शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

Corona Vaccination: अनेक ठिकाणी लसीकरण ठप्प; मागणी जास्त, पुरवठा अत्यल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 07:16 IST

राज्यभरात अनेक ठिकाणी अपेक्षेप्रमाणे शुक्रवारी कोरोना लसींचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवला. गुरुवारीच अनेक ठिकाणी डोस संपल्यामुळे लसीकरण थांबवण्यात आले होते.

नागपूर/कोल्हापूर/मुंबई : राज्यभरात अनेक ठिकाणी अपेक्षेप्रमाणे शुक्रवारी कोरोना लसींचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवला. गुरुवारीच अनेक ठिकाणी डोस संपल्यामुळे लसीकरण थांबवण्यात आले होते. शुक्रवारी विदर्भात अनेक जिल्ह्यांतील, विशेषत: ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रे ठप्प पडली होती. पश्चिम महाराष्ट्रात पुणे वगळता परिस्थिती अधिक गंभीर असून तेथे हाताच्या बोटावर मोजण्याइतकी केंद्रे सुरू होती. उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यातील बरीच केंद्रे बंद असल्याचे चित्र बघायला मिळाले. नागपूर जिल्ह्याला पुणे आरोग्य विभागाकडून मिळालेल्या १० हजार डोसच्या भरवशावर गुरुवारपासून बंद असलेली केंद्रे शुक्रवारी दुपारी १२ वाजेनंतर पुन्हा सुरू झाली. शहराला ३ हजार तर ग्रामीणला ७ हजार डोस मिळाले. परंतु शहरात रोज कोव्हॅक्सीनचे जवळपास हजारावर डोस लागत असल्याने पुढील तीन दिवसानंतर काय, असा प्रश्न आहेच. दुसरीकडे कोविशील्डचे केवळ २० हजार डोस उपलब्ध आहेत. साधारण दीड दिवस पुरतील एवढा साठा असल्याने लसीकरण केंद्रावर गर्दी वाढली आहे.लस साठा संपल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील ९० केंद्रे दुपारीच बंद करण्याची वेळ जिल्हा आरोग्य प्रशासनावर आली. लसटंचाई असल्याने एकूण ९८ केंद्रांपैकी ८ केंद्रांवरच शुक्रवारी दिवसभर लसीकरण होऊ शकले.भंडारा जिल्ह्यातही लसींचा तुटवडा असून केवळ ५०४० डोज शिल्लक होते. त्यामुळे शुक्रवारी १८४ पैकी केवळ १८ केंद्रावर लसीकरण करण्यात आले.शुक्रवारी यवतमाळ जिल्ह्यातील १७८ पैकी फक्त ३९ कोरोना लसीकरण केंद्रे सुरू होती. तेथे सहा हजार लस पाठविल्या गेल्या होत्या. त्यापैकी एक हजार लस शिल्लक असण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या एक हजार लसींच्या आधारे शनिवारी दहा लसीकरण केंद्र सुरू ठेवले जाणार आहे.अकोला जिल्ह्यात शुक्रवारी केवळ ५० केंद्रावर लसीकरण मोहीम राबविण्यात आली असून १०३ लसीकरण केंद्र बंद होती.गोंदिया जिल्ह्यात बुधवारपासून कोरोना लसींचा साठा संपल्याने शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी लसीकरण मोहिम ठप्प होती. जिल्ह्यातील एकूण १४० केंद्रावरुन कोविड लसीकरणाची मोहिम सुरु करण्यात आली. शुक्रवारी सायंकाळपर्यंत लसींचा साठा प्राप्त झालेला नव्हता.पश्चिम महाराष्ट्रात अत्यल्प केंद्रे सुरूपुण्यात लस साठा नसल्याने ३६ केंद्रे सुरू ठेवण्यात आली होती. दुपारनंतर थोडा साठा आला. त्यामुळे ९४ केंद्रे सुरू ठेवण्यात आली.सातारा जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून लसीचा तुटवडा असल्याने सर्व ४४६ लसीकरण केंद्रे शुक्रवारीदेखील बंद ठेवण्यात आली. सांगली जिल्ह्यातील २२३ केंद्रे बंद होती तर फक्त ४ केंद्रे सुरू ठेवण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यात १९८ केंद्रे बंद होती तर ३८ केंद्रे सुरू ठेवण्यात आली होती. रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण १०४ पैकी १२ केंद्रे सुरू होती.राज्यात ९३ लाखांवर नागरिकांचे लसीकरणगुरुवारी दिवसभरात ३ लाख ५४ हजार २७ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण ९३ लाख ४५ हजार ५२ जणांना लस  देण्यात आली.लसीकरण ठप्पजळगाव जिल्ह्यातील १३३ केंद्रांपैकी शहरातील सहा केंद्रांसह जिल्ह्यातील २३ केंद्रांवर पूर्णत: लसीकरण ठप्प आहे. ७७ आरोग्य केंद्र व महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील काही खासगी रुग्णालयात थोड्याफार प्रमाणात लसीकरण झाले. गेल्या तीन दिवसांपासून जळगाव शहरात तर लसीकरण झालेलेच नसून दुसऱ्या डोसबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. शनिवारी सकाळी लसीचे ३५ हजार डोस आल्यानंतर त्यांचे वाटप होईल.लांबच लांब रांगामुंबईत शुक्रवारी लस संपल्यामुळे ७१ केंद्रांवर लसीकरण बंद करण्यात आले. प्रशासनाकडून दुपारनंतर एकूण ९० केंद्र बंद करण्यात आली. दहिसर चेकनाका परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. ज्यांच्याकडे शुक्रवारचे टोकन होते, त्यांनाच लसीकरण केंद्रात घेण्यात आले. त्यामुळे अनेक केंद्रांवर लांबच लांब रांगा बघायला मिळाल्या. गोरेगावातील नेस्कोच्या केंद्रावर मोठी झुंबड उडाली होती. सकाळपासून रांगेत उभ्या असलेल्या लोकांना बाहेर येऊन परत जाण्याची विनंती करताना पोलीस दिसले. ठाणे महापालिकेने दोन दिवसाच्या वीकेंड लॉकडाउनचे कारण देत दोन दिवस लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस