शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

Coronavirus : म्हणून साथरोग नियंत्रण कायदा लागू - राजेश टोपे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 05:40 IST

साथरोग नियंत्रण कायदा लागू झाला, म्हणजे राज्यात साथीच्या आजाराचा उद्रेक झाला, असा समज नागरिकांनी करून घेऊ नये. याउलट हा आजार रोखण्यासाठी या कायद्याच्या माध्यमातून अधिक प्रभावी उपाय योजण्यास मदतच होणार आहे

‘कोरोना’शी मुकाबला करण्यासाठी राज्य शासन सज्ज असल्याची ग्वाही देतानाच, साथरोग नियंत्रण कायदा लागू झाला, म्हणजे राज्यात साथीच्या आजाराचा उद्रेक झाला, असा समज नागरिकांनी करून घेऊ नये. याउलट हा आजार रोखण्यासाठी या कायद्याच्या माध्यमातून अधिक प्रभावी उपाय योजण्यास मदतच होणार आहे, एकंदरीतच प्रशासकीय यंत्रणेच्या सज्जतेबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी स्नेहा मोरे यांनी केलेली बातचीत...उपचारासाठी कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत?राज्यामध्ये सर्वच जिल्हा रुग्णालये, महापालिका रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये आणि काही खासगी रुग्णालयांमध्ये विलगीकरण (आयसोलेशन) कक्ष तयार करण्यात आले आहेत. राज्यात सुमारे ६५० ते ७०० खाटा या माध्यमातून विलगीकरणासाठी उपलब्ध झाल्या आहेत. शासनाच्या सूचनेनुसार चीन, इराण, इटली, द. कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या सात देशांतून प्रवास केलेल्या व्यक्तींना क्वॉरंटाइन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. एकांतवासातील रुग्ण पळून जाऊ नये, याकरिता पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. विलगीकरण मान्य न करणाऱ्या रुग्णांना सक्तीने स्थानबद्ध करण्यात येईल.साठेबाजांवर काय कारवाई केली?मास्क आणि सॅनिटायझरची साठेबाजी करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाच्या माध्यमातून कारवाई केली जात आहे. मुंबईत पश्चिम उपनगरात सॅनिटायझरसंबंधी तीन कारवाया, तर भिवंडी येथे मास्कसंबंधी कारवाई करण्यात आली आहे. केंद्र शासनानेही या संदर्भात अधिसूचना काढली असून, त्याद्वारे मास्क आणि सॅनिटायझरचा समावेश अत्यावश्यक वस्तू कायद्यामध्ये केला आहे.प्रशासनाकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत?राज्यात अनावश्यक गर्दी टाळावी, यासाठी राज्य शासनाने सर्व शासकीय कार्यक्रम रद्द केले आहेत. पुढील निर्णय होईपर्यंत यात्रा, सभा,समारंभ, परिषदा आयोजित करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य शासनाच्या वतीने खासगी कंपन्यांनी कर्मचाºयांना घरातूनच काम करण्याची परवानगीची विनंती केली आहे.कोरोना धोकादायक आहे का?कोरोना हा विषाणूंचा समूह असून, सध्या ज्याचा प्रादुर्भाव जाणवत आहे तो ‘कोविड १९’ हा कोरोना विषाणू या समूहातील नवीन आहे. साधारणपणे या विषाणूची लागण झालेल्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण अडीच ते तीन टक्के आहे. ज्यांची प्रतिकारशक्ती चांगली आहे, त्यांना याची लागण होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. साधारणपणे वयाची पन्नाशी उलटलेले आणि ज्यांना मधुमेह, रक्तदाब अथवा अन्य आजारांची लक्षणे आहेत, अशांमध्ये त्याची लागण पटकन होऊ शकते.नागरिकांना काय आवाहन कराल?नागरिकांनी कोरोनाच्या भीतीने घाबरू नये. स्वत:हून तपासणीसाठी रुग्णालयामध्ये गर्दी करू नये. पर्यटनस्थळे, धार्मिक ठिकाणी गर्दी करू नये. सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरतात, त्यावर विश्वास ठेवू नये.मास्क वापरणे गरजेचे आहे का?सर्वसामान्यांनी मास्क वापरण्याची गरज नाही. हातरुमाल वापरणे पुरेसे आहे. कोरोना आजार हवेतून पसरणारा नाही, तो शिंकण्यातून आणि खोकण्यातून जे द्रव बाहेर पडते, त्याला हाताचा स्पर्श झाला आणि तो हात चेहºयावर, डोळे, नाक, तोंड येथे लागला, तर संसर्ग होऊ शकतो. हात साबणाने स्वच्छ धुवा, वारंवार चेहºयावर हात फिरवू नका. संभाषण करताना साधारणपणे समोरच्याशी तीन फुटांचे अंतर ठेवा, याचे पालन केल्यास सर्वच जण कोरोनाच्या संसर्गापासून सुरक्षित राहू शकतात.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRajesh Topeराजेश टोपेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार