शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

Corona virus : ‘कोरोना ’महामारीसाठी हवा स्वतंत्र सज्जता आराखडा : तज्ज्ञांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2020 15:21 IST

भारतात आरोग्याकडे दुर्लक्ष, अपुरा निधी

ठळक मुद्देआधुनिक आणि सहज उपलब्ध होणाऱ्या विविध साधनांमुळे भारतातील आरोग्य यंत्रणा सक्षम मागील दोन दशकांत सार्स, मर्स, एवियन फ्लु, स्वाईन फ्लु या आजारांनी घातले थैमान

पुणे : ' कोविड १९' ने जगाला पुन्हा एकदा धडा शिकविला असून सुधारण्याची संधीही दिली आहे. भारतासारख्या देशातही आरोग्य क्षेत्राकडे दुर्लक्ष केले जात असून अपुरा निधी मिळतो. राष्ट्रीय विकासाच्या अजेंड्यावर सार्वजनिक आरोग्याला प्राध्यान्य मिळायला हवे. कोणत्याही महामारीचा सामना करण्यासाठी प्रत्येक राज्यस्तरावर स्वतंत्र सज्जता आराखडा (स्टेट पॅनडेमिक प्रिपेड्रनेस प्लॅन) असायला हवा, असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.पुण्यातील राष्ट्रीय विषाणु संस्थे (एनआयव्ही)च्या संचालक प्रिया अब्राहम व जागतिक आरोग्य संघटनेच्या (दक्षिण-पुर्व) संसर्गजन्य आजार विभागाचे माजी संचालक राजेश भाटिया यांनी यासंदर्भात निरीक्षणे नोंदविली आहेत. 'इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च' मध्ये हा लेख प्रसिध्द झाला आहे. ‘टाईम टू रिव्हझिट रिस्पॉन्स टु पॅनडेमिक्स ’असे या लेखाचे नाव आहे. जगात ‘कोविड १९’ सारखी महामारी यापुवीर्ही आली होती. तेवढ्या पुरताच उपाययोजना केल्या गेल्या. पण त्यानंतर राजकीय प्राधान्यक्रम बदलले. साथीच्या आजारांचा निधी कमी केला किंवा अन्य वळविला गेल्याने आरोग्य यंत्रणा कमकुवतच राहिली.  मागील दोन दशकांत सार्स, मर्स, एवियन फ्लु, स्वाईन फ्लु या आजारांनी थैमान घातले.

कोविड १९च्या निमित्ताने महामारीला सामोरे जाण्यासाठीची आपली तयारी फोल ठरली आहे. यापुढेही साथीचे आजार येणार आहेत. यातून धडा घेत पुढील काळात सर्वांनाच सज्ज राहायला हवे. वन्यजीवांमध्ये जवळपास १७ लाख विषाणु आहेत. त्यापैकी ५० टक्के विषाणु माणसांना संसर्ग करू शकतात. त्यामुळे वन्यजीवांसाठी सुरक्षित पर्यावरण ठेवणे अपिरहार्य आहे, असा स्पष्ट इशारा यामध्ये देण्यात आला आहे.भारताच्या २०१७ च्या राष्ट्रीय आरोग्य धोरणामध्ये आरोग्य क्षेत्रातील गुंतवणुक २०२५ पर्यंत जीडीपीच्या तुलनेत २.५ टक्क्यांवर नेण्याचे म्हटले आहे. २०१७ मध्ये ही गुंतवणुक केवळ १.१५ टक्के होती. धोरणातील २.५ टक्क्यांची तरतुदही जगातील अन्य विकसित व विकसनशील देशांच्या तुलनेत खुप कमी आहे. कोविड १९मुळे आरोग्यासाठीच्या गुंतवणुकीमध्ये भरघोस वाढ करण्याची गरज निर्माण झाली आहे, असे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. तसेच हे चित्र २०२५ च्या खुप आधी बदलायला हवे. प्रतिबंधात्मक, रोगनिवारक, संरक्षणात्मक, पुनर्वसन आणि पुन्हा आरोग्यदायी जीवन देणाऱ्या सेवा अशा पध्दतीने उपाययोजना व पायाभुत सुविधा निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी राष्ट्रीय स्तराप्रमाणेच राज्य पातळीवरही साथीच्या आजारांसाठी स्वतंत्र सज्जता आराखडा असायला हवा. त्यामध्ये आरोग्यासह प्रत्येक क्षेत्राचा तितकाच सहभाग असायला हवा. या क्षेत्रातील संशोधनालाही अधिक चालना देण्याची गरज आहे, असे स्पष्टपणे सुचित करण्यात आले आहे.  ------------खासगी क्षेत्राचा सहभाग महत्वाचाभारतातील आरोग्य यंत्रणेमध्ये ७० टक्के वाटा खासगी क्षेत्राचा आहे. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) च्या माध्यमातून एकत्रितपणे प्रयत्न केल्यास त्यांच्याकडील त्यांच्याकडील मुबलक, आधुनिक आणि सहज उपलब्ध होणाऱ्या विविध साधनांमुळे भारतातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणा सक्षम होईल. राष्ट्रीय आरोग्य धोरणामध्येही याची गरज व्यक्त करण्यात आली आहे, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.--------------- 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्यEconomyअर्थव्यवस्थाbusinessव्यवसायGovernmentसरकार