शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

CoronaVirus : खासगी कार्यालयांत 50 टक्के उपस्थिती; ...तर नाट्यगृहे, कारखाने करणार बंद, असे आहेत सरकारचे नवे निर्बंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2021 06:54 IST

मुंबई : राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होत असताना राज्य शासनाने शुक्रवारी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या. त्यानुसार सर्व ...

मुंबई : राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होत असताना राज्य शासनाने शुक्रवारी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या. त्यानुसार सर्व खासगी आस्थापना आणि कार्यालयांमध्ये ५० टक्केच कर्मचारी उपस्थिती राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. शासकीय कार्यालयांसाठी ५० टक्के कर्मचारी उपस्थितीचा आदेश आधीच काढण्यात आला आहे. (CoronaVirus: 50 percent attendance in private offices Know about new restrictions of the government)

नाट्यगृहे, सभागृहांमध्ये  कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास कोरोनाचे संकट टळेपर्यंत ती बंद ठेवण्यात येतील. कारखाने  पूर्ण क्षमतेने चालविण्याची परवानगी दिली असली तरी कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्यास तेही बंद केले जातील, असे राज्य शासनाने स्पष्टपणे बजावले आहे. 

ज्या कारखान्यांमध्ये उत्पादन होते त्या ठिकाणी शिफ्टमध्ये काम करावे. कर्मचाऱ्यांची जास्त गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

...अन्यथा, पुन्हा लॉकडाऊन -राज्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत असल्याने अजूनही लोकांनी काळजी घ्यावी, नियम पाळावेत ही कळकळीची विनंती आहे. अन्यथा, पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

सलग दुसऱ्या दिवशी राज्यात २५ हजार नवे रुग्णकोरोनाच्या लाटेचा दुसरा फेरा राज्याच्या डोक्यावर घोंघावत असून, राज्यात सलग दुसऱ्या दिवशी २५,६८१ एवढे नवीन रुग्ण सापडले आहेत. तर मुंबईने दैनंदिन रुग्णवाढीचा उच्चांक गाठला आहे. मुंबईत ३,०६२ एवढे नवीन रुग्ण सापडले आहेत. राज्यातील गेल्या सहा दिवसांतील नवीन रुग्णांची संख्या एक लाख नऊ हजार १७८ एवढी झाली आहे. 

नाट्यगृहात इतर कार्यक्रमांस मनाई -  नाट्यगृहे आणि सभागृहे यामधील उपस्थिती देखील ५० टक्के असावी. तसेच त्यांचा उपयोग धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक मेळावे आणि सभा अशा इतर कारणांसाठी करता येणार नाही. -  या नियमांचे उल्लंघन झाल्यास ती  बंद करण्यात येतील, असा इशारा मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आदेशात म्हटले आहे. -  धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर शासनाने ३१ मार्चपर्यंत बंदी आणली आहे.  -  या नियमाचे उल्लंघन केले तर कोरोना ही केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार राष्ट्रीय आपत्ती असेपर्यंत ती बंद ठेवण्यात येतील असे शासनाने बजावले आहे.

३९,७२६ नवे रुग्ण देशात आढळले -देशात शुक्रवारी ३९,७२६ नवे रुग्ण आढळून आले. हा यंदाच्या वर्षीचा, तसेच गेल्या ११० दिवसांतील सर्वात मोठा आकडा आहे. शुक्रवारी १५४ जण मरण पावले असून, ही संख्या आदल्या दिवशीपेक्षा कमी आहे. कोरोना बळींची संख्या १ लाख ६० हजारांच्या घरात पोहोचली आहे. बरे होणाऱ्यांचे प्रमाण ९६.२६ टक्क्यांपर्यंत खाली घसरले आहे.

- 65 टक्के नवे रूग्ण एकट्या महाराष्ट्रातराज्यातील  पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे आणि नाशिक ही पाच शहरे हाॅटस्पाॅट 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरState Governmentराज्य सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरे