शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

Corona virus :कोरोनाचे कारण देत आणीबाणी विरोधकांचे मानधन बंद करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2020 15:55 IST

राज्यातील ३ हजार व देशातील सुमारे ८ हजार वयोवृद्ध व प्रामुख्याने गरजू कार्यकर्त्यांंना या निर्णयाचा फटका बसणार आहे. पु

ठळक मुद्देपुण्यातील कार्यकर्ते, नेते यांचा या निर्णयाला विरोध

राजू इनामदार-पुणे: आणीबाणीच्या विरोधकांना मागील दोन वर्षांपासून दिले जात असणारे मानधन रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. २३ जूलै रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. राज्यातील ३ हजार व देशातील सुमारे ८ हजार वयोवृद्ध व प्रामुख्याने गरजू कार्यकर्त्यांंना या निर्णयाचा फटका बसणार आहे.पुण्यातील कार्यकर्ते, नेते यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्याच्या कर व करेतर महसुलात मोठी घट झाली आहे. अर्थव्यवस्थेवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. त्यावर प्रभावी उपाययोजना करण्याच्या मोहिमेत आणीबाणी विरोधकांचे मानधन रद्द करण्याचा निर्णय झाला असल्याचे यासंबधीच्या सरकारी निर्णयात म्हटले आहे. या निर्णयापुर्वी ज्यांचे मानधन प्रलंबित आहे ते अदा करण्यात येऊन नंतर योजना बंद करण्यात यावी असे राज्याच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्यात आले आहे. यावर्षीचे फेब्रुवारीपासूनचे मानधन कोणालाच अदा करण्यात आलेले नाही.

सन २०१८ पासून हे मानधन देण्यात येत होते. दरमहा १० हजार रूपये व संबंधित पात्र व्यक्तीचे निधन झाल्यास त्याच्या पत्नीला ५ हजार रूपये याप्रमाणे हे मानधन मिळत होते. त्याचा अनेक वृद्ध कार्यकर्त्यांना फायदा होत होता.

मानधन थकल्याचे सांगण्यासाठी भेट घ्यायला आलेल्या काही वृद्ध कार्यकर्त्यांंना उपमुख्यमंत्री अजित पवार यांंनी हे सरकार काही दात कोरून पोट भरणारे सरकार नाही, त्यामुळे काळजी करू नका, मानधन मिळेल व त्यात वाढही होईल असे आश्वासन दिले होते. त्यानंतर हा मानधन रद्द करण्याचा निर्णय झाला आहे हे विशेष!सन १९७५ मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारने आणीबाणी लादली होती. काँग्रेस वगळता आणीबाणीला देशभरात सर्वपक्षीय विरोध झाला. त्यावेळी हजारो कार्यकर्ते, नेते यांना मिसाखाली अटक करून तुरूंगात डांबले गेले. त्यावेळी वयाने २० किंवा त्यापुढे असणार्या बहुतेक कार्यकर्ते, नेते यांचे वय आता सत्तरी पार आहे. १९ महिन्यांचा तुरूंगवास झालेल्यांना या योजनेत पात्र समजण्यात येत होते. असे एकूण ३ हजारजण राज्यात आहेत. त्यांच्यातील ही केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार गिरीश बापट, माजी आमदार कुमार सप्तर्षी यांच्यासारख्या २५ टक्के जणांंनी मानधन नाकारले आहे. उर्वरितपैकी अनेकांची आजची स्थिती अतिशय हलाखीची असून हे मानधन त्यांना दिलासा देणारे होते. मात्र त्यावरही आता संक्रात आली आहे. (३०८)

टॅग्स :PuneपुणेState Governmentराज्य सरकारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस