शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
3
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
4
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
5
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
6
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
7
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
8
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
9
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
10
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
11
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
12
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
13
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
14
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
15
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
16
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
17
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
18
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
19
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला

Coronavirus: रामायण, महाभारतनंतर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’चं पुन:प्रक्षेपण; ‘या’ वेळेत पाहता येणार मालिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2020 10:43 IST

९० च्या दशकात रामायण आणि महाभारत या मालिकांमुळे लोक घरी असायचे. रस्त्यावरील वर्दळ कमी व्हायची असे चित्र होते.

ठळक मुद्देलोकांच्या आग्रहास्तव स्वराज्यरक्षक संभाजी मालिका पुन्हा प्रसारित करण्याचा निर्णयझी मराठीवर दुपारी ४ ते ८ पाहता येणार मालिका डॉ. अमोल कोल्हे यांनी मानले रसिकांचे आभार

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. १४ एप्रिलपर्यंत देशात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंद आहेत. लोकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन सरकारकडून केलं जात आहे. अशातच लोकांनी घरातच राहावं यासाठी केंद्र सरकारने पुन्हा एकदा रामायण आणि महाभारत या मालिका दाखवणं सुरुवात केली आहे.

लोकांनी केलेल्या मागणीचा आग्रहास्तव या मालिका पुन:प्रक्षेपण करण्यात येत असल्याचं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. ९० च्या दशकात रामायण आणि महाभारत या मालिकांमुळे लोक घरी असायचे. रस्त्यावरील वर्दळ कमी व्हायची असे चित्र होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी घराबाहेर पडू नये म्हणून पुन्हा या मालिका दाखवण्यात येत आहे. दूरदर्शनवर "रामायण" मालिका पुनर्प्रक्षेपित करण्याचा निर्णय झाला आणि महाराष्ट्रातून अनेकांनी मागणी केली की "स्वराज्यरक्षक संभाजी"मालिका पुन्हा प्रसारित करावी त्याप्रमाणे झी मराठी वाहिनीने स्वराज्यरक्षक संभाजी मालिका पुन्हा दाखवण्याचं ठरवलं आहे.

याबाबत डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, या मागणीनेच अतिशय आनंद झाला, समाधान वाटलं. आपल्या कलाकृतीची तुलना अप्रत्यक्षपणे आपण लहानपणी आदर्श मानलेल्या कलाकृतीशी होते ही बाब एक वेगळाच आनंद देऊन जाते.. त्यात अशाही काही पोस्ट पहिल्या की "लॉक डाऊन चा हेतू साध्य होण्यासाठी स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेची मदत होईल. प्रामाणिक आणि शुद्ध हेतूने केलेल्या गोष्टीचा असा प्रभाव पडत असेल तर कलाकाराला आणखी काय हवं? स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचा भाग असल्याचा अभिमान वाटतो असं त्यांनी सांगितले.

स्वराज्यरक्षक संभाजी मालिका झी मराठीवर ३० मार्चपासून संध्याकाळी ४ ते ८ यावेळेत दाखवण्यात येणार आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमावर ही मालिका साकारण्यात आली आहे. संभाजी महाराजांच्या मालिकेमुळे त्यांचा इतिहास महाराष्ट्रातील घरोघरी पोहचला. अनेकदा ही मालिका दबावामुळे बंद पडत असल्याची अफवा पसरली होती. त्यावेळी अनेक शिवप्रेमींनी ही मालिका सुरुच राहावी याची आग्रही मागणी केली होती. संभाजी महाराजांना झालेल्या अटकेमुळे रसिकांनी हळहळ व्यक्त केली होती. तसेच मालिकेच्या शेवटच्या दिवशी अनेक रसिकांच्या डोळ्यात पाणी आल्याचं पाहायला मिळालं होतं.

टॅग्स :Swarajya Rakshak Sambhajiस्वराज्य रक्षक संभाजीZee Marathiझी मराठीDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस