शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: रामायण, महाभारतनंतर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’चं पुन:प्रक्षेपण; ‘या’ वेळेत पाहता येणार मालिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2020 10:43 IST

९० च्या दशकात रामायण आणि महाभारत या मालिकांमुळे लोक घरी असायचे. रस्त्यावरील वर्दळ कमी व्हायची असे चित्र होते.

ठळक मुद्देलोकांच्या आग्रहास्तव स्वराज्यरक्षक संभाजी मालिका पुन्हा प्रसारित करण्याचा निर्णयझी मराठीवर दुपारी ४ ते ८ पाहता येणार मालिका डॉ. अमोल कोल्हे यांनी मानले रसिकांचे आभार

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. १४ एप्रिलपर्यंत देशात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंद आहेत. लोकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन सरकारकडून केलं जात आहे. अशातच लोकांनी घरातच राहावं यासाठी केंद्र सरकारने पुन्हा एकदा रामायण आणि महाभारत या मालिका दाखवणं सुरुवात केली आहे.

लोकांनी केलेल्या मागणीचा आग्रहास्तव या मालिका पुन:प्रक्षेपण करण्यात येत असल्याचं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. ९० च्या दशकात रामायण आणि महाभारत या मालिकांमुळे लोक घरी असायचे. रस्त्यावरील वर्दळ कमी व्हायची असे चित्र होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी घराबाहेर पडू नये म्हणून पुन्हा या मालिका दाखवण्यात येत आहे. दूरदर्शनवर "रामायण" मालिका पुनर्प्रक्षेपित करण्याचा निर्णय झाला आणि महाराष्ट्रातून अनेकांनी मागणी केली की "स्वराज्यरक्षक संभाजी"मालिका पुन्हा प्रसारित करावी त्याप्रमाणे झी मराठी वाहिनीने स्वराज्यरक्षक संभाजी मालिका पुन्हा दाखवण्याचं ठरवलं आहे.

याबाबत डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, या मागणीनेच अतिशय आनंद झाला, समाधान वाटलं. आपल्या कलाकृतीची तुलना अप्रत्यक्षपणे आपण लहानपणी आदर्श मानलेल्या कलाकृतीशी होते ही बाब एक वेगळाच आनंद देऊन जाते.. त्यात अशाही काही पोस्ट पहिल्या की "लॉक डाऊन चा हेतू साध्य होण्यासाठी स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेची मदत होईल. प्रामाणिक आणि शुद्ध हेतूने केलेल्या गोष्टीचा असा प्रभाव पडत असेल तर कलाकाराला आणखी काय हवं? स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचा भाग असल्याचा अभिमान वाटतो असं त्यांनी सांगितले.

स्वराज्यरक्षक संभाजी मालिका झी मराठीवर ३० मार्चपासून संध्याकाळी ४ ते ८ यावेळेत दाखवण्यात येणार आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमावर ही मालिका साकारण्यात आली आहे. संभाजी महाराजांच्या मालिकेमुळे त्यांचा इतिहास महाराष्ट्रातील घरोघरी पोहचला. अनेकदा ही मालिका दबावामुळे बंद पडत असल्याची अफवा पसरली होती. त्यावेळी अनेक शिवप्रेमींनी ही मालिका सुरुच राहावी याची आग्रही मागणी केली होती. संभाजी महाराजांना झालेल्या अटकेमुळे रसिकांनी हळहळ व्यक्त केली होती. तसेच मालिकेच्या शेवटच्या दिवशी अनेक रसिकांच्या डोळ्यात पाणी आल्याचं पाहायला मिळालं होतं.

टॅग्स :Swarajya Rakshak Sambhajiस्वराज्य रक्षक संभाजीZee Marathiझी मराठीDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस