शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

Corona virus : आता आरोग्य व प्रशासकीय यंत्रणेपुढे आव्हान ' सायलेंट कॅरिअर' ना रोखण्याचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 13:18 IST

लक्षणे आढळत नसली तरी ' कोविड-१९' ची लागण झाल्याचे निष्पन्न

ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे रुग्णसंख्या नियंत्रणात 

राजानंद मोरे -  पुणे : एखाद्या व्यक्तीला कोणतीही लक्षणे नसली तरी तो कोरोना विषाणूने बाधित असू शकतो. या व्यक्तीसह अत्यंत सौम्य स्वरूपाची लक्षात न येण्यासारखी लक्षणे असलेल्या व्यक्तीमुळे इतरांनाही संसर्ग होण्याचा धोका असतो. अशा कोरोना विषाणूच्या वाहकांना म्हणजे 'सायलेंट कॅरिअर' ना रोखण्याचे आव्हान आता आरोग्य व प्रशासकीय यंत्रणेपुढे आहे. पुण्यात बाधित व्यक्तीच्या संपर्कातील लोकांमध्ये लक्षणे दिसत नसली तरी, त्यातील ४० ते ५० टक्के जणांना कोविड-१९ची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या व्यक्तींना रोखण्यासाठी कर्फ्यू सारख्या उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे. तसेच एकीकडे लॉकडाऊनला १४ दिवस पूर्ण झाल्यानंतर रुग्णसंख्येत झपाट्यने वाढ होत असली तरी ही वाढ तुलनेने नियंत्रणात असल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. चीनमधील एका अभ्यासानुसार, फेबु्रवारी अखेरपर्यंत कोरोनाबाधित लोकांपैकी तब्बल ४३ हजार जणांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. सर्दी, खोकला, ताप ही कोरोनाची सर्वसाधारण लक्षणे आहेत. पण यातील कोणतेही लक्षण नसताना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतातही असे अनेक रुग्ण समोर आले आहेत. एखाद्यामध्ये लक्षणे आढळून आल्यानंतर त्याची चाचणी घेतली जाते. त्यात लागण झाल्याचे दिसल्यानंतर कुटुंबीयांची तपासणी होते. त्यामध्ये पॉझिटिव्ह आढळून येणाºयांचे प्रमाण ४० ते ५० टक्के आहे. विशेष म्हणजे त्यांच्यामध्ये कोणतेही लक्षणे आढळून येत नाही. तर काहींमध्ये अत्यंत सौम्य स्वरूपाची लक्षणे असतात. त्यांना 'सायलेंट कॅरिअर'म्हटले जाते. राष्ट्रीय विषाणू संस्थेचे (एनआयव्ही) माजी संचालक डॉ. अखिलेश मिश्रा म्हणाले, कोरोना विषाणू हा नवीन असल्याने फारसे संशोधन नाही. या विषाणूमध्ये नक्की कसे बदल होत आहेत, हे माहीत नाही. .............लक्षणे नसलेल्या व्यक्तींकडून विषाणू सहज पसरू शकतो. अशा प्रत्येकाची चाचणी करणे आपल्याला शक्य नाही. त्यामुळे सध्या आपण कोरोनाला पूर्णपणे थांबवू शकणार नाही. प्रत्येकाची प्रतिकारशक्ती एका पातळीपर्यंत येत नाही. तोपर्यंत विषाणूचा संसर्ग किती वाढेल, हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंंग खूप गरजेचे आहे.- डॉ. अखिलेश मिश्रा, माजी संचालक, एनआयव्ही...............प्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळेही कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या अनेक जवळच्या नातेवाईकांना लागण झाल्याची लक्षणे दिसत नाहीत. नातेवाईक वगळता इतर रुग्णांचे प्रमाण तुलनेने कमी आहे. त्यामुळे ज्यांना लक्षणे नाहीत पण कोरोनाची लागण झालेली असू शकते, त्यांना रोखण्यासाठी आता कफ्यूर्सारखी उपाययोजना अत्यंत आवश्यक आहे.- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका.

............लक्षणे नसलेल्या बाधितांकडून संसर्ग होण्याचा धोका खूपच कमीकोरोनाची लक्षणे आढळून येण्याचा कालावधी २ ते १४ दिवसांचा समजला जातो. पण काहींमध्ये तो २१ दिवसांपर्यंत दिसून आला आहे. त्यामुळे बाधित व्यक्तींच्या कुटुंबातील किंवा संपकार्तील सर्वांचे विलगीकरण केले जात आहे. त्यांना रोखून धरत संसर्ग कमी करण्याचे आव्हान यंत्रणेपुढे आहे. लक्षणे नसलेल्या बाधित लोकांकडून संसर्ग होण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. जगात हे प्रमाण केवळ एक टक्का आहे. त्याचा फारसा धोका आपल्याकडे दिसत नाही, असा दावा राज्य साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी केला आहे.  

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल