेतला जाणार आहे.

दरम्यान, कम्युनिटी स्तरावर संक्रमण पसरणे आणि लोकांचे मृत्यू रोखण्यासाठी ट्रेन आणि सार्वजनिक ठिकाणी बंदी यावर निर्बंध आखायला हवेत. मदत आणि पुनर्वसन मंत्री या नात्याने मी फक्त वीकेंड लॉकडाऊन नको तर ३ आठवड्यापर्यंत संपूर्ण लॉकडाऊन लावावा अशी मागणी करतो. कम्युनिटी स्प्रेड रोखण्यासाठी आणि लोकांचा जीव वाचवण्यासाठी हे गरजेचे आहे असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

सर्वपक्षीय बैठक  

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी राज्यात MPSC परीक्षा पुढे ढकलण्याबाबतही बैठकीत निर्णय झाला आहे. राज्य सरकारने लॉकडाऊन लावण्यापूर्वी छोट्या व्यापाऱ्यांना आर्थिक मदत करणे आवश्यक आहे असं प्रविण दरेकर म्हणाले.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUddhav Thackerayउद्धव ठाकरे