शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
5
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
6
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
7
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
8
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
9
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
11
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
12
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
13
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
14
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
15
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
17
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
18
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
19
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
20
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!

Coronavirus : गर्दी टाळा, नाहीतर लोकल होईल बंद, मुख्यमंत्र्यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 07:18 IST

गरज नसेल तर घराबाहेर पडू नये, गर्दी टाळावी, तसेच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडून इतर दुकाने मुंबईत बंद ठेवावीत

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारी कार्यालये बंद राहणार नाहीत. मुंबईतील लोकलसेवा, बससेवा सुरूच राहील. मात्र, लोकांनी घराबाहेर पडायचे टाळायला हवे. गर्दी ओसरली नाही, तर आम्हाला कठोर पावले उचलावी लागतील, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.गरज नसेल तर घराबाहेर पडू नये, गर्दी टाळावी, तसेच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडून इतर दुकाने मुंबईत बंद ठेवावीत, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. जे करता येणे शक्य आहे, अशा सर्व उपाययोजना आम्ही करीत आहोत; पण सर्वांनी सहकार्य केले, तर संभाव्य धोका टळू शकतो. गर्दी होत राहिली, तर नाइलाजाने काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी परिस्थिती बिघडल्यास लोकलसेवा बंद करावी लागेल, असे सूचित केले.केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या किटचा वापर करूनच सर्व वैद्यकीय चाचण्या केल्या जात आहेत. कारण या किट योग्यप्रकारे प्रमाणित करून आलेल्या असतात, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.उपस्थिती निम्म्यावर आणणारसरकारी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांची उपस्थिती निम्म्यावर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. कमी उपस्थितीत कार्यालयांमध्ये कामे कार्यक्षमतेने कशी करायची, याचा विचार केला जात आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले. खासगी कंपन्यांच्या कार्यालयांमध्ये ५० टक्केच कर्मचाºयांची उपस्थिती ठेवावी आणि इतरांना घरून काम करायला सांगावे, असा आदेश राज्य शासनाने सोमवारीच दिलेला आहे.राज्याचे प्रशासन ठप्प पडल्याचे दिसणे योग्य ठरणार नाहीमंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत शासकीय कार्यालये आणि मुंबईतील लोकल बंद ठेवण्याबाबत चर्चा झाली, पण तसा निर्णय घ्यावा की नाही, यावरून मंत्र्यांनी वेगवेगळी मते व्यक्त केली. काही जण दोन्ही बाबी सुरू ठेवण्याच्या बाजूचे होते. मुख्य सचिव अजोय मेहता, मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी अनुक्रमे शासकीय कार्यालये व लोकलसेवा सुरू ठेवण्याचा आग्रह धरला, अशी माहिती आहे. सात दिवस कार्यालये बंद ठेवण्याने प्रशासनावर मोठा भार येईल. शिवाय प्रशासन ठप्प पडल्याचे चित्र दिसेल, ते योग्य होणार नाही, यावर शेवटी एकमत झाले.कोरोनाचा पहिला बळी मुंबईतमुंबई : राज्यात कोरोना विषाणूचा पहिला बळी गेला आहे. दुबईहून परतलेल्या एका ६३ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मंगळवारी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. मुंबई आणि पिंपरी-चिंचवड येथे प्रत्येकी एक नवा रुग्ण आढळल्याने राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ४१ झाली आहे.दुबईहून ५ मार्च रोजी परतलेल्या ज्येष्ठ नागरिकास उच्च रक्तदाबाचा त्रास होता. हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाल्याने, त्यांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.राज्यात मंगळवारी नव्या १०५ संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे. आतापर्यंत बाधित भागातून एकूण १,१६९ प्रवासी राज्यात आले आहेत.१८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात ९०० जणांना भरती करण्यात आले आहे. यापैकी ७७९ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनासाठी निगेटिव्ह आले आहेत.राष्ट्रीय रोग नियंत्रण संस्थेच्या पथकाने पुण्यात स्थितीचा आढावा घेतला.पथकप्रमुख डॉ. संकेत कुलकर्णी व राज्य साथरोग प्रतिबंध व नियंत्रण समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंके यांनी मार्गदर्शनही केले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस