शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

Coronavirus: देशातील कोरोनाचा मृत्यूदर जागतिक दरापेक्षा कमी; राज्य सरकारचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 06:42 IST

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे प्रमाण ३.७५ टक्के

- खुशालचंद बाहेती औरंगाबाद : जगभरात कोरोनाचे थैमान चालू असतानाच भारतातील कोरोनाच्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण जागतिक प्रमाणापेक्षा कमी असल्याचे निष्कर्ष राज्य शासनाच्या अभ्यासात आढळून आले आहे. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि द्रव्य विभागाने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कोरोनाविषयक माहितीच्या आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीचे विश्लेषण करणारा अहवाल नुकताच सादर केला आहे.

राज्यात कोरोनाची लागण झाल्याचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर दवाखान्यात दाखलकरण्यात आलेल्या रुग्णांपैकी 86% रुग्णांमध्ये आता कोरोनाची लक्षणे दिसून येत नाहीत, म्हणजेच ते बरे होण्याच्या मार्गावर आहेत.12% रुग्णांमध्ये अद्याप ही लक्षणे आहेत.02% रुग्ण मात्र, अत्यवस्थ आहेत.

या अहवालाप्रमाणे कोरोनाच्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण जागतिक पातळीवर 4.84%आहे. याउलट भारतात हे प्रमाण 2.59%आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांचे मृत्यूचे प्रमाण मात्र 3.75%इतके आहे. ही मात्र राज्याच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे.

61 ते ७० वयोगटातील लोकांचे महाराष्ट्रात या रोगांमुळे सर्वाधिक मृत्यू (२०%) झाले आहेत. कोरोनाची लागण होण्याचे सर्वाधिक प्रमाण ३१ ते४० या वयोगटात असले तरीही या वयोगटातील ४६ बाधित व्यक्तींपैकी फक्त १ चा मृत्यू झाला आहे.

41 ते ५० वयोगटातील ४४ आणि ५१ ते ६० या वयोगटातील २८ रुग्णांपैकी प्रत्येकी एकाचाच मृत्यू झाला आहे. नुकत्याच धारावीत झालेल्या नवजात शिशूचा मृत्यू वगळता ३० वर्षे वयापर्यंतच्या एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMaharashtraमहाराष्ट्रDeathमृत्यू