शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
2
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
3
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
4
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
5
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड
6
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
8
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
9
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
10
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
11
येस बँक घोटाळा : कपूर, अंबानी बैठका घेत; अधिकारी कार्यवाही करीत, सीबीआयकडून १३ जणांविरुद्ध गंभीर आरोप
12
चाकणकरांचे वक्तव्य हे आमच्या पक्षाचे म्हणणे नाही; अजित पवार यांची नाराजी
13
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
14
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
15
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर एकाचा हक्क नाही! मांजरेकरांच्या चित्रपटाला हायकोर्टाचा हिरवा कंदील
16
अमेरिकेत नोकरीस जाणे झाले आता अधिक कठीण; कर्मचाऱ्यांच्या स्वयंचलित मुदतवाढीची वर्क परमिट योजना बंद
17
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
18
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
19
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
20
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला

Corona virus : लक्षणेविरहित कोरोनाबाधितांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 19:46 IST

राज्यात सध्या आढळून आलेल्या एकूण कोरोनाबाधितांपैकी ६४ टक्के रुग्ण लक्षणे विरहित

ठळक मुद्देसंसर्ग रोखणार कसा : अचूक अँटिबॉडी टेस्टिंग किटची गरज अधोरेखितकोरोना विषाणूचा इनक्युबेशन कालावधी हा ५ ते १४ दिवसांचा लक्षणेविरहित कोरोनाबाधितांना शोधण्यासाठी अँटीबॉडी टेस्टिंग हाच पर्याय

प्रज्ञा केळकर-सिंगपुणे : भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) ताज्या अहवालानुसार, कोणतीही लक्षणे नसताना कोरोनाबाधित आढळून येणारे रुग्ण आणि त्यांच्यापासून पसरणारा संसर्ग ही नवी समस्या ठरत आहे. राज्यात सध्या आढळून आलेल्या एकूण कोरोनाबाधितांपैकी ६४ टक्के रुग्ण लक्षणे विरहित आहेत. त्यामुळे लक्षणेविरहित कोरोनाबाधित रुग्णापर्यंत पोहोचणे हे मोठे आव्हान ठरू पाहत आहे. अचूक अँटिबॉडी टेस्टिंग किट विकसित झाल्याशिवाय ही अनिश्चितता कायम राहणार आहे.

मागील आठवड्यात चीनने सादर केलेल्या आकडेवारीमधून, ४४ टक्के संसर्ग हा लक्षणेविरहित कोरोनाबाधित रुग्णांकडून झाल्याचा निष्कर्ष समोर आला. जागतिक आरोग्य संघटना आणि गुंझाऊ मेडिकल युनिव्हर्सिटी यांनी केलेल्या एकत्रित संशोधनानातूनही हीच बाब अधोरेखित झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या रुग्णांचे तीन भागांत वर्गीकरण केले आहे. लक्षणेविरहित, सौम्य लक्षणे आणि ठळक लक्षणे दिसून येणारे रुग्ण अशी वर्गवारी करण्यात आली आहे. 

कोरोना विषाणूचा इनक्युबेशन कालावधी हा ५ ते १४ दिवसांचा असतो. काही रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नसतानाच त्यांच्याकडून सुरुवात झालेली असते. कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्ती १४-२१ दिवसांनंतर आपोआप बऱ्या होतात. मात्र, त्यांनी या काळात किती लोकांपर्यंत संसर्ग पोहोचवलेला आहे, हे शोधून काढणे जिकिरीचे असते, ही बाब अनेक अभ्यासांमधून पुढे आली आहे.  वैद्यकीय तज्ञ डॉ. अच्युत जोशी म्हणाले, 'एखाद्या व्यक्तीला संसर्ग झाला की तीन ते दहा दिवसांमध्ये लक्षणे दिसायला सुरूवात होते. सर्वामध्येच लक्षणे दिसतील अशी खात्रीही देता येत नाही. लक्षणेविरहित कोरोनाबाधितांना शोधण्यासाठी अँटीबॉडी टेस्टिंग हाच पर्याय आहे. मात्र, अशा तपासण्यामध्ये तांत्रिक त्रुटी आढळल्याने त्या किट मागे घेण्यात आल्या. अचूक निदान करणाऱ्या अँटिबॉडी टेस्टिंग किट विकसित होऊन त्या प्रायोगिक तत्वावर वापरल्या जाणार नाहीत, तोवर ही अनिश्चितता कायम राहणार आहे.'----संसर्ग झाल्यानंतर ती व्यक्ती किती दिवसापर्यंत संसर्ग पसरवू शकते ?सुरुवातीपासून कोरोना विषाणूच्या संसर्गाचा कालावधी १४ दिवसांचा मानण्यात आला आहे. मात्र, विषाणू स्वत:चे स्वरूप नव्याने बदलत आहे. आजार पूर्णपणे नवीन असल्याने अद्याप विविध पातळ्यांवर संशोधन सुरू आहे. केरळमधील एका ५४ वर्षीय महिलेला परदेशातून प्रवास करून आल्यावर एक महिन्याने कोरोनाची लागण झाली आणि तिचे विलगीकरण करण्यात आले. सध्या रुग्णांना किंवा संशयितांना १४ दिवस विलगीकरण करण्यात येत असले तरी तो कालावधी आता २८ दिवसांपर्यंत वाढला आहे. ------सध्या कोरोनाबाधित रुग्णांचे पाच गटांत वर्गीकरण करता येऊ शकते. कोरोनाचा अजिबात संसर्ग न झालेला पहिला वर्ग, संसर्ग झाला असूनही लक्षणे नसलेला दुसरा वर्ग, सौम्य लक्षणे असलेला तिसरा वर्ग, लक्षणे वाढून कोरोनाबाधित ठरलेला चौथा वर्ग आणि गंभीर प्रकृती असलेल्या कोरोनाबधितांचा पाचवा वर्ग. यातील तिसरा गट हा जास्त धोकादायक ठरत आहे. कारण, या गटातील लोक साधा सर्दी, खोकला आहे असे समजून लॉकडाऊन असल्याने डॉक्टरांकडे जात नाहीत. मात्र, जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी या व्यक्ती बाहेर पडत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून पसरणाऱ्या संसर्गाची भीती जास्त आहे. त्यामुळेच योग्य आणि अचूकता असलेल्या किट विकसित करून दुसऱ्या आणि तिसऱ्या गटापर्यंत पोहोचणे येत्या काळात आव्हानात्मक ठरणार आहे.- डॉ. अच्युत जोशी, वैद्यकीय तज्ञ

 

 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलchinaचीनResearchसंशोधन