मुंबई– ऑगस्ट महिन्यात काही प्रमाणात नियंत्रणात आलेल्या राज्यातील कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. सप्टेंबरच्या पहिल्या सहा दिवसांत राज्यातील दैनंदिन रुग्णवाढ हजारांच्या टप्प्यात वाढली आहे. १ ते ६ सप्टेंबर या कालावधीत राज्यात तब्बल १ लाख १४ हजार ३६० रुग्णांची नोंद झाली असून ही अत्यंत चिंताजनक स्थिती आहे. राज्यात आज २३ हजार ३५० रुग्णांची नोंद झाली असून ही आतापर्यंतची सर्वाधिक वाढ आहे. त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा ९ लाखांच्या पुढे गेला.
CoronaVirus News: राज्यातील कोरोना बाधितांची संख्या ९ लाखांच्या पुढे; दिवसभरात विक्रमी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2020 23:11 IST